उस्मानाबाद : मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस बरसला. यामुळे आंबा, द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.


गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करत असलेल्या मराठवाड्याला गारपीटीने पुन्हा एकदा अडचणीत आणलं आहे. अनेक ठिकाणी हाताशी आलेली पीकं गेली आहेत. लातूरमध्येही दुपारपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे.

कळंबसह इतर परिसरातही ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पाऊस वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान उस्मानाबादमध्ये गारपीटीचा पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेती, फळझाडे आणि फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :


मराठवाड्यात गारपीट, पिकांचं मोठं नुकसान


बीडमध्ये अवकाळी पावसाचा कहर, परळीत वीज पडून दोघांचा मृत्यू