राज्यभरातील गणपती मिरवणुकीतील दहा महत्त्वाचे मुद्दे :
मुंबई : मुंबईतील विसर्जन मिरवणुकीची सुरुवात मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीचा राजा येथून होते.
मुंबई : लालबागच्या राजाच्या विसर्जनानंतर मुंबईतील विसर्जन मिरवणुका संपतात
पुणे : पुण्यात मानाच्या कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक सर्वात अगोदर सुरु होते.
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संध्याकाळनंतर मार्गस्थ होतो
कोल्हापूर : कोल्हापुरात मानाचा पहिला गणपती तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीच्या आरतीने विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.
नाशिक : गोदाप्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेतर्फे मूर्ती संकलन व्यवस्था उभारण्यात आली आहे. नाशिककर दरवर्षी या ठिकाणी मूर्ती दान करतात. गेल्या वर्षी 2 लाख 71 हजार मूर्तींचं संकलन करण्यात आलं होतं.
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये संस्थान गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर शहरातील इतर गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते.
औरंगाबाद : विसर्जन मिरवणुकीवर नजर ठेवण्यासाठी पोलीस ड्रोनचा वापर करणार आहेत. काही संशयास्पद आढळल्यास पोलिसांकडून मिरची पूडचा वापर केला जाणार आहे.
जळगाव - गणेश विसर्जन मिरवणूक, महाराणा प्रताप मंडळाकडून तलवारबाजी, दानपट्टा, यांसारखी थरारक प्रात्यक्षिकं सादर केली जाणार
धुळे - विसर्जनासाठी निघालेल्या गणरायाच्या पालखीवर मशिदीतुन पुष्पवृष्टी केली जाणार, मशिदीतून आरती आणून मुस्लीम गणरायाची आरती करतात, ब्रिटीश काळापासून सुरू असलेली ही परंपरा याही वर्षी अबाधित राहणार