ठाणेकरांवर तीन दिवस जलसंकट
एबीपी माझा वेब टीम | 07 Apr 2016 01:55 AM (IST)
ठाणे: ठाणेकरांवर पुढील तीन दिवस जलसंकट ओढावणार आहे. ठाण्याला एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा आजपासून तीन दिवसांसाठी खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळं गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे सलग तीन दिवस ठाण्यातल्या अनेक भागांत पाणी येणार नाही. मुंब्रा, कळवा आणि विटावा भागाला याचा मोठा फटका बसणार आहे. ठाणे महापालिकेकडून मंगळवार ते गुरुवारपर्यंत पाणीकपात करण्यात आली आहे. त्यात एमआयडीसीकडूनही पाणीपुरवठा होणार नसल्यामुळं ठाणेकरांची चांगलीच अडचण होणार आहे.