सुभाष देशमुखांच्या दाव्यांना सुरुंग लावणारं पत्र 'माझा'च्या हाती
एबीपी माझा वेब टीम | 21 Nov 2016 11:00 AM (IST)
उस्मानाबाद : सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या दाव्यांना सुरुंग लावणारं पत्र 'एबीपी माझा'च्या हाती लागलं आहे. सहा दिवस उलटूनही 'लोकमंगल'च्या आदेशाला शाखांनी केराची टोपली दाखवली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशमुखांच्या लोकमंगल मल्टिस्टेट बँकेनं 10 तारखेलाच 500 आणि हजारांच्या नोटा न स्वीकारण्याचं पत्र आपल्या प्रत्येक शाखांना पाठवलं होतं. त्यामुळे आपल्याच शाखांना नोटा न स्वीकारण्याचा सल्ला देणाऱ्या देशमुखांनी आपल्याच शाखांमध्ये भरण्यासाठी 500 आणि हजाराच्या 91 लाखांच्या नोटा का पाठवल्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकमंगलची रक्कम ही 16 तारखेला जप्त केली, तर लोकमंगलचे पत्र हे 10 तारखेला काढले होते. त्यामुळे आदेशाच्या 6 दिवसांनंतरही आपल्याच आदेशाला बँकेनं केराची टोपली दाखवली का, असा प्रश्न निर्माण होत आहे. सहकार सहाय्यक निबंधकांनीही सुभाष देशमुख यांना क्लीन चिट दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.