या निर्णयाची अंमलबाजवणी 16 जानेवारीपासून होणार आहे. मुंबईच्या किर्ती महाविद्यालयापासून या योजनेला सुरुवात होईल.
सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या आरटीओ कार्यालयातील चकरा वाचणार आहेत.
पक्का परवाना कुठे मिळणार?
परिवहन मंत्रालयामार्फत महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना वाहतूक परवाना देण्यासाठी यंत्रणा उभी केली जाणार आहे. त्यांच्यामार्फत शिकाऊ परवाने दिले जातील. मग विद्यार्थ्यांना ठराविक वेळ दिला जाईल. त्यानंतर आरटीओ कार्यालयात त्यांची ड्रायव्हिंग टेस्ट होईल आणि त्यानंतर आरटीओ कार्यालयात पक्का परवाना दिला जाईल.