मुंबई : राज्याच्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल 89.56 टक्के लागला आहे. निकाला 51,281 विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. मात्र त्याचवेळी कॉपी आणि तोतयेगिरीची (डमी) प्रकरणंही समोर आली आहेत.     राज्यात एकूण 16,01,406 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी 922 कॉपीची प्रकरणं असून 13 प्रकरणं तोतयेगिरीची आहेत. सगळ्यात जास्त कॉपीबहाद्दर औरंगाबादमध्ये असून मुंबई विभागात हे प्रमाण सर्वात कमी आहे. तर तोतयेगिरीमध्ये नाशिक विभाग अव्वल ठरलं आहे.     औरंगाबादमध्ये कॉपीचे 314 प्रकरणं समोर आली आहेत. या विभागात एकूण 1,73,160 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यावेळी मुंबईत कॉपीचं प्रकणत सर्वात कमी असल्याचं उघड झालं आहे. मुंबई विभागात 3,23,955 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 18 जण कॉपी करताना आढळले.     तर डमी अर्थात तोतयेगिरीमध्ये नाशिक विभाग अव्वल असल्याचं दिसून आलं आहे. या विभागात एकूण 9 प्रकरणं उजेडात आली आहेत. यानंतर पुणे (2), औरंगाबाद (1) आणि लातूरचा (1) क्रमांक लागतो. नाशिक विभागात 1,98,604 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती आणि कोकण विभाग डमीच्या बाबतीत क्लीन असल्याचं दिसतं.  

राज्याचा विभागनिहाय निकाल

कोकण-  96.56% कोल्हापूर- 93.89 % पुणे- 93.30 % मुंबई- 91.90 % नाशिक- 89.61 % औरंगाबाद- 88.05 नागपूर- 85.34 % अमरावती- 84.99 % लातूर- 81.54 %

कुठे पाहाल निकाल?

http://mahresult.nic.in   बोर्डाच्या या अधिकृत वेबसाईटवर दहावीचा निकाल पाहता येईल. या निकालाकडे राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.    

कसा पाहाल निकाल? 

दहावीचा निकाल पाहाण्यासाठी तुम्हाला तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाचे पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.     समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.