- जळगावमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तापी, पूर्णा, गिरणा, पांझरा आणि बोरी नद्यांचं पाणी संकलित केलं.
- तर संत मुक्ताई, चांगदेव, सखाराम महाराज आणि असीरगडमधली मातीही एकत्र केली.
- कोल्हापुरातल्या पन्हाळा, विशाळगड, सामानगड, भुदरगड, रांगणा अशा किल्ल्यांवरची माती, आणि पंचगंगा, कृष्णेच्या संगमाचं जल संकलित करण्यात आलं.
- नांदेडमधल्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूर गडावरची माती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी संकलित केली.
- तर अहमदनगरमध्ये मुळा, प्रवरा आणि सीना नदीचं जल, तर प्रेमगिरी किल्ली, विश्रामगड, भुईकोट किल्ला, हरिश्चंद्रगड, रतनगड आणि खर्डा किल्ल्यातली माती संकलित करण्यात आली.
शिवस्मारकासाठी कोणत्या जिल्ह्यातून काय आणलं?
एबीपी माझा वेब टीम | 22 Dec 2016 06:22 PM (IST)
मुंबई: मुंबईत अरबी समुद्रात होणाऱ्या शिवस्मारकाच्या भूमीपूजनासाठी आज महाराष्ट्रभरातून माती आणि पाणी मुंबईत येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातून माती आणि पाण्याचे 72 कलश शुक्रवारी मुंबईत दाखल होतील. संबंधित बातम्या VIDEO : असं असेल अरबी समुद्रातील शिवस्मारक! शिवस्मारकाच्या भूमीपूजनाला अरबी समुद्रात फक्त हे सहा जण उतरणार! शिवस्मारकाच्या भूमीपूजनापूर्वी 23 डिसेंबरला भव्य शोभायात्रा शिवरायांचा पुतळा बनवायला मिळणं भाग्य समजतो : राम सुतार शिवस्मारकाच्या भूमीपूजनासाठी भाजपचा गाजावाजा मोदींच्या हस्ते 24 डिसेंबरला शिवस्मारकाचं भूमिपूजन