मुंबई : नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) या दोन शक्तीमान हिंदू नेत्यांचं देशात राज्य आहे. महाराष्ट्रात देखील हिंदुंचं राज्य आलं असं सांगण्यात येत आहे. तरी देखील राज्यात आक्रोश मोर्चा निघत आहे. हा आक्रोश मोर्चा योग्यच आहे. कारण स्वत:ला हिंदू समजणाऱ्या नेत्यांकडून हिंदूंना न्याय मिळत नाही. या देशात शक्तीमान हिंदू नेत्यांचं राज्य असताना काश्मीरमध्ये काश्मीरी पंडित न्याय मागण्यासाठी आक्रोश करत आहेत. ज्या मुलायमसिंह यादव यांनी राम सेवकांवर गोळ्या चालवल्या त्यांचा निषेध करण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे. त्यामुळं या आक्रोश मोर्चाचं स्वागत करायला पाहिजे, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी म्हटंलं आहे.  


मुंबईत आज हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून हजारो लोक या मोर्चात सहभागी झाले आहेत. मोर्चेकऱ्यांनी यावेळी शिवसेना भवनसमोर घोषणाबाजी केली. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यानी देशात स्वत:ला हिंदू समजणाऱ्या नेत्यांचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं राज्य असताना असा मोर्चा काढावा लागणं हे दुर्देवाचं आहे. हिंदूंचा आवाज दाबला जात आहे, अशी टीका केली.  


या देशात स्वत:ला हिंदू समजणाऱ्या नेत्यांकडून न्याय मिळत नाही. त्यामुळे असे मोर्चे काढावे लागत आहेत. हे हिंदूंचं दुर्देव आहे. आठ वर्षांपासून हिंदू समाजाचा आक्रोश सुरू झालाय. मग हिंदूंना कुठं न्याय मिळाला. काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित रस्त्यावर बसून न्याय मागतोय. ज्या मुलायमसिंह यादव यांनी रामसवेकांवर गोळ्या चालवल्या त्यांचा नरेंद्र मोदी सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने गौरव केला. त्यामुळे या विरोधात आजचा आक्रोश मोर्चा आहे. असे आक्रोश मोर्चे निघाले पाहिजेत. कारण हिंदू समाजाचा आवाज दाबला जात आहे. त्यामुळं हा मोर्चा निगाला असेल तर चांगली गोष्ट आहे, असे संजय राऊत यांनी यावेळी म्हटले.  


आजच्या मोर्चातील लोकांना शिवसेना भवनसमोर येऊन आक्रोश करावा लागला कारण शिवसेना हा एकमेव पक्ष आहे जो हिंदूंचा आवाज ऐकतो, असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला.  


पाहा काय म्हणाले संजय राऊत? 



महत्वाच्या बातम्या


Hindu Jan Aakrosh Morcha : मुंबईत हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात, लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायद्याची मागणी