शहापूरातील कुणबी महोत्सवात मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी पाण्याच्या प्रकल्पासाठी 200 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. "पाण्याच्या प्रकल्पासाठी वेगळं धोरण आखलं जाणार आहे. तसंच प्रकल्पासाठी जागा देणाऱ्या नागरिकांना प्राधान्यक्रमानं पाणी देण्यात येईल" असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्ह्यातील पर्यटन वाढावं यासाठी जास्तीत जास्त निधी देण्याच्या सुचनाही जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.