नवी मुंबईः मराठा समाजाकडून काढल्या जाणाऱ्या मोर्चामुळं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मात्र मराठा समाजाच्या आक्रोशासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी सैराट चित्रपटाला जबाबदार धरलं आहे.


जातीच्या पलीकडे जाऊन तरूण संघटीत होत असल्याचं चित्र सैराटमध्ये दाखवलं आहे. त्याचाच राग मराठा समाजाच्या मनात खदखदत असल्याची टीका आठवलेंनी केली आहे. नवी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवलेंनी अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

मराठा मोर्चा म्हणजे अनेक वर्षांचा आक्रोश : मुख्यमंत्री


 

ब्राह्मण समाजाच्या मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी मराठा मोर्चाचा घाट घातला जात असल्याचा आरोप आठवलेंनी केला. तर दिल्लीत प्रकाश आंबेडकरांनी काढलेल्या मोर्चावरही रामदास आठवलेंनी टीका केली आहे. प्रकाश आंबेडकरांकडून दलितांचं बदनाम होत असल्याची टीका आठवलेंनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील 15 महत्त्वाचे मुद्दे