ना भाजपशी संबंध, ना दाऊदशी, रियाज भाटींचं स्पष्टीकरण
एबीपी माझा वेब टीम | 21 Oct 2016 02:28 PM (IST)
मुंबई : कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप असलेले रियाज भाटी यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. भाजप, दाऊद आणि एकूणच या वादाशी आपला काडीमात्र संबंध नसल्याचं स्पष्टीकरण भाटींनी दिलं आहे. दाऊशी आपला काहीही संबंध नाही. दाऊदचा माणूस असतो, तर आपल्याला संरक्षण कसं मिळालं असतं, असा सवाल रियाज भाटींनी केला आहे. माझ्यावर कुठलाही गुन्हा नाही, पण पासपोर्टप्रकरणात खटला सुरु आहे. मात्र माझ्याकडे दोन पासपोर्ट नाहीत, असा दावा भाटींनी केला नवाब मलिकांवर खटला दाखल करणार राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी माझ्या चारित्र्यावर संशय व्यक्त केल्याने त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचंही रियाज भाटी यांनी सांगितलं आहे. दोन पासपोर्ट नाहीत माझ्याकडे दोन पासपोर्ट असल्याचा आरोप चुकीचा आहे. बनावट पासपोर्ट प्रकरणामध्ये अडकलो असतो तर इतक्या लवकर सुटलो असतो का, असं विचारत गँगस्टरशी संबंध असणारा मुंबई कसा राहू शकेल, अशी टिपणीही त्यांनी केली. भाजपशी आपला काहीही संबंध नाही, त्याचप्रमाणे माझा भाजपशी कोणताही वाद नाही. मी एमसीएच्या मार्केटिंग कमिटीचा अध्यक्ष आहे. त्यामुळेच आशिष शेलारांशी आपला संबंध येतो, त्याचप्रमाणे शरद पवारांशी भेट होते, असं भाटींनी स्पष्ट केलं आहे.