रत्नागिरीतील भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू, सर्व प्रवासी मुंबईचे
एबीपी माझा वेब टीम | 08 Feb 2017 09:15 AM (IST)
रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील खानू गावाजवळ भरधाव कार झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी आठ वाजता ही घटना घडली. भरधाव झायलो कार झाडावर आदळल्याने सात जणांचे जागीच प्राण गेले. तर अपघातात एक जण जखमी झाला आहे. दरम्यान, सर्व प्रवासी मुंबईचे असल्याची माहिती मिळत आहे.