रत्नागिरीत सावर्डे-आगवे वळणावर बस पलटली, तिघांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 26 May 2017 07:17 AM (IST)
रत्नागिरी : मुंबई-गोवा हायवेवर सावर्डे-आगवे वळणावर खासगी बस पलटली. या भीषण अपघातात तीन प्रवाशांचा मत्यू झाला असून 15 प्रवासी जखमी आहेत. मुंबईहून कोकणात जाणारी विशाल ट्रॅव्हल्सची बस (एम एच 46 जे 5252) मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे-आगवे या धोकादायक वळणावर पलटली. चालकाचं नियंत्रण सुटल्याने पहाटे 4.15 वाजता हा अपघात झाला. हे सर्व प्रवासी परेलहून मालवणला जात होते. बसमध्ये एकूण 47 जण प्रवास करत होते. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. जखमींवर डेरवण रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत.