पंकजा मुंडे जमिनीवर कधीच नसतात. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे लोकांमध्ये असायचे, असे म्हणत रामदास कदम यांनी पंकजा यांच्यावर हल्लाबोल केला.
“पंकजा मुंडे म्हणतात, मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री. या मंत्र्यांचे फोन घेत नाहीत, जनतेचे कधी घेणार?”, असा टोलाही रामदास कदम यांनी पंकजा मुंडेंना बीडमधील सभेत लगावला. शिवाय, 'पकंजा ताई, मी पण आहे भाई', असेही रामदास कदम म्हणाले.
“विश्वासघात खातं भाजपकडे”
विश्वासघात हे खातं भाजपकडे आहे. शिवसेना विश्वासघात करत नाही, असे सांगताना रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला. “मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला भाषणात फेस आला, हे काम शिवसेनेने केले. फडणवीस, बिहारचे मुख्यमंत्री नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, गुंडांची भाषा बोलू नका.”, असे रामदास कदम म्हणाले.