उस्मानाबाद : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या उस्मानाबादेत आता गारपीटीने कहर केला आहे.

 

दुष्काळ आणी पाणीटंचाईने होरपळलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याला काल अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपलं. जिल्ह्यातल्या महत्वाच्या तालुक्यांमध्ये गारपीट  झालेली पाहायला मिळाली. ज्याचा फटका शेतकऱ्यांना बसला.



काही भागात पावसामुळे वीजही खंडीत झाली. पण काल आलेल्या पावसामुळे पाच वर्षात ज्या नदी नाल्यांची पात्र कोरडी राहीली होती. ते पहिल्यांदाच भरुन वाहिले.

 

उस्मानबाद तालुक्यातील तडवळा परीसरात गारपीट, वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळला. तर पळसप  परिसरातही गारपीट झाली.  कळंब आणि तुळजापूर तालुक्यातील काही ठिकाणी पाऊस झाला.

 

दुसरीकडे कोंबडवाडी शिवारात जोरदार पाऊस पडला, त्यामुळे या परिसरातील नदी -नाले तब्बल पाच वर्षानंतर वाहिले.