या दोन्ही मित्रांनी सायंकाळी 6.45 च्या सुमारास रेल्वे रुळाजवळ आपली मोटारसायकल उभी करून रेल्वे रुळावरच मोबाईल वर पब्जी गेम खेळत बसले. याचवेळी अचानक अजमेर-हैदराबाद ही रेल्वे आल्याने या दोघांना धडक लागल्याने दोघेजण रेल्वेखाली चिरडले गेले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
काही वेळामध्ये या रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्याने घटनास्थळी मोठी गर्दी जमली. त्यातील काही जणांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान याचवेळी दुसरी रेल्वे आली असता स्थानीय नगरसेवक राम कदम यांनी रेल्वे थांबविली. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक कांबळे आल्यानंतर युवकांनी रेल्वे रुळावरील दोन्ही युवकाचे मृतदेह बाजूला काढल्यानंतर उभी केलेली रेल्वे निघून गेली.
VIDEO | 11 वर्षीय मुलाचं पब्जी बॅनसंबंधी मुख्यमंत्र्याना पत्र | मुंबई | एबीपी माझा