Pune news :    रस्त्याच्या कामामुळे केबल खराब झाल्यामुळे पुण्यातील सांगवीतील रहिवाशांना 12 तास वीज खंडित  झाली होती. मध्यरात्रीपासून दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी  परिसरातील रस्त्याच्या कामादरम्यान दोन 11 KV केबल तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे, असं निवेदन डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड (MSEDCL) ने एक निवेदन जारी केले आहे. 


महावितरणने सांगितले की, सांगवी भागात वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी त्यांना सात तास लागले. कामगार आणि तंत्रज्ञानांच्या मर्यादित उपलब्धतेमुळे प्रक्रिया आणखी लांबली होती. शहरातील बाकी भागाचं काम करण्यात कर्मचारी व्यस्त होते. 


सांगवीच्या रहिवाशांनी 12 तास वीज खंडित झाल्याबद्दल आणि त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल विशेषत: चालू असलेल्या उन्हाच्या काळात आणि जेव्हा कामासाठी वीज महत्त्वाची असते तेव्हाच बत्ती गुल झाली होती. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणार असल्याची ग्वाही महावितरणने जनतेला दिली आहे.


उन्हाळ्यात बत्ती गुल झाल्याने नागरिक त्रस्त


पुण्यात मागील काही दिवसांपासून ऊन वारा पाऊस असं वातावरण आहे. त्यात दुपारी प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवतो आहे तर संध्याकाळी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे वातावरणात अंशत: दमटपणा जाणवत आहे. त्यात तब्बल 12 तास बत्ती गुल झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.


गुरूवारी रात्री दोन वाजेपर्यंत सांगली परिसरात दुरुस्तीचं काम सुरू होतं.संबंधित ठेकेदार आणि महावितरण कर्मचारी यांच्याकडून तुटलेली केबल दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न सुरु होते.  अखेर विज पुरवठा सुरळीत करण्यात आला. दरम्यान इतर भागात यांचा परिणाम होऊन वारंवार वीजपुरवठा खंडीत होण्याच्या त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागले. यामुळे वारंवार होणा-या अशा घटनांमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.


चूक एकाची दुसऱ्याला त्रास...


 रस्त्याचे काम सुरू होतं. याच कामादरम्यान  संबंधित ठेकेदाराकडून येथे केबल तुटली होती.ती पुर्ववत जोडण्यात आली आहे.महावितरण कर्मचारी आणि संबंधितांकडून काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र अजून असा काहीही त्रास नागरिकांना होणार नसल्याचं महावितरणकडून सांगण्यात आलं आहे. 


अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं सुरु 


पुण्यात मागील काही दिवसांपासून अनेक परिसरात रस्त्यांची कामं सुरु आहे. सांगवी, वाकड, औंध परिसरातदेखील मोठ्या प्रमाणात रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यामुळेदेखील वाहतूक कोंडी होत आहे. हित कामं करताना इलेक्ट्रिकची वायर तुटू नये म्हणून काळजी घेण्यात येत असल्याचं महावितरण कडून सांगण्यात आलं आहे.