Hingoli News : हिंगोली जिल्ह्याचे (Hingoli District) अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी जिल्ह्यात पाचपेक्षा अधिक लोकांना जमण्यास मनाई आदेश काढला आहे. तर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात 06 जून ते 21 जून पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. 


हिंगोली जिल्ह्यात पाचपेक्षा अधिक लोकांना जमण्यास मनाई आदेश काढण्यात आला आहे. श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांची पालखी,  संत नामदेव महाराज संस्थान नर्सी ना. यांची पालखी व इतर छोट्या-मोठ्या दिंड्या पंढरपूरकडे जाणार आहेत. तसेच राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी आहे. तसेच नागरिकांच्या वतीने, विविध संघटना, पक्ष यांच्यातर्फे त्यांच्या विविध मागण्या संदर्भात मोर्चे, धरणे आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे, निदर्शने, विविध प्रकारची आंदोलने करीत असतात. अशा विविध घटनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात 06 जून ते 21 जून पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले आहे. 


अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश...



  • अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार, शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत.

  • कोणतीही व्यक्ती लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत.

  • कोणतीही व्यक्ती क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत.

  • कोणतीही व्यक्ती दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत.

  • कोणतीही व्यक्ती आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही.

  • सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत.

  • व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत.

  • पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे.

  • हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी दिलीप कच्छवे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.      


इतर महत्वाच्या बातम्या: 


Hingoli : पाऊले चालती पंढरीची वाट... गजानन महाराजांची पालखी हिंगोलीत, पाहा ड्रोनच्या नजरेतून