मुंबई : आगामी नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीमुळे लागलेल्या आचारसंहितेवर मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आचारसंहितेमुळे मार्चपर्यंत निधी खर्च करण्यावर निर्बंध येणार आहेत.


सध्या काही जिल्हे वगळता आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यामध्ये निवडणुका नसलेल्या जिल्ह्यांचाही समावेश आहे. ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

या आचारसंहितेमुळे मार्चपर्यंत निधी खर्च करण्यावर निर्बंध येणार आहेत, शिवाय काही कामंही करता येणार नाहीत. त्यामुळे मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी राज्य सरकार निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती आहे.

राज्यातील 212 नगरपालिका/ परिषदांमध्ये कुणाची सत्ता कुठे?


राज्यातील 212 नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. चार टप्प्यात या निवडणुका होणार आहे. पहिल्या टप्प्यात 27 नोव्हेंबरला 25 जिल्ह्यातल्या 165 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे. तर  मतमोजणी 28 नोव्हेंबरला असेल.

दुसऱ्या टप्प्यात 14 डिसेंबरला  पुणे आणि लातुर जिल्ह्यात ज्या नगरपरिषद आणि नगरपंचायती आहेत त्यांचं मतदान आणि  15 डिसेंबरला मतमोजणी होईल.