पालघरमधील भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे लोकसभेची जागा रिक्त झाली होती. तसंच भंडारा-गोंदिया मतदारसंघात नाना पटोलेंच्या राजीनाम्यामुळे लोकसभेची जागा रिक्त झाली होती. या दोन्ही मतदारसंघात 28 मे रोजी पोटनिवड घेण्यात येणार आहे. तसंच पतंगराव कदमांच्या निधनामुळे सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव मतदारसंघातील विधानसभेची जागाही रिक्त झाली आहे. या जागेसाठीही 28 मे रोजी मतदान होणार आहे.
भंडारा-गोंदिया निवडणूकीवर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहेत मात्र अद्याप निर्णय येणं बाकी आहे. याचिका दाखल असतानाही केंद्रीय निवडणूक आयोगाने या मतदारसंघात निवडणूक जाहीर केली आहे.
संबंधित बातम्या :
पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचं निधन
राजकारणातील विद्यापीठाची अखेर, पतंगराव कदम अनंतात विलीन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचं निधन
पतंगराव, जयंतरावांनी आपापली विधानसभा जागा सांभाळावी : पाटील
फडणवीस किंवा प्रफुल्ल पटेल विरोधात असतील तरच लढेन: नाना पटोले
..तेव्हाच अशोक चव्हाणांनी पटोलेंना ऑफर दिली होती!