110 टक्के भरलेलं उजनी 15 टक्क्यांवर, जूनपर्यंत पाणी पुरवण्याचं आव्हान
एबीपी माझा वेब टीम | 05 Apr 2017 06:29 PM (IST)
सोलापूर : उजनी धरणाची पाणी पातळी केवळ 15 टक्क्यांवर येऊन पोहोचली आहे. हे धरण पावसाळ्यात 110 टक्के एवढं भरलं होतं. नदी, कालवा आणि बोगद्यातून पाणी सोडल्याने पाण्याची पातळी झपाटयाने कमी झाली आहे. पाणी पातळी कमालीची खाली गेल्याने जून महिन्यापर्यंत पाणी पुरवण्याचं आव्हान प्रशासनासमोर निर्माण झालं आहे. अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत पाणी पातळी 15 टक्क्यांवर आली असल्याचं आढळून आलं. ऑक्टोबरमध्ये झालेल्या दमदार पावसानंतर उजनी धरणातून जवळपास दोन वर्षांनंतर विसर्ग सुरु करण्यात आला होता. उजनी हे 117 TMC क्षमतेचे धरण असून याच्या मृत साठ्यात 63 TMC पाणी साठविण्याची क्षमता आहे. उजनीतून पुणे, सोलापूर, उस्मानाबाद आणि अहमदनगर या जिल्ह्यांना पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे जूनपर्यंत पाणी पुरवण्याचं आव्हान प्रशासनासमोर असेल. संबंधित बातम्या :