मुंबई: राणा दाम्पत्याला न्यायालयाने धक्का दिला असून दोन घटना या वेगवेगळ्या आहेत त्यामुळे त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करणे आवश्यक आहेत असा निकाल दिला आहे. मात्र दुसऱ्या एफआयआरमध्ये कारवाईपूर्वी आरोपींना 72 तास आधी नोटीस देणं आवश्यक असल्याचंही सांगितलं आहे. राणा दाम्पत्यावर 124 अ आणि 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन वेगवेगळे एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.


घटना एकच असताना दोन वेगवेगळे एफआयर दाखल करण्याची गरज काय असा सवाल करत एकाच एफआरआयमध्ये सर्व गुन्हे दाखल करा अशी मागणी करत राणा दाम्पत्यांने केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने हा निकाल दिला आहे. 


दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष सरकारी वकिलांच्या दाव्यात तथ्य दिसतंय असं न्यायालयाने म्हटलं. जर दोन्ही याचिकाकर्ता कायद्याचा आदर करणारे लोकप्रतिनीधी असतील तर त्यांनी पोलिसांना विरोध करायला नको होता असंही न्यायालयाने म्हटलं. 


 हा गुन्हा जाणूनबूजून दाखल करण्यात आल्याचा आरोप राणांच्या वतीनं करण्यात आला. जर पहिल्या एफआयआरमध्ये जामीन मिळाला तरी दुसऱ्या एफआयआरमध्ये आम्हाला पुन्हा अटक करता यावी यासाठीच हा गुन्हा दाखल झालाय. घटना एकच असताना दोन वेगळ्या एफआयआर दाखल करणं चुकीचं आहे असा युक्तीवाद राणा दाम्पत्याच्या वतीनं करण्यात आला. 


यावर सरकारी वकील प्रदीप घरत युक्तीवाद करताना म्हणाले की, "ज्यावेळी पोलीस राणा दाम्पत्यावर कारवाई करण्यासाठी गेले त्यावेळी त्यांनी पोलिसांना विरोध केला, त्यांच्यावर अरेरावी केली. ज्यावेळी त्यांना गाडीत बसायला सांगितलं, त्यावेळी त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. त्यामुळे त्यांच्यावर कलम 353 अंतर्गत कारवाई करण्यात आली."


कायदेशीर रित्या दोन्ही गुन्हे एकाच एफआयरमध्ये दाखल केल्यास ते राणा दाम्पत्यांसाठी दिलासादायक ठरणार होतं. त्यामुळे त्यांना कायदेशीर लढाई सोपी होणार होती. 


महत्वाच्या बातम्या: