नाशिक: संगमनेरमधील कौमार्य तपासणी प्रकरणाला नवं मिळालं आहे. कारण मुलीच्या कुटुंबीयांनीच जबरदस्तीने कौमार्याची परीक्षा देण्यासाठी भाग पाडलं, असा दावा पीडित तरुणीच्या पतीनं केला आहे.


 

मुलीच्या कुटुंबीयांनीच मला जबरदस्ती कौमार्याची परीक्षा घ्यायला सांगितली आणि पंचांचं नाव सांगितलंय. याप्रकरणाचा आणि पंचांचा काहीही संबंध नाही, असा दावाही त्यानं केला आहे. एवढंच नाही तर मुलींच्या कुटुंबीयांना हे लग्न नको आहे. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे तब्बल 10 लाख रुपयांची मागणी केली आहे. आतापर्यंत मी त्यांना 71 हजार रुपये दिल्याचंही मुलांनी सांगितलं.

 

याशिवाय मुलीचा सांभाळ करायची तयारीही असल्याचा दावाही त्यानं केला आहे. त्यामुळे याप्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं आहे.

 

काय आहे प्रकरण?

 

लग्नानंतर पत्नीची कौमार्य चाचणी घेतल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडली. मात्र पत्नी त्यामध्ये नापास झाल्याचा आरोप करत, नवऱ्याने अवघ्या 48 तासात तिच्याशी काडीमोड घेतला. २२ मे रोजी हा विवाह झाला होता.

 

जातपंचाच्या आदेशानं लग्नानंतरच्या पहिल्या रात्री नववधूची कौमार्य परीक्षा घेतली गेली. पतीकडे जातपंचानी एक पांढऱ्या रंगाची बेडशीट सोपवली. दोघांच्या शारिरिक संबंधांनंतरही बेडशीटला रक्ताचा डाग लागला नाही. म्हणून पत्नी कौमार्य परीक्षेत नापास असल्याचा फतवा सुनावून जातपंच मोकळे झाले.

 

पुढे बहिष्काराच्या भीतीनं मुलीच्या पालकांनी घडल्या प्रकाराची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र जातपंचायत मूठमाती अभियानाचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे, अॅड. रंजना गवांदे यांनी हा प्रकार उजेडात आणला.

 

चांदगुडे यांच्या माहितीनुसार पीडित तरुणीचे पोलीस भरती प्रक्रियेसाठी प्रयत्न सुरु होते. त्यामुळे धावणं, सायकल चालवणं, लांब उड्या अशा प्रकाराचा सराव ती नित्यनेमानं करत होती..मात्र शास्त्रीय कारण न तपासता अघोरी मार्गानं कौमार्याचा निर्वाळा लावणाऱ्या जातपंचाना गृहखातं बेड्या कधी ठोकतं..हे पाहणं महत्वाचं आहे.

संबंधित बातम्या

नववधू कौमार्य परीक्षेत नापास, जातपंचांच्या आदेशाने पतीनं लग्न मोडलं


कौमार्य चाचणी प्रकरणाची महिला आयोगाकडून गंभीर दखल