मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनमधून गडकरींनी गोड पदार्थ वगळले!
एबीपी माझा वेब टीम | 06 Dec 2016 01:00 PM (IST)
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनमधील जेवणातून गोड पदार्थ वजा करण्यात आले आहेत. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर हा गडकरींनी हा निर्णय घेतला आहे. जयललिता यांचं सोमवारी (5 डिसेंबर) रात्री 11.30 वाजता निधन झालं. त्यानंतर तामिळनाडूमध्ये सात दिवसांचा तर एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.