कोल्हापुरात पाण्याच्या मोटरचा शॉक लागून मायलेकाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 06 Jan 2017 12:57 PM (IST)
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये पाण्याच्या मोटरचा शॉक लागून मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. करवीर तालुक्यातील केर्ली गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. रोहित दिनकर पाटील आणि शोभा दिनकर पाटील अशी मृतांची नावं आहेत. नळाला आलेलं पाणी भरण्यासाठी गेला असताना रोहितला वीजेचा शॉक बसला. त्याला वाचवण्यासाठी त्याची आई शोभा यांनी धाव घेतली, मात्र या प्रयत्नामध्ये रोहितसोबत त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे केर्ली गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे.