विशेष म्हणजे ज्या लोहमार्गावर ही दुर्घटना घडली त्या मार्गावरुन जवळपास 60 रेल्वे गाड्या ये-जा करतात. त्यामुळे या सर्व गाड्या चंद्रपूर-बल्लारशा रेल्वे स्थानक टाळून माजरी रेल्वे स्थानकातर्फे वळवण्यात आल्या आहेत.
या दुर्घटनेमुळे जवळपास 5 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, रेल्वे रुळाला तडे गेल्यानं हा अपघात घडल्याचं प्राथमिक माहिती मिळते आहे.