Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा सगळे लोक काटा काढणार आहेत. त्यांना राजकारणात ठेवणार नाहीत, माझ्याजवळ येऊन सगळे लोक बोलतात, असे म्हणत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मीडिया गेल्यावर त्यांचे काही नेते येऊन मला भेटतात. मी राजकीय बोलणार नाही, मला आरक्षण द्या, हा माझं शब्द आहे, असं जरांगे पाटील म्हणाले.  


देवेंद्र फडणवीस यांनी बंगाल विकून लाडक्या बहिणींना पैसे दिले का? असा सवाल देखील जरांगे पाटील यांनी केला. आमचेच पैसे आहेत असे जरांगे म्हणाले. तुमचे 113 मराठ्यांनी नाही पाडले तर नाव बदलून ठेवा.113 खल्लास असेही जरांगे म्हणाले. देवेंद्र भाऊंचे कित्येक लोक मला रात्री येऊन भेटतात असेही जरांगे म्हणाले. आता दिवाळी आला की आनंदाचा शिधा येईल. फडणवीस हे नुसते तात्पुरते खुष करतात.  देवेंद्र फडणवीस यांचा सगळे लोक काटा काढणार आहेत, त्यांना राजकारणात ठेवणार नाहीत माझ्याजवळ येऊन सगळे लोक बोलतात असेही जरांगे पाटील म्हणाले. 


देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि अशोक चव्हाण यांना ओरबडून नेलं, त्या तावडेंनी घोटाळा केला त्यांना दिल्लीला हुसकावून लावलं. तसेच नितीन गडकरी यांनाही हुसकावून लावल्याचे जरांगे पाटील म्हणाले. ज्या गोपीनाथ मुंडे साहेबांनी भाजप वाढवली, त्यांच कुटुंब संपवलं असेही जरांगे म्हणाले. फडणवीस एकाही मंत्र्याला मोठं होऊ देत नाहीत असंही जरांगे म्हणाले. 


रावसाहेब दानवे यांच्यावरही टीका 


रावसाहेब दानवे यांनी माझ्यावर केस केली होती. मार्चमध्ये एका कार्यक्रमाला गेलो तेव्हा केस केली होती. केस करून काय होईल. तुमचा पोरगा उभा राहील ना त्यावेळी कचका दाखवतो, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी दानवेंना इशारा दिला आहे. रावसाहेब दानवेंना मी चांगलं दादा म्हणत होतो. पण पडल्यापासून ते पिसळल्यासारखे करत असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.