बीड : मी फक्त 10 ते 12 कोटी रुपये खर्चून विधानसभा निवडणूक जिंकल्याचे वक्तव्य माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे (Majalgaon Assembly Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकी (MLA Prakash Solanke) यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, सोळंकी यांनी त्यांच्या या वक्तव्यावरुन यु-टर्न घेतला आहे. ते मी भाषणात बोललो होतो. विनोदातून ते बोललो होतो. ते काय सत्य होत का? लाख बोलण्याऐवजी मी कोटी बोललो असे स्पष्टीकरण सोळंकी यांनी दिलं आहे.
40 लाख मला पाठवले होते 23 लाख खर्च झाले
10 ते 12 कोटी रुपये खर्च करुन मी विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) जिंकली होती असे प्रकाश सोळंकी म्हणाले. मात्र, त्यानंतर त्यांची यु टर्न घेतला आहे. विनोदातून ते बोललो होतो. ते काय सत्य होत का? असे ते म्हणाले. लाख बोलण्याऐवजी मी कोटी बोललो, 40 लाख मला पाठवले होते 23 लाख खर्च झाले. जे उरले ते मी परत पाठवले आहेत. बाय चेक अकाउंटला दिले आहेत. मी प्रतिज्ञा पत्रात बरोबर उल्लेख केला आहे. कॅशचा मुद्दाच कुठेच नाही असेही सोळंकी म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरण आम्ही लावून धरलं आहे. जेव्हापासून या प्रकरणार धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला, तेव्हापासुन आमची कोणती ना कोणती जुनी प्रकरणे बाहेर काढली जात आहेत. आम्ही गुंडगिरी करतोय हे दाखवल जात असल्याचे सोळंकी म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते प्रकाश सोळंकी?
निवडणूक आली की कोणीबी येतं आणि निवडणुकीत उभे राहते. कुणीबी येतो आणि पैशाच्या जोरावर निवडणुकीत उभे राहतो अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळाली. पण मी ऐकलं की माजलगाव विधानसभा मतदारसंघात एका उमेदवाराने निवडणुकीमध्ये 45 कोटी रुपये खर्च केले आहेत, असे लोक बोलतात. पण मला काही माहित नाही. दुसरा एक उमेदवार होता त्याने 35 कोटी रुपये खर्च केले असे लोक सांगतात. मी आपले फक्त दहा-बारा कोटी रुपये खर्च केले आणि निवडणूक जिंकल्याचे सोळंकी म्हणाले. राजकारणामध्ये सर्वसामान्यांची कामं करणं महत्त्वाचं आहे. पैसे दुय्यम असल्याचे सोळंकी म्हणाले. वडवणी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी सोळंकी बोलत होते.
महत्वाच्या बातम्या: