Neelam Gorhe Majha katta : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मला खूप मदत केली आहे. माझ्या आमदारकीच्या प्रत्येक वेळेस त्यांनी शब्द टाकला असल्याचे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) म्हणाल्या. त्यांचं लिखाण खूप चागलं असतं. शिवसेनेचा कोणताही प्रवक्ता बोलतो त्यावेळी त्यांना जे सांगितलं जात तेच बोलत असतात. पण सद्याच्या राजकारणात राऊतांचा बळी गेला असल्याचे मला वाटते असे गोऱ्हे म्हणाल्या. निलम गोऱ्हे एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर आल्या होत्या. यावेळी त्या बोलत होत्या.


पक्ष जो सांगतो तेच संजय राऊत बोलतात


ज्यांना आक्रमक बोलायचे नाही, पण त्यांना आक्रमक बोलणारा माणूस हवा आहे. असं म्हणून सगळी भूमिका संजय राऊत यांच्याकडे आली असल्याचे गोऱ्हे म्हणाल्या. यामध्ये राऊतांना खूप त्रास झाल्याचे गोऱ्हे म्हणाल्या. पक्षानं एखादी गोष्ट सांगितली की ती गोष्ट कशी पद्धतीनं बोलायची हे प्रवक्त्याचे काम आहे. त्यावर लोकांचे आक्षेप असू शकतात. पण मला वाटतं त्यांना पक्ष जो सांगतो तेच संजय राऊत बोलत असल्याचे निलम गोऱ्हे म्हणाल्या. ईडीनं अटक केलेल्या प्रकरणात संजय राऊतांना त्रास झाल्याचे गोऱ्हे म्हणाल्या. त्यांनी एवढं आक्रमक बोलण्याची गरज नाही. त्यांनी वैचारीक भूमिका मांडावी असं गोऱ्हे म्हणाले. 


ठाकरे गटात संवादाचा अभाव


मी कोणतेही पद डोळ्यासमोर ठेऊन शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला नसल्याचे वक्तव्य   निलम गोऱ्हे यांनी केलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी त्यांना पत्र दिले होते. लोकांना त्यांनी भेटावं यासंदर्भात मी त्यांनी सांगितल्याचे निलम गोऱ्हे म्हणाल्या. जेवढी लोकांची अपेक्षा आहे, तेवढा वेळ उद्धव साहेबांनी दिला नाही. ठाकरे गटात संवादाचा अभाव असल्याचे गोऱ्हे यावेळी म्हणाले. 


उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर चर्चेची दारं बंद झाली


उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर आणि आजारी पडल्यानंतर चर्चेची दार बंद झाल्याचे गोऱ्हे म्हणाल्या. आता त्यांना जास्त त्रास द्यायला नको म्हणून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतल्याचे गोऱ्हे म्हणाल्या. उद्धव साहेब मुख्यमंत्री व्हावे ही माझी इच्छा होती. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्ष संघटनेत गती येईल असं वाटलं होतं. पण तसं झालं नसल्याचे निलम गोऱ्हे म्हणाल्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर एवढं बंदिस्त राजकारण होईल असं वाटलं नव्हतं असे गोहरे म्हणाल्या. त्यांचे पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झाल्याचे गोऱ्हे म्हणाल्या. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावले तर मी जाईल. मात्र आता त्याच्या गटात प्रवेश करणार नसल्याचे गोऱ्हे म्हणाल्या.


महत्त्वाच्या बातम्या:


Neelam Gorhe : कोणतेही पद डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेत प्रवेश केला नाही, ठाकरे गटात संवादाचा अभाव : निलम गोऱ्हे