मुंबई : पोलीस भरतीची (Maharashtra Police Bharti) तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आता मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. या आधी अर्ज करण्यासाठीची मुदत ही 31 मार्च होती. त्यामध्ये आता वाढ होऊन इच्छुकांना 15 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. मराठा आरक्षणासाठी लागणारे एसईबीसी प्रमाणपत्र (SEBC Certificate) मिळण्यास विलंब होत असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. 


अंतिम दिनांकापूर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळणेसाठी केलेल्या अर्जाची पोचपावतीसह आवेदन अर्ज सादर करावा. मात्र कागदपत्र पडताळणीवेळी त्यांच्याकडे विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे असणं आवश्यक आहेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.


पोलीस भरती शैक्षणिक अर्हताः 


महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965 (सन 1965 चा महा. अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परिक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.


पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे


सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापुर्वी उमेदवारांनी प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.


4.1) SSC/HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र,


4.2) जन्म दाखला,


4.3) रहिवाशी प्रमाणपत्र,


4.4) जातीचे प्रमाणपत्र


4.5) जात-वैधता प्रमाणपत्र,


4.6) संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (MSCIT),


4.7) खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती (शासन निर्णय दि.१७/३/२०१७ व दि. ११/०३/२०१९ प्रमाणे),


4.8) नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्रः (वि.जा-अ, भ.ज-ब, भ.ज-क, भ.ज-ड, विमाप्र, इमाव, एसईबीसी, इडब्लूएस प्रवर्गातील पुरूष व महिलांकरीता आरक्षीत असलेल्या पदांवरील निवडीकरीता दावा करू इच्छित असणाऱ्या महिला यांचेबाबत महिला व बालविकास विभागाचा शासन निर्णय दि. ०४/०५/२०२३ मधील तरतूद क्र.४ नुसार),


4.9) माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र, 4.10) गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र, (जाहिरात दिनांकास १०९५ दिवस पूर्ण झालेल्या उमेदवारास आवेदन अर्ज सादर करता येईल),


4.11) प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र,


4.12) भुकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र,


4.13) पोलीस पाल्य प्रमाणपत्र,


4.14) अनाथाबाबतचे प्रमाणपत्र,


4.15) अंशकालीन प्रमाणपत्र,


4.16) इ.डब्ल्यू.एस. प्रमाणपत्र,


4.17) NCC प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे.


पोलीस भरती साठी अर्ज करण्यास 15 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून राज्यातील खालील ठिकाणी पोलीस भरती होणार आहे.


(१) बृहन्मुंबई आयुक्तालय


(२) ठाणे आयुक्तालय


(३) पिंपरी-चिंचवड आयुक्तालय


(४) मिरा-भाईंदर आयुक्तालय


(५) नागपूर आयुक्तालय


(६) नाशिक आयुक्तालय


(७) नवी मुंबई आयुक्तालय


(८) अमरावती आयुक्तालय


(९) सोलापूर आयुक्तालय


(१०) छ. संभाजीनगर आयुक्तालय


(११) लोहमार्ग-मुंबई आयुक्तालय


(१२) ठाणे ग्रामीण जिल्हा


(१३) रायगड जिल्हा


(१४) पालघर जिल्हा


(१५) सिंधुदूर्ग जिल्हा


(१६) रत्नागिरी जिल्हा


(१७) नाशिक ग्रामीण जिल्हा


(१८) अहमदनगर जिल्हा


(१९) जळगांव जिल्हा


(२०) धुळे जिल्हा


(२१) नंदुरबार जिल्हा


(२२) कोल्हापूर जिल्हा


(२३) पुणे ग्रा. जिल्हा


(२४) सातारा जिल्हा


(२५) सांगली जिल्हा


(२६) सोलापूर ग्रा. जिल्हा


(२७) छ. संभाजीनगर ग्रा. जिल्हा


(२८) जालना जिल्हा


(२९) बीड जिल्हा


(३०) धाराशिव जिल्हा


(३१) नांदेड जिल्हा


(३२) लातूर जिल्हा


(३३) परभणी जिल्हा


(३६) चंद्रपूर जिल्हा


(३४) नागपूर ग्रा. जिल्हा


(३५) भंडारा जिल्हा


(३७) वर्धा जिल्हा


(३८) गडचिरोली जिल्हा


(३९) गोंदिया जिल्हा


(४०) अमरावती ग्रा. जिल्हा


(४१) अकोला जिल्हा


(४२) वाशिम जिल्हा


(४३) बुलढाणा जिल्हा


(४४) यवतमाळ जिल्हा


(४५) लोहमार्ग-पुणे जिल्हा


(४६) लोहमार्ग औरंगाबाद जिल्हा