Nashik Sanjay Raut : 'माझ्या इतकं चांगलं संतुलन कुणाचे नाही. माझ्यामुळे त्यांचे संतुलन बिघडलं. त्यामुळे मला सुरक्षेची गरज नाही. ज्यांनी बेईमानी केली, त्यांना सुरक्षा द्या. मी वन मॅन आर्मी असून मला सुरक्षेची गरज नाही, त्यामुळे मला दिलेली सुरक्षा परत पाठवा, अशी विनंती संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. आणि माझ्या जिभेला त्रास झाला. माझ्या घरात मी होतो, माझी जीभ दाताखाली आली म्हणून मी थुंकलो, असे स्पष्टीकरणही त्या प्रकरणावर दिले आहे.  


आज संजय राऊत नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, "शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांविरुद्ध लोकांमध्ये नाराजीची भावना आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांचा टाईमपास चालला आहे. ती भावनाशून्य लोक असून त्यांनी स्वतःच जोडे मारले पाहिजे. त्यांच्या टीकेमुळे खऱ्या शिवसेनेवर काही परिणाम होणार नाही. शिवशाहीची गद्दारी करुन आता ते शिवाजी महाराजांचा (Shiwaji Maharaj) जयजयकार करत आहे." 


तर गेल्या दोन दिवसांपासून संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान थुंकण्याचा वाद चांगलाच चिघळला आहे. यावर स्पष्टीकरण देताना दे म्हणाले की, "मी कुणावर थुंकलो नाही." वीर सावरकरांचे (Veer Sawarkar) उदाहरण देत ते म्हणाले की, वीर सावरकर यांचे भक्त आहेत, त्यांना न्यायालयात आणले असताना त्यांची माहिती देणारे व्यक्ती होते. त्यावर ते थुंकले होते. दाताखाली जीभ खाली आली, म्हणून थुंकलो, असेही ते म्हणाले. तर यावर अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे, ते म्हणाले की, "धरणामध्ये XXXपेक्षा थुंकणं चांगलं आहे. ज्याचे जळतं त्याला कळतं, त्यामुळे माझ्या पक्षाशी मी प्रामाणिक आहे. आमचा भाजपबरोबर सूत जुळवण्याचा प्रयत्न नाही." 


तर दुसरीकडे संजय राऊत यांच्या मागील काही दिवसांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यावर ते म्हणाले की, "माझ्या इतकं चांगलं संतुलन कुणाचे नाही. माझ्यामुळे त्यांचे संतुलन बिघडलं. त्यामुळे मला सुरक्षेची गरज नाही. ज्यांनी बेईमानी केली, त्यांना सुरक्षा द्या. मी वन मॅन आर्मी असून मला सुरक्षेची गरज नाही, त्यामुळे मला दिलेली सुरक्षा परत पाठवा." तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा तिढा सुरुच आहे. यावर राऊत म्हणाले की, "प्रत्येकाला वाटतं 48 जागा निवडून येतील. पण तसे होत नाही काँग्रेसला एकच जागा मिळाली. आम्हाला लोक सोडून गेले, यात नाशिकचा गद्दार सोडून गेला. पण शिवसेना ही जागा जिंकेल. त्या दृष्टीने आमची तयारी सुरु असून फक्त आम्ही बोलत नाही." 


धर्मावर निवडणुका जिंकता येत नाही... 


आज संजय राऊत हे त्र्यंबकेश्वर दर्शनाला गेले असून तत्पूर्वी ते म्हणाले की, "अतिशय शांतता असलेली ही त्र्यंबकेश्वरची वास्तू आहे. मधल्या काळात काही जणांनी ही शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. मी तेव्हा पण येऊ शकलो असतो पण शांतता भंग होईल, म्हणून मी आलो नाही. ही काही राजकारण करण्याची जागा नाही, पण या ठिकाणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण गावकऱ्यांनी तो प्रयत्न हाणून पाडला. कोणीतरी पोर येतात आणि हिंदुत्वाबद्दल बोलतात. धूप दाखवल्यामुळे हिंदुत्व धोक्यात येत नाही, इतकं हिंदुत्व कमजोर नाही. धर्मात तेढ निर्माण करुन आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालून निवडणुका जिंकता येत नाही, हे आता त्यांना कळून चुकले आहे. तसेच त्र्यंबकेश्वरची गोदावरी जवळजवळ इथून गायब झाली आहे. या संदर्भात विकास झाला पाहिजे, अशा ऐतिहासिक जागांच्या विकासासाठी प्राधिकरण झाले पाहिजे."