मुंबई : महायुतीचं सरकार सत्तेत आल्यापासून काही ना काही कारणानं सरकारमध्ये कुरबुर सुरु असल्याचं दिसून येत आहे. महायुतीचं सरकार येऊन तीन महिने उलटले तरी अद्याप पालकमंत्रीपदाचा तिढा काही सुटत नव्हता अखेर अजित पवारांच्या (Ajit Pawar) नाराजीनंतर  तिढा सुटला. राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.


पालकमंत्री पदासाठीची यादी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर मनासारखा जिल्हा न मिळाल्यामुळे अजित पवार, दादा भुसे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली होती. पुण्याचे पालकमंत्रिपद जरी  चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे असले तरी अजित पवार सुपर पालकमंत्री असल्यासारखे वागताना दिसत होते. त्यानंतर पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून दोघांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. 


नाराजीमुळे तिढा सुटला


राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अजित पवारांनी गणेशोत्सवाच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपतीच्या दर्शनाला जाण्याचं टाळले. तसेच मंगळवारी झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही त्यांनी दांडी मारली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले आणि अनेक महिन्यांपासून रखडलेला पालकमंत्री पदाचा तिढा सुटला


सुधारित 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे



अजित पवारांच्या राजकारणाचे पॉवर सेंटर पुणे


अजित पवार आपल्या मित्रपक्षांवर दबाव टाकून आपल्याला हवे ते करण्यात पटाईत आहेत. 15 वर्षे  काँग्रेसने राष्ट्रवादीच्या या दडपशाहीचा किंवा दबाव राजकरणाचा  अनुभव घेतला आता तोच अनुभव भाजपला येत आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाले खरे पण त्यांचे मुख्य लक्ष्य हे पुण्याच्या पालकमंत्री पदावर होते. अजित पवारांच्या राजकारणाचे पॉवर सेंटर पुणे आहे. आपल्या होमपीचवरील आपला वचप कायम राहावा यासाठी अजित पवार आग्रही होते. मात्र आता भाजपसमोर पुण्यात आपला पक्ष टिकवण्याचे  मोठे  आव्हान असणार आहे. 


हे ही वाचा :