मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक गंभीर श्रेणीत, धुळीच्या कणांचा प्रभाव आजही कायम
मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक गंभीर श्रेणीत, धुळीच्या कणांचा प्रभाव आजही कायम, मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक ५०० पार, माझगावचा एक्यूआय ६०८ तर कुलाब्यात ५४४ वर .
उत्तर भारतात पावसाची स्थिती कायम असल्याने वाऱ्यांची दिशा बदलली आणि धुळीच्या वादळाचा प्रभाव उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात दिसून येत आहे
वातावरण बदलामुळे फळधारणा होत नसलेल्या तीन एकर हरभरा पिकावर शेतकऱ्याने नांगर फिरवला.
निसर्गाच्या अवकृपेमुळे कधी गारपीट तर अतिवृष्टी तर कधी अवकाळी पावसामुळे शेतकरी हैराण झालाय. दरम्यान या वर्षी तरी हरभऱ्याचे पीक चांगले येईल म्हणून किनवट तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीवर शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची पेरणी केली होती.परंतु या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या हरभरा पिकास फळ, फुल धारणा होत नसल्याने त्यावर नांगर फिरवण्याची वेळ आलीय. हरभरा पिकाची जोमाने वाढ होऊनही,अशा या ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याच्या झाडाला फळधारणा होत नसल्याने किनवट तालूक्यातील येंदापेंदा येथिल शिवाजी बोइनवाड या शेतकऱ्यांनी तीन एकर मधील हरभरा पिकावर नांगर फिरवलाय.
वादळी वाऱ्याने रब्बी हंगामातील गहू ज्वारी आणि मका या पिकांचे मोठे नुकसान
जळगाव जिल्ह्यात अमळनेर आणि पाचोरा तालुक्यात काही गावात झालेल्या वादळी वाऱ्याने रब्बी हंगामातील गहू ज्वारी आणि मका या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संकटांची मालिका काही केल्या कमी होताना दिसत नाही ,खरीप हंगामात अति ऋष्टी झाल्याने खरीप हंगाम वाया गेला होता,त्यानंतर रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची भिस्त असताना दोन दिवसात पुन्हा एकदा वादळी वाऱ्याने अमळनेर आणि पाचोरा तालुक्यात काही गावांना तडाखा दिल्याने या भागातील शेतकऱ्यांचं रब्बी हंगामातील पिके जमीन दोस्त झाल्याने हात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे
#BREAKING : कोल्हापूर : टेक्स्टाईल पार्कमधील केमिकल फॅक्टरीला आग, यंत्रमाग कारखान्याला आग लागल्यामुळे मोठं नुकसान, घटनास्थळी अग्निशामक दलाच्या चार गाड्या दाखल, कोणतीही जीवित हानी नाही
राज्यातील अनेक भागातील तापमानात मोठी घट बघायला मिळाली. मुंबई, नाशिक, पुणे आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये 25 अंशाखाली कमाल तापमान नोंदवल्या गेलं आहे. प्रामुख्याने धुळीच्या वादळाचा परिणाम देखील दिसून आला. राज्यात मागील 24 तासापासून पावसाचं वातावरण होतं. अशातच वातावरणात गारवा देखील होता. त्यामुळे ही घट झाल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जातंय. मुंबईतील कमाल तापमानात आज मोठी घट नोंदवली गेली आहे. रविवारी सांताक्रुज वेधशाळेत कमाल तापमान 23.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय तर कुलाब्यात कमाल तापमान 24 अंश सेल्सिअस होतं. शनिवारी कमाल तापमान हे 29.7 अंश सेल्सिअस होतं. मुंबईत मागील 10 वर्षातील सर्वात कमी कमाल तापमान नोंदवलं गेलंय. आज सकाळपासूनच धुक्याचं चित्र मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात बघायला मिळालं होतं. सोबतच दिवसभर ढगाळ वातावरण असल्यानं कमाल तापमानात घट झाली आहे.
मुंबईतील हवा गुणवत्ता पातळी खालवल्याचं दिसून येत आहे. काल मुंबईतील एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक 180 वर होता. मालाड आणि माझगावमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक 300 पार झाला होता. दोन्ही ठिकाणी हवेची गुणवत्ता अति खराब श्रेणीत, मालाडमध्ये एक्यूआय 316 तर माझगावमध्ये 315 एक्यूआय होता.
उत्तर कोकणात काही ठिकाणी धुळीचे वारे येण्याची शक्यता
उत्तर कोकणात काही ठिकाणी धुळीचे वारे येण्याची शक्यता आहे. सुमारे तास 20-30 किमी वेगाने धुळीचे वारे येण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि आसपासच्या भागांत धुळीचे वारे येण्याची शक्यता आहे, असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे.
पाकिस्तानमधील धुळीच्या वादळाचा महाराष्ट्रातील वातावरणावर परिणाम
पाकिस्तानमधील धुळीच्या वादळाचा महाराष्ट्रातील वातावरणावर परिणाम दिसून येत आहे. काल सकाळपासून मुंबईतील आणि आसपासच्या शहरांमधील दृश्यमानता अतिशय कमी झाली आहे. तर हवेमध्ये धुळीचे कण मिसळल्याने त्यात काल आणि आज पाऊस पडल्याने अनेक गाड्यांवर आणि वस्तूंवर पांढरे डाग दिसून येत आहेत. अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान उत्तर कोकणात काही ठिकाणी धुळीचे वारे येण्याची शक्यता आहे. सुमारे तास 20-30 किमी वेगाने धुळीचे वारे येण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि आसपासच्या भागांत धुळीचे वारे येण्याची शक्यता आहे, असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे.
सौराष्ट्राकडून धूलिकण घेऊन आलेल्या वाऱ्यांमुळे रविवारी मुंबईतील अनेक भागांत हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर पोहोचला. हवेत मोठय़ा प्रमाणावर धूलिकण साचल्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. गेल्या दहा वर्षांतील मुंबईतील सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद रविवारी झाली आहे. सहा ते सात अंशानी कमाल तापमानात काल घट झाली असल्याचं पाहिलं मिळालं. रविवारी सरासरीच्या तुलनेत विक्रमी घट दिसून आली. कुलाबा येथे २४ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे २३.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. सरासरीच्या तुलनेत दोन्ही ठिकाणी अनुक्रमे ६ आणि ७ अंशांची घट झाली होती. हे गेल्या १० वर्षांतील सर्वात कमी कमाल तापमान आहे. कुलाबा येथे २१.६ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे २१ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. यासोबतच रविवारी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर मालाड येथील ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ ४३६ म्हणजेच ‘तीव्र प्रदूषण’ या श्रेणीत होता. भांडुप येथे ३३६, माझगाव येथे ३७२, वरळी येथे ३१९, वांद्रे कुर्ला संकुल येथे ३०७, चेंबूर ३४७, अंधेरी ३४० असा ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ नोंदवला गेला.
पार्श्वभूमी
Cold Weather : देशभरात सुरू असलेल्या थंडीचा परिणाम मुंबईतही दिसून येत आहे. राज्यभरात शनिवारी आणि रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबईत झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईच्या तापमानात मोठी घसरण झाली आहे. मुंबईतील अनेक भागात किमान तापमान 16 अंशांवर पोहोचले आहे. येत्या एक ते दोन दिवस मुंबईत थंडीचा प्रभाव कायम राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईत थंडी जास्त आहे. मुंबईत सहसा तितकीशी थंडी नसते मात्र अवकाळी पाऊस पडल्यामुळे तापमानात कमालीची घट झाली आहे.
राज्यातील अनेक भागातील कमाल तापमानात मोठी घट बघायला मिळाली. मुंबईत 16 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर, नाशिक, पुणे आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये 25 अंशाखाली कमाल तापमान नोंदवल्या गेलं आहे. प्रामुख्याने धुळीच्या वादळाचा परिणाम देखील दिसून आला. पश्चिमी चक्रवातामुळे पुढील तीन ते चार दिवस मुंबईसोबतच राज्यातील तापमानात घट होईल असं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. राज्यात मागील 24 तासापासून पावसाचं वातावरण होतं. अशातच वातावरणात गारवा देखील होता. त्यामुळे ही घट झाल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जातंय.
राज्यात विविध ठिकाणी मध्यरात्री पावसाच्या सरी, थंडीत वाढ महाबळेश्वर, दापोली, खेड आणि चिपळूणमध्ये मध्यरात्री पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे वातावरणातील गारवा आणखी वाढला आहे. पुणे (Pune) सह महाराष्ट्रात काही ठिकाणी 22 आणि 23 जानेवारीला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याप्रमाणे मध्यरात्री राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. मुंबई, पुणे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक आणि हलक्या सरी कोसळल्या.