- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र Maharashtra Live Updates: गुंड निलेश घायवळ प्रकरणात मोठी अपडेट; पासपोर्ट अखेर रद्द
Maharashtra Live Updates: गुंड निलेश घायवळ प्रकरणात मोठी अपडेट; पासपोर्ट अखेर रद्द
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
सीना नदीला आलेल्या महापुरात राहुलनगर (सुलतानपूर) हे गाव पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. गावाशी संपर्क तुटल्याने अनेक दिवस कोणीही मदतीसाठी पोहोचू शकले नाही. पूर ओसरल्यानंतरही घरांच्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नाही, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. गावातील शेतकरी दत्तात्रय शिंदे यांचे घर आणि दीड एकर ऊसाचे नुकसान झाले असूनही शासनाकडून फक्त पिक नुकसानीचे अकरा हजार रुपये मिळाले आहेत. घराच्या नुकसानीसाठी मात्र एक रुपयाचीही मदत मिळालेली नाही. अशीच अवस्था इतर शेतकऱ्यांची असून, गावकरी सांगतात की यंदाची दिवाळी लोकांच्या मदतीवरच साजरी करावी लागली. पूरानंतर शासनाने दिलेल्या मदतीचे आश्वासन हवेतच राहिल्याने सुलतानपूरचे नागरिक अजूनही तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये जगत आहेत.
निलेश घायवळ प्रकरणात मोठी अपडेट
गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द
पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून आदेश जारी
आज देशभरात भाऊबीज साजरी केली जात आहे.बीड च्या परळीत शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज भाऊबीज साजरी केलीय.राखी पौर्णिमेच्या निमित्ताने मी उद्धव साहेबांना राखी बांधायला जात असते मात्र दिवाळी गावी असल्याने उद्धव साहेबांनी फोन करून त्यांनी भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आणि विचारपूस केल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितलय.
अंधारे यांनी आज परळी येथील निवासस्थानी आपल्या भावंडांसोबत भाऊबीज साजरी केली.यावेळी त्यांनी आपल्या तिन्ही भावांचे औक्षण करत त्यांना पेढा भरवलाय.यावेळी तिन्ही भावांनी सुषमा अंधारे यांचे आशीर्वाद घेतले आहेत.
मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिम ओशिवरा भागात JMS बिजनेस पार्क इमारतीमध्ये मोठी आग लागली
सकाळी साडेदहाच्या सुमारास इमारतीचा एका गाळ्यामधे ही मोठी आग लागली..मात्र नंतर आग चार माळ्यांवर पसरली
घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाचा पाच ते सहा गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत
इमारती मध्ये मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट ऑफिस आहे त्यामुळे आग आजूबाजूला वाढण्याची शक्यता आहे
सुदैवाने या यागीमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसून मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे
आग कशामुळे लागली या संदर्भात ओशिवरा पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान अधिक तपास करत आहे...
कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी गावाच्या हद्दीत अघोरी प्रकार केल्याची घटना उघड
आठ ते दहा तरुणांनी मध्यरात्री गावात फिरून आघोरी पूजा केल्याचं उघड
मध्यरात्री तरुण गावात फिरत असल्याचा सीसीटीव्ही व्हायरल
ऐन दिवाळीतच अघोरी पूजा केल्याचा प्रकार उघड झाल्याने नागरिकांमध्ये भीती
इंगळी गावाच्या कमानी जवळच जनावराचं काळीज पांढऱ्या फडक्यात ठेवून त्या भोवती कुंकू, गुलाल, लिंबू , केळी आणि केळीचं कट केलेलं झाड ठेवण्याचा प्रकार उघड
पहाटे रस्त्याच्या मध्यभागीच जनावराचं काळीज पांढरा फडक्यात ठेवून अघोरी पूजा केल्याचा ग्रामस्थांचा संशय
इंगळी गावात भीतीच वातावरण
पोलिसांनी संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती
भाऊबीजेच्या पहाटेच परभणीच्या सेलू तालुक्यातील वालूर परिसरात चोरट्यांनी अक्षरशः हैदोस घातलाय..वालूर बोरी रस्त्यावर एका शेत आखाड्याला आणि मंदिराला लक्ष करण्यात आले आहे.२-३ चोरट्यांनी एकाचा खून करून एका दाम्पत्याला ही बेदम मारहाण केले व त्यांच्याकडील काही रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेवून पोबारा केलाय.घटना कळताच पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी स्वतः श्वान पथक,फिंगर प्रिंट तज्ञ आदी पथकासह घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास केला जात आहे..
आज भाऊ विजेच्या पहाटे वालूर बोरी रस्त्यावरील एका शेत आखाड्याला दोन ते तीन चोरट्यांनी लक्ष केले तिथे झोपलेले २४ वर्षीय संतोष सोनवणे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून खून करण्यात आला त्यांच्या आजीच्या कानातले चोरट्यांनी पळवले तसेच शेजारीच असलेल्या श्री कृष्ण मंदिरावर ही जाऊन तिथे दत्तावर कोंडिबा भोकरे व सरूबाई भोकरे याच्यावर हल्ला करून त्यांच्या कडची ही रोख रक्कम आणि काही दागिने या चोरट्यांनी हिसकावून घेतले पुढे जात बंडू भालचंद्र पवार हे शेतात दारं धरत असताना त्यांच्यावर ही या चोरट्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय व पुढे जाऊन पारडी येथील रामेश्वर राठोड यांची दुचाकीही पळवली आहे..ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने संपूर्ण वालूर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अॅण्टाॅप हिलच्या प्रतिक्षानगर येथे कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची हत्या
चंदादेवी यादव २७ असे मृत महिलेचे नाव आहे
चंदादेवी यांचे पती रामसिंगार यादव याच्यासोबत लग्नानंतर वारंवार वाद होत होते
रविवारी दोघांमध्ये पून्हा शाब्दीक वाद झाला, यावेळी राग अनावर झालेल्या रामसिंगार याने पत्नी चंदादेवी हिला बेदम मारहाण केली
या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या चंदादेवी यांना उपचारासाठी सायन रुग्णालयात नेहण्यात आले
मात्र उपचारा दरम्यान चंदादेवी हिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले
या प्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी आरोपी रामसिंगार याच्या विरोधात गुन्हा दाखलकरून त्याला अटक करण्यात आली आहे.
भाऊबीजेच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची पुन्हा भेट होण्याची शक्यता
आदित्य ठाकरे तेजस ठाकरे आणि अमित ठाकरे यांना मिळून एकच बहिण उर्वशी ठाकरे असल्याने यंदाची भाऊबीज ही शिवतीर्थावर साजरी होणार.
उद्धव ठाकरे जयजयवंती ठाकरे देशपांडे यांच्याकडे भाऊबीजेला जाणार असल्याची शक्यता.
काल बुधवारी राज ठाकरेंच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने उद्धव ठाकरे हे शिवतीर्थवर पोहचले होते
आज पुन्हा एकदा भाऊबीज निमित्ताने ठाकरे परिवार एकत्र येण्याची शक्यता ..
Ramtek Diwali Kakad Aarti : दिवाळीच्या निमित्ताने नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील पुरातन राम मंदिरात भक्तांनी पहाटे काकड आरतीला तुफान गर्दी केली होती. यासाठी नागपूर जिल्ह्यातूनच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील आणि मध्य प्रदेशातून ही भक्तगण मोठ्या संख्येने रामटेक गडावर भल्या पहाटेच प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी पोहचले होते. अतिशय भक्तीमय वातावरणात पहाटेची ही काकड आरती झाली. यावेळी गड मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा उत्सव सुरू असतो. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मध्य रात्री टिपूर लावण्यात (पेटवण्यात) येतो.. त्यावेळीही हजारो भक्त रामटेक गडावर असतात.
Buldhana : सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू असून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीन कापणी करून त्याची गंजी लावलेली आहे. मात्र या गंजीला आग लावण्याच्या अनेक घटना घडताना दिसत आहे . अशीच घटना लोणार तालुक्यातील पांग्रा डोळे येथे घडली असून शेतकरी नवनाथ काकड यांचा 6 एकर शेतातील सोयाबीन गंजी अज्ञात व्यक्तीने रात्री पेटवून दिली.. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ आर्थिक नुकसान झाल आहे. शेतकरी काकड यांनी आपल्या शेतात सोयाबीन कापून त्याची गंजी लावून ठेवली होती .. मात्र ऐन दिवाळीचा तोंडावर कुणीतरी ती गंजी पेटवून दिली आहे. . पोलिसाने पंचनामा केला असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी काकड यांनी केली आहे तर आर्थिक नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केलीय.
दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी कमळाच्या फुलाला मोठं महत्त्व असल्यानं गावातील तलावात असलेल्या कमळाचे फुल काढण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील निलज गावात घडली. प्रतीक शेंडे (19) असं तलावातील खोल पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. दिवाळीच्या दिवशीचं शेंडे कुटुंबावर दुःखाचं डोंगर उसळल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अकोल्यात वंचितला ऐन जिल्हा परिषद निवडणूकीच्या तोंडावर मोठा झटका बसलाय. पक्षाचे मावळत्या जिल्हा परिषद सभागृहातील सदस्य सुशांत बोर्डे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. बोर्डे हे खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांचं गाव पळसोबडेचा समावेश असलेल्या कुरणखेड मतदारसंघातून विजयी झाले होतेय. याआधी 2018 मध्ये याच मतदारसंघातून वंचितवर जिल्हा परिषदेत विजयी झालेल्या त्यांच्या पत्नी मनिषा बोर्डे या जिल्हा परिषदेत महिला आणि बालकल्याण सभापती होत्याय. खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप जिल्हा कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडलाय. यावेळी बोर्डे यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलाय.
कल्याण मोहने येथील पोलीस चौकी परिसरात फटाक्याचे स्टॉलवर लहुजी नगर येथील दोन तरुण फटाके घेण्यासाठी गेले होते फटाक्याच्या देण्याघेण्यावरून वाद सुरू हा रात्री 9 च्या सुमारास झाला आपापसात झालेला वाद मिटला. मात्र मोहने येथील स्थानीक गावगुंड तरुणांनी मध्यरात्री लहुजी नगरमध्ये जाऊन घराची तोडफोड केली महिलांना मारहाण केली घरांवर दगडफेक केली या दगडफेकीत ९ ते १० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे
घटनेची माहिती मिळताच कल्याण खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र शेकडो गुंडांनी पोलिसांसमोर दगडफेक करत घरांची तोडफोड करून महिलांना मारहाण केली.
विशेष म्हणजे या सर्व गावगुंडांना संध्या साठे ही तरुणी वस्तीवर हल्ला करणाऱ्या गावगुंडांना अडवण्याचा प्रयत्न करत होती एवढा गुंडांना एक तरुणी प्रतिकार करत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी लहुजी नगर मधील काही तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मात्र गावगुंडांवर गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप संध्या साठे यांनी केला आहे.
कल्याण मोहने येथील पोलीस चौकी परिसरात फटाक्याचे स्टॉलवर लहुजी नगर येथील दोन तरुण फटाके घेण्यासाठी गेले होते फटाक्याच्या देण्याघेण्यावरून वाद सुरू हा रात्री 9 च्या सुमारास झाला आपापसात झालेला वाद मिटला. मात्र मोहने येथील स्थानीक गावगुंड तरुणांनी मध्यरात्री लहुजी नगरमध्ये जाऊन घराची तोडफोड केली महिलांना मारहाण केली घरांवर दगडफेक केली या दगडफेकीत ९ ते १० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे
घटनेची माहिती मिळताच कल्याण खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र शेकडो गुंडांनी पोलिसांसमोर दगडफेक करत घरांची तोडफोड करून महिलांना मारहाण केली.
विशेष म्हणजे या सर्व गावगुंडांना संध्या साठे ही तरुणी वस्तीवर हल्ला करणाऱ्या गावगुंडांना अडवण्याचा प्रयत्न करत होती एवढा गुंडांना एक तरुणी प्रतिकार करत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी लहुजी नगर मधील काही तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मात्र गावगुंडांवर गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप संध्या साठे यांनी केला आहे.
राज्यभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या आनंदमयी वातावरणात हिंगोली शहरही मागे नाही. हिंगोली शहरात सध्या दिवाळीच्या सणाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. शहरभर विद्युत रोषणाईने सजवलेली इमारती, घरं आणि बाजारपेठा डोळे दिपवणारा नजारा निर्माण करत आहेत. फटाक्यांच्या आतिषबाजीने आकाश उजळून निघतंय, तर विविध रंगीबेरंगी आकाश कंदीलांनी शहराचं सौंदर्य अधिक खुलवलं आहे.
वाशिमच्या आमखेडा येथे पारधी समाजामध्ये घरगुती नातेसंबंधांवरून झालेल्या वादातून गंभीर चाकू हल्ला झाला. या हल्ल्यात अविनाश निमिचंद चव्हाण (हम) यांच्या मानेवर धारदार चाकूने वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर संदेश चव्हाण,स्वाती चव्हाण,गजानन चव्हाण, आकाश चव्हाण यांच्यावर चाकू हल्ला झाल्याने चारजण जखमी झाले, जखमींना तत्काळ वाशिम येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे... दरम्यान नाते संबंधातुन हा हल्ला झाला असून विविध गावातील पारधी समाजातील लोकांनीच हा हल्ला केला असून या घटनेनंतर हल्लेखोर मोटर सायकल सोडून घटनास्थळावरुन फरार झाले असून घटनेचा तपास जऊळका पोलीस करत आहे...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे पडघम वाजण्यास सुरुवात होताच दुसरीकडे स्वबळाचे नारेही घुमायला सुरुवात झालीय.आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महायुतीतल्या स्वबळावर थेट भाष्य केलंय...ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये दिलीय...ज्या ज्या ठिकाणी मित्रपक्ष एकमेकांचे स्पर्धक आहेत तिथं वेगळं लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय...मात्र त्याचवेळी ठाकरेंचा बालेकिल्ला असणाऱ्या मुंबईत मात्र महायुती म्हणून लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय..
पार्श्वभूमी
Maharashtra Live Updates: महाविकास आघाडीत नव्या भिडूवरुन रणकंदन सुरु असतानाच आता भाई जगतापांच्या बॉम्बमुळे आता नवा ट्विस्ट आलाय. मुंबईत राज ठाकरेच काय पण उद्धव ठाकरेंसोबतही काँग्रेस लढणार नाही असं खळबळजनक वक्तव्य भाई जगतापांनी केलंय. मुंबईत मनसे आणि शिवसेनेसह लढण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता नसल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र पक्षाचा निर्णय अंतिम असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे भाई जगतापांच्या या भूमिकेशी काँग्रेस हायकमांड सहमत होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्याचसोबत खुद्द उद्धव ठाकरे आणि शरद पवार नेमकी काय भूमिका घेणार हे येत्या काळातच स्पष्ट होईल. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...