- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र Maharashtra Live: ज्येष्ठ बालसाहित्यकार डॉ. सुरेश सावंत यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर
Maharashtra Live: ज्येष्ठ बालसाहित्यकार डॉ. सुरेश सावंत यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. राज्यातील पावसाचे अपडेट्स मिळवा एका क्लिकवर.
पुणे
हिंदी भाषा सक्तीला महाराष्ट्र साहित्य मंडळाचा तीव्र विरोध
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत दर्शवली नाराजी
पुण्यात आज महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते
यामध्ये महाराष्ट्र शासनाने पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केलेला नाही तसा शासन निर्णय काल प्रसिद्ध करण्यात आला आहे
याबाबत पत्रकार परिषद घेत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आपली भूमिका जाहीर केली आहे.
हिंदी सक्तीला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने तीव्र विरोध केला आहे
याबाबतचे एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले
इतर राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा शिकवली जात नाही
मग महाराष्ट्रात आपण का लादत आहात?
हिंदी व अन्य भाषा शिकवण्याचा निर्णय तात्काळ शासनाने रद्द करावा
या बैठकीला अध्यक्ष मिलिंद जोशी,भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख लेखक,अच्युत गोडबोले यांच्यासह अन्य लेखकाने सहभाग दर्शवला...
सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कमधील (Water park) फिरत्या पाळण्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली. येथील पार्कमध्ये वेगात पाळणा फिरत असताना एक पाळणा निसटून पडल्याने पाळण्यातील तिघेजण जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत भिगवण येथील तुषार धुमाळ नावाचे व्यावसायिक अत्यंत गंभीर जखमी झाले होते. धुमाळ यांना तात्काळ अकलूज येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे. धुमाळ हे भिगवण येथील नावाजलेले एलआयसी उद्योजक आहेत. दरम्यान, अपघातातील इतर दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कमधील (Water park) फिरत्या पाळण्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली. येथील पार्कमध्ये वेगात पाळणा फिरत असताना एक पाळणा निसटून पडल्याने पाळण्यातील तिघेजण जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत भिगवण येथील तुषार धुमाळ नावाचे व्यावसायिक अत्यंत गंभीर जखमी झाले होते. धुमाळ यांना तात्काळ अकलूज येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे. धुमाळ हे भिगवण येथील नावाजलेले एलआयसी उद्योजक आहेत. दरम्यान, अपघातातील इतर दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई मेट्रो 3 आता ONDC नेटवर्कवर
QR कोड स्कॅन करून ॲक्वालाईनचे तिकीट खरेदी करणे झाले आणखी सोपे!
मुंबई, १८ जून २०२५ – मुंबई मेट्रो मार्ग-३ (अॅक्वा लाईन) आता ONDC या डिजिटल नेटवर्कशी जोडली गेली आहे. यामुळे प्रवाशांना EaseMyTrip, RedBus, Yatri, OneTicket यांसारख्या ओळखीच्या अॅप्सवरून QR कोड तिकीट अगदी सहज खरेदी करता येणार आहे. ONDC नेटवर्क म्हणजे एक डिजिटल प्लॅटफॉर्म, ज्याद्वारे वेगवेगळ्या अॅप्सना जोडले जाते. त्यामुळे वेगळं अॅप डाऊनलोड करणे किंवा तिकिट खिडकीवर न जाता मेट्रो ३ च्या तिकीट विकत घेता येऊ शकते.
EaseMyTrip, RedBus, Miles & Kilometres (Telegram द्वारे), Tummoc, Yatri, OneTicket, Highway Delite, आणि Yatri – City Travel Guide अशा अॅप्सवरून आता QR कोड तिकीट खरेदी करता येईल. यामध्ये OneTicket अॅप असे आहे की, ज्यातून तुम्ही आता मुंबई मेट्रो मार्ग ३, १, २A आणि ७ च्या तिकिटांसह सहज प्रवास करता येईल.
मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे म्हणाल्या, “ही नवी सेवा सुरू करून आम्ही मेट्रो प्रवास अधिक सोपा, जलद आणि डिजिटल करत आहोत. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि भारत डिजिटल बनण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे जाईल.”
धुळे एलसीबीच्या पथकाने पकडला दारूने भरलेला ट्रक...
गुजरातच्या दिशेने जाणारा ट्रक धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर पकडत एक मोठी कारवाई केली आहे... सदर ट्रकची तपासणी केली असता त्यात लाखो रुपयांचा विदेशी दारूचा मोठा अवैध साठा आढळून आला. या कारवाई दरम्यान गाडीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु केली आहे.
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ट्रकची तपासणी केली जात होती. अशातच सोलापूरहून येणारा MH 13 DQ 9665 क्रमांकाचा ट्रक पोलिसांकडून अडविण्यात आला. ट्रकमध्ये काय आहे याची विचारणा चालकाकडे केली. त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे मिळाल्याने चालक, सहचालक यांना ताब्यात घेण्यात आले. ट्रकची तपासणी केली असता त्यात लपवून ठेवलेला लाखो रुपयांचा विदेशी दारूचा साठा मोठ्या प्रमाणावर आढळून आला... सदर कारवाईदरम्यान पोलिसांनी 41 लाख किमतीची दारू आणि 22 लाख रुपये किमतीचा ट्रक असे एकूण तब्बल 63 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी यावेळी दिली..
कराड पाटण
तब्बल दोन दिवसानंतर कराड चिपळूण राज्य महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू..
अधून मधून पाऊस येत असल्याने वाहतूक सुरळीत करण्यास व्यत्यय..
प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्यास विविध पातळीवरती प्रयत्न सुरू..
जास्त काळ वाहतूक सुरू राहणार नसल्याचा अंदाज..
फक्त दोन दिवसापासून अडकलेली वाहन सोडणार असल्याचं प्रशासनाचे म्हणणे..
पाऊस सुरु राहिल्यास पुन्हा वाहतूक बंद होण्याची शक्यता..
Anchor:-
ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यां सह ब्लॉक निहाय आढावा बैठक जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील राजनोली येथील सभागृहात काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस व कोकण प्रभारी यु बी वेंकटेश यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली संपन्न झाली.यावेळी भिवंडी,शहापूर,मुरबाड,
कल्याण ग्रामीण,अंबरनाथ तालुका ,अंबरनाथ शहर,बदलापूर शहर पदाधिकारी ब्लॉक अध्यक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी जिल्हा व ब्लॉक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी राहण्याची मागणी अनेकांनी केली.
Vio :-
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची काय रणनीती राहील याचे चिंतन करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून,राज्यातील महायुतीच्या भ्रष्ट शासन कारभार ,महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचे काम करीत आहेत याची माहिती सर्व काँग्रेस पदाधिकारी जनतेमध्ये जाऊन देतील.काँग्रेस मजबूत पक्ष आहे.
ईव्हीएम घोटाळा करून हे सरकार सत्तेवर आले आहे.काँग्रेस पक्ष निष्ठावंतांच्या पाठीशी ठाम उभे राहील असे वक्तव्य कोकण प्रभारी यु बी वेंकटेश यांनी केले.
Karad-Chiplun State Highway : तब्बल दोन दिवसानंतर कराड-चिपळूण राज्य महामार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. या भागात अधूनमधून पाऊस येत असल्याने वाहतूक सुरळीत करण्यास व्यत्यय आहे. प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्यास विविध पातळीवरती प्रयत्न करत आहे. मात्र, जास्त काळ वाहतूक सुरू राहणार नसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. फक्त दोन दिवसापासून अडकलेली वाहने सोडणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
अमरावती : सरकारी आणि खासगी आस्थापनेतील शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार शिक्षक संघटनेने सोमवारपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्याने आजपासून बेमुदत अन्नत्याग सुरू करण्यात आले आहे. आज विभागीय आयुक्त कार्यालयावर शासन आदेशाची प्रेतयात्रा काढण्यात आली. प्रहार शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष महेश ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु आहे.
Kalyan News : कल्याण पश्चिमेतील झुंजारराव मार्केट परिसरात राहणाऱ्या 75 वर्षीय कुसुम जगताप या आजीबाईंनी आपल्या कुटुंबासोबत केडीएमसी मुख्यालयाबाहेर उपोषणला बसल्या आहेत. आजीबाईंच्या घराच्या बाजूला एका व्यक्तीने अनधिकृत बांधकाम केल्यामुळे जगताप कुटुंबियांना त्रास होत आहे. या विरोधात हे उपोषण सुरू आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही किंवा कारवाईचा आश्वासन दिला जात नाही, तोपर्यंत आम्ही उठणार नाही, असा पवित्रा आजीबाईंनी घेतला आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमधून नाशिक येथे आलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर स्थगित करण्यात आले आहे. रोजंदारी वर्ग तीन आणि चार कर्मचाऱ्यांचे गेल्या अनेक दिवसांच्या मागण्या सरकारी कडून गंभीर्याने घेऊन त्यावर दोन दिवसात निर्णय घेण्याची आश्वासन आंदोलकांना देण्यात आले. नाशिक येथे आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी भेट घेऊन शिष्टमंडळाची सरकारसोबत भेट घडवून आणली आणि त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर आंदोलकांनी आपले आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
मनसे सोबत युती करायची का नाही उद्धव ठाकरे यांची माजी नगरसेवकांना विचारणा
युती केली तर फायदाच होईल नगरसेवकांची कबुली... मुंबईत युती संदर्भात अनुकूल वातावरण असल्याची माजी नगरसेवकांची कबुली
मुंबई महानगर पालिकेसाठी आपल्याला पालिकेसाठी ज्या पक्षासोबत युती करायची त्यासाठी तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेईन - उद्धव ठाकरे
तुम्ही सोबत राहिलात तुम्ही निष्ठावंत आहात येत्या काळात अनेक बैठका घ्यायच्या आहेत
माजी नगरसेवकांनी शिवसेना भवन येथे येऊन सामान्यांचे प्रश्न सोडवा खरच शिवसेना भवन येथे निवडणूक कार्यालय उघडणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना सांगितलं
येत्या ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत निवडणूक लागू शकते उद्धव ठाकरेंनी बैठकीत व्यक्त केला अंदाज
एकनाथ खडसे यांची भाजपवर मोठी टीका
सुधाकर बडगुजर आणि घोलप यांच्या भाजप पक्षप्रवेशावरून खडसेंनी स्वतःच्या भाजप पक्षप्रवेशा संदर्भात केलं विधान
सुधाकर बडगुजर यांचे दाऊद चा जो हस्तक आहे सलीम कुत्ता त्याच्यासोबत चे डान्स चे फोटो प्रकाशित झाले होते... त्यामुळे मोठा विरोध निर्माण झाला होता आणि आता
सुधाकर बडगुजर यांचा आता भाजपात प्रवेश झाला त्यामुळे भारतीय जनता पार्टी हे पवित्र झाली आहे
एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये प्रवेश देताना आक्षेप आहे म्हणून नाथाभाऊंना प्रवेश दिला गेला नाही तेव्हा भाजपा अपवित्र होत होता
ज्येष्ठ बालसाहित्यकार डॉ. सुरेश सावंत यांना त्यांच्या बालसाहित्यासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 'आभाळमाया' ह्या बालकवितासंग्रहाची ह्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तसंच, खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीसाठी प्रदीप कोकरे यांना युवा साहित्यिकाचा पुरस्कार जाहीर झालाय.
वीस विद्यार्थ्यांची अट पुढे करून सरकारने मागील दाराने हिंदी राज्यभर सक्तीची केली आहे.. सरकारने केलेली ही चालाखी आणि दांडगाई मराठी जनतेचा घोर विश्वासघात असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने म्हंटले आहे.. सरकारने आपले हे पाऊल तातडीने मागे घ्यावे आणि महाराष्ट्रात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणत्याही प्रकारे हिंदीची तसेच त्रिभाषा सूत्राची सक्ती करू नये अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी केली आहे..
कोल्हापुर : हातकणंगले तालुक्यातील आळते येथील मदरशात शिक्षण घेणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थ्याची क्रूर हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फैजान नाजिम (रा. बिहार) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे, हा खून त्याच्याच अल्पवयीन मित्राने केल्याचा कबुली दिली आहे. आरोपीने शाळेला सुट्टी मिळावी म्हणून ही कृती केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत संशयिताने फैजानच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला आणि विजेचा शॉक देऊन त्याचा खून केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याला बाल निरीक्षणगृहात पाठवण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, मृत्यूच्या नेमक्या कारणांचा शोध घेत आहेत.
Raj Thackeray: हिंदी भाषा सक्तीचा विषय येत नाही. उत्तरेत काही राज्यात ही भाषा वापरली जाते. त्यांना त्यांची स्थानिक बोली भाषा संपवू द्यायची नाही. सध्या कागदी घोडे नाचवत आहे. जर भाषा सक्ती नाही तर मग पुस्तक छपाई कशासाठी करत आहात? उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे त्यासाठी भाषा सक्ती केली जात आहे. जी भाषा सक्तीची नाही, जीचा काही उपयोग नाही, अशी भाषा शिकवू नका. सरकारच्या छुप्या मार्गाने भाषा शिकवण्याला बळी पडू नका, अन्यथा आम्ही हा महाराष्ट्रद्रोह समजू. आयएएस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा दबाव आहे का? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
Raj Thackeray: हिंदी भाषा सक्तीचा विषय येत नाही. उत्तरेत काही राज्यात ही भाषा वापरली जाते. त्यांना त्यांची स्थानिक बोली भाषा संपवू द्यायची नाही. सध्या कागदी घोडे नाचवत आहे. जर भाषा सक्ती नाही तर मग पुस्तक छपाई कशासाठी करत आहात? उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे त्यासाठी भाषा सक्ती केली जात आहे. जी भाषा सक्तीची नाही, जीचा काही उपयोग नाही, अशी भाषा शिकवू नका. सरकारच्या छुप्या मार्गाने भाषा शिकवण्याला बळी पडू नका, अन्यथा आम्ही हा महाराष्ट्रद्रोह समजू. आयएएस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा दबाव आहे का? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली तातडीची बैठक.
बैठकीसाठी संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार, नितीन सरदेसाई, नयन कदम, अविनाशी जाधव, शालिनी ठाकरे भेटीसाठी पोहोचले
बैठकीनंतर राज ठाकरे घेणार पत्रकार परिषद.
थोड्याच वेळात बैठकीला सुरूवात
सत्ताधारी पक्षाच्या आमदार आणि मंत्र्यांची सरकार विरोधात तक्रार?
आदिवासी समाजाचा निधी लाडक्या बहीण योजनेसाठी वळवणे, पेसा कायदा अंतर्गत भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवणे या प्रमुख मागणीसाठी आदिवासी आमदारांचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला पोहोचेल
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ राज्यपालांना भेटायला पोहचलं
आदिवासी मंत्री अशोक उईके, आमदार राजेंद्र गावित, आमदार केराम, राजू तोडसाम, हिरामण खोसकर, आमशा पाडवी, नितीन पवार पोहोचले
अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन केली हत्या
कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील आळते इथे धक्कादायक घटना
धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत घडला प्रकार (( मदरसा ))
शिक्षण संस्था बंद पडून घरी जायला मिळावे म्हणून विद्यार्थ्यांनीच केलं कृत्य
फैजान नाजिमा असं हत्या केलेल्या अकरा वर्षाच्या विद्यार्थ्याचे नाव
फैजान हा मूळचा बिहार राज्यातील रहिवासी
फैजान याचा झोपलेल्या अवस्थेत संशयास्पद मृत्यू झाल्याने केली चौकशी
चौकशीत संस्थेतीलच एका अल्पवयीन विद्यार्थ्याने इलेक्ट्रिक वायरचा शॉक देऊन हत्या केल्याचे कबूल केले
अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन केली हत्या
कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील आळते इथे धक्कादायक घटना
धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत घडला प्रकार (( मदरसा ))
शिक्षण संस्था बंद पडून घरी जायला मिळावे म्हणून विद्यार्थ्यांनीच केलं कृत्य
फैजान नाजिमा असं हत्या केलेल्या अकरा वर्षाच्या विद्यार्थ्याचे नाव
फैजान हा मूळचा बिहार राज्यातील रहिवासी
फैजान याचा झोपलेल्या अवस्थेत संशयास्पद मृत्यू झाल्याने केली चौकशी
चौकशीत संस्थेतीलच एका अल्पवयीन विद्यार्थ्याने इलेक्ट्रिक वायरचा शॉक देऊन हत्या केल्याचे कबूल केले
बीड: उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री धनंजय मुंडे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री छगन भुजबळ, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या दिग्गजांच्या रांगेत चक्क सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडचा फोटो असलेले बॅनर बीडमध्ये झळकले. राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बप्पासाहेब घुगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी केलेल्या बॅनरबाजीत हा प्रकार घडला. हे सर्व बॅनर अनधिकृतपणे लावले गेले होते. याची तोंडी तक्रार येताच काही तासांत प्रशासनाने हे बॅनर काढले. विशेष म्हणजे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड हा राष्ट्रवादीच्या कोणत्याही पदावर नाही. मात्र त्याचा दरारा जिल्ह्याच्या पक्ष संघटनेत कायम असल्याचे दिसून आले आहे..
भरधाव जाणाऱ्या कंटेनरची दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने ऍसिड घेऊन जाणाऱ्या टँकरला धडक
सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गवर मुळेगाव तांडा येथे भीषण अपघात, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली कैद
अपघातात एका वाहन चालकाचा मृत्यू तर एक जण जखमी
अपघातात टँकरमधील नायट्रिक ॲसिड बाहेर पडून नागरिकांना श्वसानाचा जाणवत होता त्रास
या अपघातसांदर्भात सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
रायगड: भूवैज्ञानिक यांनी केलेल्या यंदाच्या सर्वेक्षणात रायगड जिल्ह्यात एकूण 392 गावे दरड प्रवण क्षेत्रात असल्याची बाब उघडकीस आली आहे.दरवर्षी पावसाळा आला की रायगड मधील अतिधोकादायक गावांना जिल्हा प्रशासन सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देतो. कोणतीही दुर्घटना घडू नये याकरिता जिल्हा प्रशासनाकडून ही खबरदारी घेतली जाते. त्यामुळे यंदा देखील 392 गावांना दरडीचा धोका असल्याची बाब समोर आल्यानंतर आता जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे.महाड, पोलादपूर, खालापूर तालुक्यात यंदाची दरड प्रवण क्षेत्रातील गावांची आकडेवारी जास्त असून या भागात एन डी आर एफ आणि विशेष रेस्क्यू टीम अलर्ट मोडवर असल्याच पाहायला मिळतय.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन
पुढील काही महिने भाजपमध्ये पक्ष प्रवेशाचा धडाका
नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण विभागात महाविकास आघाडीला भगदाड पाडणार
महाविकास आघाडीत नाराज असलेल्यांना भाजप गळाला लावणार
महाविकास आघाडीचे काही बडे नेते भाजपच्या संपर्कात
भाजपच्या वरिष्ठ नेत्याची माहिती
विद्यार्थ्याच्या आत्महत्यानंतर जमावाकडून इचलकरंजीत अकॅडमीच्या कार्यालयाची तोडफोड
यश यादव असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव
काल दुपारी बारावीच्या विद्यार्थ्याने बाथरूममध्ये केली होती आत्महत्या
आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप नातेवाईकांनी केला होता
रात्री उशिरापर्यंत अकॅडमीच्या समोर तणावाचे वातावरण
विद्यार्थ्याच्या आत्महत्यानंतर जमावाकडून इचलकरंजीत अकॅडमीच्या कार्यालयाची तोडफोड
यश यादव असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव
काल दुपारी बारावीच्या विद्यार्थ्याने बाथरूममध्ये केली होती आत्महत्या
आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप नातेवाईकांनी केला होता
रात्री उशिरापर्यंत अकॅडमीच्या समोर तणावाचे वातावरण
विद्यार्थ्याच्या आत्महत्यानंतर जमावाकडून इचलकरंजीत अकॅडमीच्या कार्यालयाची तोडफोड
यश यादव असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव
काल दुपारी बारावीच्या विद्यार्थ्याने बाथरूममध्ये केली होती आत्महत्या
आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप नातेवाईकांनी केला होता
रात्री उशिरापर्यंत अकॅडमीच्या समोर तणावाचे वातावरण
विद्यार्थ्याच्या आत्महत्यानंतर जमावाकडून इचलकरंजीत अकॅडमीच्या कार्यालयाची तोडफोड
यश यादव असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव
काल दुपारी बारावीच्या विद्यार्थ्याने बाथरूममध्ये केली होती आत्महत्या
आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप नातेवाईकांनी केला होता
रात्री उशिरापर्यंत अकॅडमीच्या समोर तणावाचे वातावरण
बीड: शेत जमिनीच्या कारणास्तव होणारे वाद रोखण्यासाठी बीड पोलिसांनी "पोलीस आपले बांधावर" ही संकल्पना सुरू केलीय. मागील काही दिवसांमध्ये शेतीच्या बांधावरून आणि वादातून मोठे वाद उफाळून येत असल्याच्या घटना समोर येत आहेत. आणि यालाच रोख लावण्याकरिता पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी पोलीस आपले बांधावर ही संकल्पना राबवत आहेत.
खरी पूर्व हंगामात शेती मशागतीचे कामे सुरू असताना शेतातील बांधावरून अनेकदा वाद समोर येतात. याचे रूपांतर हाणामारी होते. आणि यातून गंभीर स्वरूपाच्या घटना देखील घडतात. पोलिसांकडे शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर खात्री करून योग्य त्या कारवाया करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत.
पवई तलाव, जो बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अखत्यारितील प्रमुख कृत्रिम तलावांपैकी एक आहे, आज सकाळी सुमारे 6 वाजता भरून वाहू लागला आहे.
या तलावाची साठवण क्षमता ५४५ कोटी लिटर (५.४५ अब्ज लिटर) आहे. येथील पाणी पिण्यायोग्य नसून मुख्यतः औद्योगिक उपयोगासाठी तसेच आरे दूध संकुलातील अन्य अपेय कारणांसाठी वापरले जाते.
गेल्या दोन दिवसांतील सततच्या मुसळधार पावसामुळे तलावाच्या कॅचमेंट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तलावाची पातळी पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचली आहे आणि त्यामुळे तो वाहू लागला आहे.
सध्या तलावातील पाण्याची पातळी १९५.१० फूट इतकी नोंदवण्यात आली आहे.
ॲलर्ट मोटरमनने वाचवले एका व्यक्तीचे प्राण
पश्चिम रेल्वेच्या मीरा रोड स्थानकाजवळ शनिवारी संध्याकाळी एक व्यक्ती आत्महत्या करण्याच्या उद्देशाने फास्ट ट्रॅकवरील रुळांवर होता झोपून
त्याचवेळी येणाऱ्या लोकल मध्ये अरविंद कुरिल हे मोटरमन होते, त्यांनी या व्यक्तीला पाहिले आणि लागलीच गाडीला थोड्या अंतरावर थांबवले
लोकल थांबलेली दिसताच तो व्यक्ती उठला आणि लोकलच्या डब्याखाली जाऊन बसला
त्यानंतर जी आर पी ने त्याला रेस्क्यू केले आणि स्थानकावर आणले
मात्र अरविंद कुरिल यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आज त्या व्यक्तीचे प्राण वाचले
यासाठी पश्चिम रेल्वेकडून कुरिल यांचा सन्मान करण्यात येणार
रायगडच्या पेण तालुक्यातील दुरशेत ग्रामस्थांनी कालपासून दुरशेत गावच्या मुख्य रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन सुरू केलं होत. गावच्या हद्दीत सुरू असलेल्या दगड उत्खनन कारखान्यामुळे गावाला होणारा त्रास आणि रस्त्याची झालेली चाळण यामुळे अवजड वाहतुकीचा परिणाम गावावर आणि अपघातास कारणीभूत ठरत असून भयभीत झालेल्या दुरशेत गावकऱ्यांनी कालपासून ही आंदोलन सुरू केलं होत. जोपर्यंत प्रशासन आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आपण रस्त्यावरून हलणार नाही असा पवित्रा घेतलेल्या ग्रामस्थांना अखेर रात्री 12 वाजता पेणचे तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी लेखी स्वरूपात आश्वासन देत गावकऱ्यांना विश्वास दिला. येत्या 15 दिवसाच्या कालावधी मध्ये अवजड वाहने बंद करून लवकरच सुरू असलेला हा प्रकार थांबवून त्याला पर्यायी उपाययोजना केल्या जातील असा विश्वास गावकऱ्यांना लेखी स्वरूपात दिल्यानंतर या गावकऱ्यांनी अखेर आपले आंदोलन रात्री उशिरा मागे घेतले.
रस्त्याच्या कामात कुचराई करणाऱ्या तीन कंत्राटदारांना नागपूर महापालिकेकडून एक कोटीचा दंड लावण्यात आला आहे..
शहरात मलनिस्सारण वाहिनी, जलवाहिनी, वीज केबल सिमेंट रस्ते अशी विविध कामे सुरू आहेत.या कामासाठी ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे.
हे खोदकाम ३१ मे पर्यंत बुजवण्यात यावे आणि पावसाळ्यात खोदकाम करू नये अशी सूचना पालिकेने दिली होती.. तरीही कंत्राटदारांनी कामात कूचराई केली.. त्यामुळे महापालिकेने तीन कंत्राटदारांना एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे..
केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत मलनिस्सारण वाहिनी बांधण्याचे कंत्राट तीन कंत्राटदारांना दिले होते.. वारंवार सूचना देऊनही तीनही कंत्राटदारांनी रस्ता समतलीकरणाचे काम वेळेवर पूर्ण केले नाही..
यामध्ये मेसर्स लक्ष्मी सिव्हिल इंजियरिंग सर्व्हिसेस प्रा.लिमिटेड, मे. कलथिया इंजियरिंग अँड कन्ट्रक्शन लिमिटेड आणि मे. पी. दास इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे.. त्यांना एक कोटी रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे..
जयस्वाल कुटुंबातील तिघांचे पार्थिव वणीत दाखल
केदारनाथ येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत 15 जूनला झाला होता मृत्यू
राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल आणि दोन वर्षांची काशी जयस्वाल मृतकांची नावे
डीएनए चाचणीनंतर मृतदेह दिले नातेवाईकांच्या ताब्यात
वणीत थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार
नालासोपारा : वसई विरार शहरात रात्रभर पावसाचा जोर पाहायला मिळाला. सकाळपासूनच येथे पावसाची संततधार सुर आहे. अधून मधून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे शहराच्या अनेक सखल भागांतील मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत. यामुळे याचा थेट फटका शहराच्या वाहतुकीवर बसला आहे. तसेच साचलेल्या पाण्यातून कामावर निघालेले चाकरमनी तसेच शाळेतील विद्यार्थी आणि पालकांचे जावं लागत आहेत. साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे अनेक वाहने रस्त्यावर बंद पडली आहेत. पावसाचा जोर जर दिवसभर असाच राहिला तर मात्र वसई विरार पूर्णपणे जलमय होवून, याचा फटका वसई विरारकरांना बसू शकतो.
इंद्रायणी काठी लाखो वारकरी जमले आहे. मात्र या सोहळ्याला कोणताही गालबोट लागू नये यासाठी SDRF च पथक तैनात आहे. वारकऱ्यांना वरंवार सूचना दिल्या जात आहे. आणि दुर्घटना होऊ नये याची काळजी घेतली जात आहे.
इयत्ता पहिलीपासून तृतीय भाषा हिंदी शिकवण्यासंबंधी "अनिवार्य" शब्द मागे घेतला तरी सर्वसाधारणपणे तृतीय भाषा म्हणून हिंदी भाषा शिकवली जाणार, शालेय शिक्षण विभागाचा नवा शासन निर्णय जारी
इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्र अवलंबले जाणार, हिंदी ऐवजी इतर भाषा शिकायची असल्यास वर्गामध्ये 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी इतर भाषा विषय शिकण्याची इच्छा दर्शवल्यास शिक्षक उपलब्ध करून देणार किंवा ऑनलाईन भाषाविषय शिकवला जाणार
राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४ नुसार मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता १ ली ते ५ वी साठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल
परंतु या विद्यार्थ्यांनो हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शविल्यास, त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल.
तथापि, हिंदी ऐवजी इतर भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्यास इच्छुकता दर्शविणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतील इयत्तानिहाय संख्या ही किमान २० इतकी असणे आवश्यक राहील.
हिंदी ऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्याकरिता उपरोक्तप्रमाणे विहित किमान २० विद्याथ्यांनी इच्छुकता दर्शविल्यास, त्या भाषेच्या अध्यापनाकरिता शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल अन्यथा सदर भाषा ही ऑनलाइन पध्दतीने शिकविण्यात येईल. सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य भाषा असेल.
गोंदिया जिल्ह्यात अवैध रेती उत्खननावर लगाम घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेतर्फे दवनीवाडा हद्दीतील साईटोला येथील वैनगंगा नदीपात्रात ही कारवाई करण्यात आली. यात पोलिसांनी ५ टिप्पर व रेती असा १ कोटी १० लाख ६९ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. दवनीवाडा हद्दीतील साईटोला येथील वैनगंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीचे खनन केले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे पथकाने धाड टाकून रेतीची अवैध वाहतूक करताना 5 टिप्पर ताब्यात घेतले. या टिप्परमध्ये एकूण २३ ब्रास रेती होती. पथकाने टिप्पर आणि रेती असा एकूण १ कोटी १० लाख ६९ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी टिप्पर चालक व मालकांविरोधात चोरी आणि अवैध खननप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे
सोन्याच्या दुकानातून दागिने चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. 17 जून रोजी केज येथील कुंदन जोगदंड यांच्या ज्वेलर्स दुकानात अज्ञात चार महिलांनी गिऱ्हाईक बनून पायातील पैंजण आणि इतर दागिने लंपास केले होते. या प्रकरणात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवत या चार महिलांना बीड शहरातून ताब्यात घेतले आहे. चोरलेले दागिने विकण्यासाठी जात असतानाच पोलिसांनी या चौघींना अटक केली. या प्रकरणात आणखी गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासूनच त्रिभाषा सूत्र स्वीकारले असून मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तिसरी भाषा ही अनिवार्य असा शासन निर्णय. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसोबतच राज्य अभ्यासक्रम आराखडा नव्या शैक्षणिक वर्षापासून लागू करताना मराठी शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर पालकांनी - राजकीय नेत्यांनी आणि शिक्षक संघटनांनी त्याला तीव्र विरोध केला होता
याविरोधानंतर सरकारने बाजू मांडत शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय अखेर मागे घेत असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली होती. आता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून नवा शासन निर्णय काढण्यात आला आहे
यात सांगण्यात आले आहे की मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता १ ली ते ५ वी साठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल; परंतु या विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शविल्यास, त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल. एकीकडे सरकारने अन्य भाषांचा पर्याय देण्याचा प्रयत्न करत नियम ही दिला आहे इतर भाषा शिकण्यासाठी किमान २० विद्यार्थ्यांची इच्छुकता असावी असे ही म्हंटले आहे
छत्रपती संभाजीनगर मधील सर्वात मोठ्या दरोड्यात एक खळबळजनक बाब समोर आली आहे. लड्डाच्या घरी करोडो रुपये पोत्यात भरून आहेत अशी टीप जवळचाच मित्र बाळासाहेब इंगोले याने दिली होती. पण बाळासाहेब इंगोले आणि त्याच्या काही साथीदारांना ही रक्कम जादूटोणा करून पळवायची होती. म्हणजे एक महाराज जादूटोणा करतो आणि घरात असलेले पैसे हात न लावता बाहेर काढतो, अशी त्यांची धारणा होती . त्यांनी तो महाराजही शोधून ठेवला होता. पण याची खबर हासबे नावाच्या आरोपीला मिळाली आणि त्यांनी आपल्या टीमसह दरोडा टाकला.
गोव्यातील मोपा विमानतळावरून लखनऊकडे निघालेल्या इंडिगो कंपनीचे विमान हवेत झेपावल्या नंतर हेलखावे खावू लागले. त्यामुळे भेदरलेल्या प्रवाशांनी भीतीने आरडाओरड केली. प्रसंगावधान राखत वैमानिकाने तात्काळ हे विमान लँडिंग केले. त्यामुळे दुर्घटना टळली. त्यानंतर हे विमान प्रवाशांना घेऊन लखनऊला गेल. विमानाने लखनऊमध्ये सुरक्षित लँडिंग केलं. मात्र, प्रवाशांनी आपला जीव मुठीत धरून प्रवास केला. ही टेक्निकल चूक आहे की मानवनिर्मित चूक आहे याची चौकशी करायची मागणी प्रवाशांनी केली.
जीवाची मजा करण्यासाठी आंबोलीत आलेल्या ओल्ड गोवा आणि बार्देस येथील दहा ते बारा युवा "राईडर्सनी" थेट सावंतवाडी पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांशी झटापट केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. आंबोली घाट उतरत असताना दापोली येथे कार चालकाने गोव्यातील दुचाकीस्वारांना बाजूला होण्यास सांगितले. यावरून वाद सुरू झाला. गोव्यातील सुमारे १० ते १२ तरुण आंबोली पर्यटन स्थळावर एकत्र आले होते. त्यांनी बांदा येथील कारचा पाठलाग केला. दाणोली येथील पोलीस नाक्यावर कार थांबताच, गोव्यातील तरुणांनी एकत्र येऊन हेल्मेटने कारवर आदळत दादागिरी केली. त्यानंतरही त्यांचा पाठलाग सुरूच होता. सावंतवाडी बस स्थानकासमोरील बांधकाम विभागाच्या वळणावर त्यांनी कारसमोर दुचाकी लावून अपघातासारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोव्यातील तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस ठाण्याच्या आवारातही गोव्यातील तरुणांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. बांदा येथील कार चालकही तेथे पोहोचले होते. पोलिसांनी विचारपूस करत असतानाच, गोव्यातील तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घातली आणि धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत एका पोलीस हवालदाराच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. चौकशी करून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्री संत तुकाराम महाराजांची पालखी बुधवारी दुपारी अडीच वाजता देहूमधील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत.
पार्श्वभूमी
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहूतून बुधवारी दुपारी प्रस्थान ठेवणार आहे आणि याच सोहळ्याची लगबग सध्या देहूत पाहायला मिळते आहे. विविध नेतेमंडळी या प्रस्थान सोहळ्यासाठी देहूत दाखल होणार आहेत. इंद्रायणी काठावर वारकऱ्यांची मांदीयाळी पाहायला मिळत आहे. यंदा संस्थानाने तीन बैलजोड्या खरेदी केल्या आहेत. पालखीपुढे चालणारा मानाचा पेठ बाभुळगावकरांचा अश्व मंगळवारी चिखली येथे मुक्कामी असणार आहे. (ashadhi wari 2025)