Maharashtra Live Blog Updates: मंत्री जयकुमार रावल यांनी घडविला इतिहास; दोंडाईचा पालिका स्थापनेनंतर प्रथमच बिनविरोध

Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...

Advertisement

मुकेश चव्हाण Last Updated: 21 Nov 2025 03:53 PM
मंत्री जयकुमार रावल यांनी घडविला इतिहास; दोंडाईचा पालिका स्थापनेनंतर प्रथमच बिनविरोध

- मंत्री जयकुमार रावल यांनी घडविला इतिहास


- दोंडाईचा पालिका स्थापनेनंतर प्रथमच बिनविरोध


- नगराध्यक्षांसह सर्व 26 जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध


- महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज घेतले मागे...


- राज्यातील पहिलीच दोंडाईचा नगरपरिषद संपूर्णपणे झाली बिनविरोध

पार्श्वभूमी

Maharashtra Live Blog Updates: राज्यातील नगपरिषद, नगरपंचायत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उमेदवारी न मिळालेल्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बंडखोरी केलीये. तर अनेक अपक्ष सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची डोकेदुखी वाढवणार आहेत, असं असताना बंडखोर आणि आणि अपक्ष उमेदवारांवर काही नगरपालिका आणि नगर पंचायतींचं समिकरण ठरणार आहे. किती ठिकाणी मविआ आणि किती ठिकाणी महायुती याचं चित्रही आज स्पष्ट होणार आहे. तसंच किती नगर पंचायती या बिनविरोध होणार हेदेखील आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळे कोणते उमेदवार अर्ज मागे घेणार, तर कुणाचं मन वळवण्यात नेत्यांना यश येणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. येत्या २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.