मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या  (Corona Update) आटोक्यात येत असल्याचं चित्र असून आज राज्यात 237 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 455  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.


राज्यात आज  दोन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद


राज्यात आज  दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,21, 365  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 87, 94, 179   प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 


राज्यात सध्या  2075 अॅक्टिव्ह रुग्ण 


राज्यात सध्या 2075 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत  334  अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल  अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 192 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. 


गेल्या 24 तासात देशात 2 हजार 876 नवीन कोरोना रुग्णांची नोंद


गेल्या 24 तासात देशात 2 हजार 876 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 98 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. काल देशात 2 हजार 568 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती, तर 97 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. आज कोरोना रुग्णांच्या संख्येत 12 टक्क्यांची वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ही 32 हजार 811 एवढी आहे. दरम्यान, काल देशात 4 हजार 722 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. आत्तापर्यंत कोरोनामुले मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही 5 लाख 16 हजार 72 एवढी झाली आहे. तर आत्तापर्यंत 4 कोटी 24 लाख 50 हजार 55 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.