मुंबई : राज्यातील  कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 7 हजार 142 नव्या रुग्णांची भर पडली असून 57  जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 20 हजार 222  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.  


राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधितांची नोंद  नाही


राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही.आतापर्यंत 3334 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 1701 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 


राज्यात आज  92 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद


राज्यात आज 92 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.83 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 75 लाख  93 हजार 291 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.06 टक्के आहे.  सध्या राज्यात  5 लाख 78  हजार 076 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2396  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 59 लाख 05 हजार 676 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


 मुंबईत नव्या 441 कोरोनाबाधितांची नोंद


मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबईत 441 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 1 हजार 115 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 4 हजार 096 इतकी झाली आहे. तर कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 840 दिवसांवर आला आहे. कालच्या तुलनेत यामध्ये 32 दिवसांची वाढ झाली आहे. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर 0.08% टक्के इतका झाला आहे. मुंबईत मागील 24 तासांत नऊ रुग्णांचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे. 


हे ही वाचा : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha