मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. आज राज्यामध्ये 338 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये एकूण 276 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत


आज एका रुग्णाचा मृत्यू 


राज्यात आज एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे. तर राज्यात आतापर्यंत 77,33, 452 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.10 टक्के इतके झाले आहे. 


राज्यात 2039 सक्रिय रुग्णांची नोंद


राज्यात आज एकूण 2039 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 1430 रुग्ण हे मुंबईमध्ये आढळतात. तर त्या खालोखाल पुण्यामध्ये 284  इतके सक्रिय रुग्ण आहेत. 


गेल्या 24 तासांत 1675 नवे कोरोनाबाधित


सध्या देशात कोरोना व्हायरसच्या (Covid-19) प्रादुर्भावात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 1675 रुग्णांची नोंद झाल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 23 मे रोजी कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 2022 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. अशातच देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या वाढून 4,31,40,068 व र पोहोचली आहे. अशातच, गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे सध्याच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 14,481 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 31 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 5,24,490 वर पोहोचली आहे. अशातच, कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा राष्ट्रीय दर 98.75 टक्के आहे.  कोरोना संसर्गाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील दैनिक संसर्गाचा दर 0.41 टक्के आहे आणि साप्ताहिक संसर्ग दर 0.49 टक्के आहे. देशात एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 4,26,00,737 वर पोहोचली आहे.