मुंबई : जवळपास गेल्या अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन असलेला महाराष्ट्र हळूहळू अनलॉक होत आहे. त्यामुळे, व्यापाऱ्यांसह नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. मात्र, सरकारने 5 टप्प्यात राज्य अनलॉक करण्याबाबत नियमावली आखली आहे. दर शुक्रवारी नियमावली जाहीर होणार असून  यानुसार तुमचा जिल्हा कोणत्या लेव्हलमध्ये आहे हे समजणार आहे. त्यानुसार सरकारने या आठवड्याचे (14 ते 20 जून)  नियमावली जाहीर केली आहे

जिल्ह्यानिहाय पॉझिटिव्हिटी दर?

 अहमदनगर जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 2. 63 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश हा पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.

अकोला जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 5. 37 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

अमरावती जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 4.36 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.

औरंगाबाद  जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 5.35 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या  टप्प्यात करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 5.22 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या  टप्प्यात करण्यात आला आहे.

भंडारा जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 1.22 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश पहिल्या  टप्प्यात करण्यात आला आहे.

बुलढाणा  जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 2.37 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.

चंद्रपूर   जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट ०. 87 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश पहिल्या  टप्प्यात करण्यात आला आहे.

धुळे   जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 1.64 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश पहिल्या  टप्प्यात करण्यात आला आहे.

गडचिरोली   जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 5.55  टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

गोंदिया  जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट   0.83 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश पहिल्या  टप्प्यात करण्यात आला आहे.

हिंगोली  जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट  1.20 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश पहिल्या  टप्प्यात करण्यात आला आहे.

जळगाव   जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 1.82 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश पहिल्या  टप्प्यात करण्यात आला आहे.

जालना   जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 1.44  टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश पहिल्या  टप्प्यात करण्यात आला आहे.

कोल्हापूर  जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट  15.85 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश चौथ्या  टप्प्यात करण्यात आला आहे.

लातूर  जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट  2.43 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश पहिल्या  टप्प्यात करण्यात आला आहे.

मुंबई आणि मुंबई उपनगर  जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 4.40  टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या  टप्प्यात करण्यात आला आहे.

नागपूर  जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 4.36 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

नांदेड  जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट  1.19 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश पहिल्या  टप्प्यात करण्यात आला आहे.

नंदुरबार  जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट  2. 06 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश पहिल्या  टप्प्यात करण्यात आला आहे.

नाशिक   जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट  7.12 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश चौथ्या  टप्प्यात करण्यात आला आहे.

उस्मानाबाद  जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट  5.16 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

पालघर   जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 4.43 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या  टप्प्यात करण्यात आला आहे.

परभणी   जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट   2.30 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश पहिल्या  टप्प्यात करण्यात आला आहे.

पुणे   जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट  11.11 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

रायगड  जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 13.33 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश चौथ्या  टप्प्यात करण्यात आला आहे.

 रत्नागिरी जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 14.12 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश पहिल्या  टप्प्यात करण्यात आला आहे.

सांगली   जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट  6.89 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या  टप्प्यात करण्यात आला आहे.

 सातारा जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट   11.30 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश चौथ्या  टप्प्यात करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग   जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट  11.89 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश चौथ्या  टप्प्यात करण्यात आला आहे.

सोलापूर  जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट   3.43 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश पहिल्या  टप्प्यात करण्यात आला आहे.

ठाणे  जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट  5. 92टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या  टप्प्यात करण्यात आला आहे.

 वर्धा जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट  2. 05 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश पहिल्या  टप्प्यात करण्यात आला आहे.

वाशिम  जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट  2.25 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश पहिल्या  टप्प्यात करण्यात आला आहे.

 यवतमाळ जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 2. 91 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात   जिल्ह्याचा समावेश पहिल्या  टप्प्यात करण्यात आला आहे.

 

स्तरनिहाय अनलॉकची प्रक्रिया कशी असणार?  काय, काय सुरु राहणार?

स्तर - 1

- सर्व प्रकारची दुकानं पूर्ववत सुरु होणार, मॉल, दुकानं, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह नियमितपणे सुरु होणार- लोकल सेवा पूर्ववत होईल, मात्र स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला निर्बंध घालण्याची मुभा असेल- जिम, सलू, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी, सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली होतील- सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत होईल, इथे जमावबंदी नसेल- खासजी कार्यालये सुरु होती, तर शासकीय कार्यलये 100 टक्के क्षमतेने सुरु होतील - विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल - लग्नसोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतीही बंधनं नसतील, या भागात जमावबंदी नसेल.

स्तर - 2

- 50 टक्के क्षमतेने रेस्टॉरंट सुरु राहतील- मॉल्स आणि सिनेमगृह 50 टक्के सुरु राहतील- सार्वजनिक जागा, मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्ण सुरु राहतील- बांधकाम क्षेत्रातील पूर्ण कामे सुरु राहतील- कृषी क्षेत्रातील कामे पूर्ण सुरु राहतील- ई सेवा पूर्ण सुरु राहिल- जिम, सलून, स्पा, वेलनेस सेंटर 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील- बसेस बैठक क्षमता पूर्ण क्षमतेने सुरू राहतील- जिल्हयाच्या बाहेर खाजगी वाहन , बसेस, इतर राज्यात जाणारी लोकल सेवा, टॅक्सी यांना परवानगी आहे. मात्र पाचव्या स्तरातील जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची आवश्यकता असेल.

स्तर - 3

- अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहतील अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार बंद राहतील- मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद राहतील- हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत खुली रहातील. दुपारी 2 नंतर पार्सल सेवा सुरू राहिल. शनिवार आणि रविवार बंद राहतील.- सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 यावेळेत सुरू रहातील- खाजगी आणि सरकारी कार्यालयात 50 टक्के क्षमतेने उपस्थिती राहील- इंडोर खेळले जाणारे स्पोर्ट्स बंद राहतील- सिनेमा चित्रीकरणाला स्टुडीओ मध्ये परवानगी असेल- सामाजित, सांस्कृती, मनोरंजनात्म कार्यक्रमाला 50 टक्के क्षमतेने दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील (सोमवार ते शुक्रवार)-लग्न सोहळे 50 जणांची उपस्थिती, अंत्यसंस्कार 20 जणांची उपस्थिती, इतर बैठका 50 टक्के उपस्थित राहील- कृषी क्षेत्रातील कामांना आणि ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील- दुपारी 2 वाजल्यानंतर जमावबंदी कायम राहिल

स्तर - 4- अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) उघडी राहतील- अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं पुर्ण वेळ बंद रहातील- सिनेमागृह, मॉल पूर्णपणे बंद राहतील- हॉटेलमधील फक्त पार्सल सेवा सुरू राहील- सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 सुरू रहातील (सोमवार ते शुक्रवार)- अत्यावश्यक सेवेतील खाजगी कार्यालयात फक्त 25 टक्के उपस्थिती राहील- शासकीय कार्यालयात 25 टक्के उपस्थिती- स्पोर्टसमध्ये आईटडोर सकाळी 5 ते 9 (सोमवार ते शुक्रवार) सुरु राहतील- कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमालाल परवानगी नाही- लग्न सोहळ्यासाठी 25 लोकांची उपस्थिती, अंत्यसंस्कारसाठी फक्त 20 लोकांची उपस्थिती बंधनकारक- राजकीय किंवा इतर बैठका 50 टक्के क्षमता राहील- ज्या ठिकाणी कामगारांच्या रहाण्याची सोय आहे अश्याच ठिकानाची बांधकामं सुरू रहातील- कृषी कामे दुपारी 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) सुरू राहतील.- ई कॉर्मस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील-सलून आणि जीम 50 टक्के क्षमता सुरू राहील पण एसीचा वापर करता येणार नाही- बसेस 50 टक्के क्षमतेने सुरु राहील. उभे प्रवासी नाही- संचारबंदीचे नियम लागू राहतील

स्तर - 5सध्या पाचव्या टप्प्यात एकही जिल्हा नाही. जर पुढील आठवड्यात जास्त रुग्णसंख्य वाढली तर पाचव्या टप्प्यामध्ये समावेश होईल