मुंबई : कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे.   राज्यात आज  1485  नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 796  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील दोन- तीन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. त्यातच नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढवण्याची शक्यता आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.  राज्यात आतापर्यंत 65 लाख 2 हजार 39 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.68 टक्के आहे.  


राज्यात आज  दोन ओमायक्रॉनबाधितांची नोंद


राज्यात  आज  दोन ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली  आहे. आतापर्यंत 110 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 57 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 


राज्यात आज 12 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद


 राज्यात आज 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 9 हजार 102  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 92 हजार 048 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 887 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 83 , 53, 269 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


 देशात मागील 24 तासांत कोरोनाचे 7 हजार 189 रुग्ण


देशात कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढली आहे. कोरोनाचे संकट असताना नवा व्हेरियंट ओमायक्रॉनने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात मागील 24 तासांमध्ये 7189 कोरोनाबाधित आढळले आहेत. काल, भारतात 6650 कोरोनाबाधित आढळले होते. मागील 24 तासांमध्ये 387 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर, 7286 बाधितांनी कोरोनाला मात दिली आहे. कोरोनावर आतापर्यंत 3,42,23,263 बाधितांनी मात दिली आहे. सध्या देशात 77,032 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्त्वाच्या बातम्या :


देशात ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत वाढ, जाणून घ्या कोणत्या राज्यात काय आहे निर्बंध!


अहमदनगर जिल्ह्यात नो वॅक्सिन नो एन्ट्री! ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क


कोरोना काळात जनतेची मदत करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानायला पुण्यात आलोय : आदित्य ठाकरे