मुंबई : राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ  लागली आहे. आज 6,686  नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 861 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 80 हजार 871 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.85टक्के आहे. 


 राज्यात आज 158 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 36 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या  62 हजार 351 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (1), परभणी (40), हिंगोली (81),   नांदेड (51), अमरावती (57), अकोला (37), वाशिम (21),  बुलढाणा (6), यवतमाळ (16), वर्धा (5), भंडारा (1), गोंदिया (3), चंद्रपूर (83),  गडचिरोली (25) या चौदा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 522 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 


भिवंडी निजामपूर, मालेगाव, धुळे, नंदूरबार, परभणी, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर  साताऱ्यामध्ये सर्वाधिक 1020 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 05,45, 552 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,82, 076 (12.63 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,70,890 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2, 676 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासात 285 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 


मुंबईत गेल्या 24 तासात 285 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 261 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,17,452 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 2,946 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1853 दिवसांवर गेला आहे. 


 देशात गेल्या 24 तासांत 40 हजार कोरोनाबाधितांची नोंद


 शुक्रवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 40 हजार 120 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 585 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसाआधी 41 हजार 195 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तसेच काल दिवसभरात देशात 42 हजार 295 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 21 लाख 17 हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 30 हजार 254 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.