मुंबई : राज्यात आज  4,174 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 155  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 8 हजार 491  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 09 टक्के आहे. 


राज्यात आज 65 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.  राज्यात सध्या 47 हजार 880 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12, 364 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (43), नंदूरबार (2),  धुळे (0), जालना (51), परभणी (59), हिंगोली (18),  नांदेड (35), अमरावती (75), अकोला (19), वाशिम (07),  बुलढाणा (95), यवतमाळ (2), नागपूर (78),  वर्धा (2), भंडारा (1), गोंदिया (7),  गडचिरोली (36) या 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. 



आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 53,38,772 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,97,872 (11.74 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,07,913 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,937  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासात 353 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 


मुंबईत गेल्या 24 तासात 349 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 530 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,25,247 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात चार रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3895 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1253 दिवसांवर गेला आहे. 


गेल्या 24 तासांत 38 हजार नव्या कोरोनाबाधितांची भर


देश तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर उभा आहे. देशासह राज्यातही तिसऱ्या लाटेचं संकट घोंघावतंय. अशातच देशातील कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत उतार-चढाव दिसत आहेत. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 37,875 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच एका दिवसापूर्वी 31,222 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तसेच गेल्या 24 तासांत 369 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे,  39,114 रुग्ण काल दिवसभरात कोरोनामुक्त झाले आहेत.