मुंबई : राज्यात आज  3075 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 056  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 02 हजार 816  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 05 टक्के आहे. 


राज्यात आज 35 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.  राज्यात सध्या 49 हजार 796 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12, 949 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  राज्यातील एकूण 16 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (25), नंदूरबार (3),  धुळे (1), जालना (47), परभणी (51), हिंगोली (14),  नांदेड (27), अकोला (28), वाशिम (06),  यवतमाळ (08), नागपूर (85),  वर्धा (3), भंडारा (2), गोंदिया (8), चंद्रपूर (44),   गडचिरोली (30 ) या 16 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.


आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 58,36,107 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,94,254 (11.63 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,95,772 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,954  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासात 365 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 


मुंबईत गेल्या 24 तासात 365 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 232 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,11,554 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात चार रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4666 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1185 दिवसांवर गेला आहे. 


देशात गेल्या 24 तासात 33 हजार रुग्णांची भर


 देशात एकीकडे लसीकरणाच्या कार्यक्रमाने 73 कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी दुसरीकडे कोरोनाची रुग्णसंख्या काही केल्या कमी येत नसल्याचं दिसून येतंय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 33 हजार 376 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 308 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात एकूण 32 हजार 198 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्या आधीचा विचार करता गुरुवारी देशात 34 हजार 976 नव्या रुग्णांची भर पडली होती तर 260 जणांचा मृत्यू झाला होता.