मुंबई : राज्यात आज 5,108 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 736 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 52 हजार 150 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.04 टक्के आहे. 


राज्यात आज 159 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. तब्बल 28 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 50 हजार 393 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13,085 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (40), नंदूरबार (1),  धुळे (16), जालना (85), परभणी (21), हिंगोली (60),   नांदेड (34), अमरावती (94), अकोला (20), वाशिम (02),  बुलढाणा (39), यवतमाळ (01), नागपूर (77),  वर्धा (5), भंडारा (9), गोंदिया (3),  गडचिरोली (29) या सतरा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. 


मालेगाव,  धुळे, जळगाव, नंदूरबार, जालना, हिंगोली,  परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर या  जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 30,48,070 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,42, 788 (12.15 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,93,147व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,334  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासात 397 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 


मुंबईत गेल्या 24 तासात 397 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 507 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,21,157 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात सात रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 2736 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1825 दिवसांवर गेला आहे.


 गेल्या 24 तासात 46 हजार कोरोनाबाधितांची भर तर 607 जणांचा मृत्यू


 देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर काही केल्या कमी होताना दिसत नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयांने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढली असून मंगळवारच्या तुलनेत बुधवारी नऊ हजार रुग्णांची अतिरिक्त वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात 46 हजार 164 रुग्णांची भर पडली असून 607 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर गेल्या 24 तासात 34 हजार 159 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मंगळवारी देशात 37,593  नव्या रुग्णांची भर पडली होती तर 648 जणांचा मृत्यू झाला होता.