- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र Maharashtra Breaking Updates: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक; राजकारण तापलं
Maharashtra Breaking Updates: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक; राजकारण तापलं
Maharashtra Breaking Updates: आज पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा आहे. राज्यभरात विविध ठिकाणी पाऊस देखील कोसळत आहे. राज्यातील या सर्व घडामोडींसह देश-विदेशातील विविध अपडेट्स, पाहा एका क्लिकवर...
रायगड : पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये एका ई रिक्षावर झाड कोसळून दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. माथेरान परिसरात असणाऱ्या महात्मा गांधी मार्गावरील काळोखी येथील एका तीव्र उताराच्या मार्गावर एक भले मोठे झाड कोसळले आणि अपघात घडला. या घटनेत ई रिक्षा चालकासह तीन प्रवासी जखमी झाले आहेत. तर ई रिक्षाचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे.
रायगड : पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये एका ई रिक्षावर झाड कोसळून दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. माथेरान परिसरात असणाऱ्या महात्मा गांधी मार्गावरील काळोखी येथील एका तीव्र उताराच्या मार्गावर एक भले मोठे झाड कोसळले आणि अपघात घडला. या घटनेत ई रिक्षा चालकासह तीन प्रवासी जखमी झाले आहेत. तर ई रिक्षाचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे.
बुलढाणा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बुलढाणा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव याने आपल्या मित्रांसह मध्यरात्री तीन वाजता मेहकर येथील गाभणे हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयातील ज्युनिअर डॉक्टरला बेदम मारहाण केली. मनसेचा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव हा मद्यधुंद अवस्थेत रात्री अडीच वाजता गाभणे हॉस्पिटल येथील अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या त्याच्या नातेवाईकाला भेटण्यासाठी गेला. मात्र त्यावेळी तेथील डॉक्टरने मध्यरात्री रुग्णाला भेटण्याची वेळ नसते. रुग्णांना आरामाची गरज असते. त्यामुळे तुम्ही एक-एक व्यक्ती जाऊन भेटून येऊ शकता, असे सांगितलं. मात्र लक्ष्मण जाधव याने आम्हाला सर्वांना एकाच वेळी आयसीयूमध्ये जाऊ दे, असं म्हणत आयसीयूमधील कार्यरत ज्युनिअर डॉक्टरला जबर मारहाण केली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी आत्ताच मेहकर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव याने ज्युनिअर डॉक्टरला मारहाण केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
विरार : शिवसेना उबाठाचे विरार शहरप्रमुख उदय जाधव आणि मनसेचे शहर सहसचिव जय जैतापूरकर यांच्यासह 7 जणांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 35 (3) प्रमाणे नोटीस पाठवून विरार पोलिसांनी आज ताब्यात घेतले असून त्यांचे जवाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मै हिंदी बोलूंगा, भोजपुरी बोलूंगा, मगर मराठी नही बोलूंगा म्हणून मराठीचा अपमान करणाऱ्या रिक्षाचालकाला दोन दिवसांपूर्वी शिवसेना आणि मनसे पदाधिकारी यांनी चांगलाच चोप दिला होता. विरार पोलिसांनी यात स्वतः पुढाकार घेऊन काल रात्री रिक्षाचालकाला मारहाण करणाऱ्या मनसे आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावली होती. विरार पोलिसांच्या नोटीसीवरून आज शिवसेना उबाठाचे 7 आणि मनसेचे 2 पदाधिकारी असे 9 जण पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्यांना सकाळी 11 वाजल्यापासून आपल्या ताब्यात घेऊन त्यांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत.
बीड जिल्ह्यातील 20 इंग्रजी माध्यम आणि वस्तीगृहात श्रीमंत राजे यशवंतराव होळकर ही योजना राबवली जाते. मात्र या योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र एबीपी माझाच्या इन्वेस्टीगेशन रिपोर्ट मधून समोर आले होते.. या बातमीनंतर नागपूरच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पथकाने शाळा आणि वस्तीगृहांची पाहणी केली आहे.
पाहणी केलेला अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविला जाणार आहे. उपसंचालक, सहाय्यक संचालक आणि सदस्य सचिवांचा या पथकात समावेश आहे. शाळा आणि वस्तीगृहांची पाहणी केलेला अहवाल पुणे विभागाकडून मुंबईला पाठविला जाणार आहे.
ही योजना राबवीत असताना शासनाने शाळा आणि वस्तीगृहांना निकष घालून दिले आहेत.. मात्र यातील बहुतांश निकष केवळ कागदावरच आढळून आले.. एकाच खोल्यांमध्ये मुले आणि मुली आढळून आले.. दरम्यान याचे वास्तव समोर आल्यानंतर आता पथकाने पाहणी केली.
पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी
वांद्रेहुन अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर विलेपार्ले सांताक्रुज दरम्यान वाहनाच्या लांबच लांब रांगा
अवजड ट्रक मधील डिझेल संपल्यामुळे ट्रक रस्त्यावरच पडला बंद
ट्रक मध्ये मोठ्या प्रमाणावर सिमेंट गोणी असल्यामुळे ट्रकला बाजूला घेणे झाले अवघड
ट्रक बाजूला घेण्यासाठी वाहतूक पोलिसांना करावा लागत आहे मोठी कसरत
या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी अजूनही आंदोलनावर ठाम
मागणी मान्य होईपर्यंत आम्ही उठणार नाही विद्यार्थी आग्रही
Gr द्या तरच आंदोलन थांबवू
प्रशासकीय अधिकारी भेटून गेल्यानंतर देखील विद्यार्थी आंदोलनावर ठाम
दोन दिवसाची मुदत द्या अस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं
मात्र काही विद्यार्थी उपोषणावर ठाम
राज ठाकरे यांच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार
वरळी येथील ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यात भडकाऊ भाषण केल्याचा आरोप
एड नित्यानंद शर्मा , एड पंकज कुमार मिश्रा आणि एड आशिष राय यांनी संयुक्तपणे केली तक्रार
राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
सध्या महाराष्ट्रत परप्रांतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचा दावा करत मुख्य सूत्रधार आणि दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम NSA अंतर्गत कारवाई करण्याची मागणी
महाराष्ट्रातील बारा महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्राच्या महसूल सेवेतील 12 ज्येष्ठ अधिकाऱ्यांना आज आयएएस कॅडर मिळाल्याची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली
1 जानेवारी 24 ते 31 डिसेंबर 24 या रिक्त असलेल्या जागांवर या 12 नवीन आहेस अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे
विजयसिंह देशमुख
विजय भाकरे
त्रिगुण कुलकर्णी
गजानन पाटील
महेश पाटील
पंकज देवरे
मंजिरी मनोलकर
आशा पठाण
राजलक्ष्मी शहा
सोनाली मुळे
गजेंद्र बावणे
प्रतिभा इंगळे
अशी आयएएस झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहे
उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांनी हिंजवडीचा दौरा केल्यानंतर जिल्हा प्रशासन ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेली आहे. आय पार्क हिंजवडीचं वॉटर पार्क करणाऱ्यास कारणीभूत ठरलेल्या बिल्डर आणि कंपन्यांनी केलेल्या बांधकामांना स्थगिती द्या, असा आदेश अजित पवारांनी दिला. प्रत्यक्षात ही बाब पीएमआरडीए महामंडळाचे अध्यक्ष योगेश म्हसेंना याची पूर्ण कल्पना आहे. तरी गेल्या दोन आठवड्यांपासून गुन्हे दाखल करणार, असं म्हणत केवळ स्थानिकांवर कारवाई करण्यात आली. मात्र ओढे-नाले अडविणाऱ्या बिल्डर आणि कंपन्यांना पीएमआरडीए अभय दिलंय का? अशी चर्चा सुरु असतानाच अजित पवारांनी या बिल्डर आणि कंपन्यांवर कारवाईचे आदेश दिलेत. यानिमित्ताने योगेश म्हसेंनी बिल्डर आणि कंपन्यांना अभय दिलंय का? यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वेळ मारून नेहली. आज जिल्हाधिकारींनी पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त शेखर सिंहासोबत बैठक घेतली. हिंजवडीत जाणाऱ्या रस्त्यांची रुंदी वाढविण्यासाठी लागणाऱ्या जमिनींचे भूसंपादन करावं लागणार आहे. त्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी पुढची पावलं टाकण्याच्या सूचना दिल्यात.
Shivsena Party Symbol case in Supreme court: शिवसेना पक्ष आणि चिन्हावरुन ठाकरे गट आणि शिंदे गटात सुरु असलेला वाद आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) या खटल्याच्या सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने महत्त्वाच्या सूचना दिल्या. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आजच्या सुनावणीत एक महत्त्वाची टिप्पणी केली. त्यांनी ठाकरे गटाला (Thackeray Camp) सांगितले की, आता या प्रकरणाला दोन वर्षे झाली आहेत. तुम्ही त्यामुळे आता नव्याने अर्ज करणे बंद करा. हे प्रकरण दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. आता याप्रकरणाची मुख्य सुनावणी ऑगस्ट महिन्यात घेऊ, असे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
सर्वोच्च न्यायालयाचा सिमीला दणका
स्टूडेंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडियावर बंदी कायम
UAPA लवादाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार
पाच वर्षांकरिता सिमीवरील बंदी वाढवण्याचा निर्णय कायम
यवतमाळ : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी काढलेल्या सातबारा कोरा पायदळ यात्रेचा आजचा आठवा आणि शेवटचा दिवस...
सातबारा कोरा यात्रेच्या समारोपीय समारोपीय पदयात्रेत हजारो शेतकऱ्यांची गर्दी
गुंज ते आंबोडा पर्यत समारोपीय पदयात्रा आज बच्चू कडूंची यवतमाळ जिल्ह्यातील चिल गव्हाण गावात दाखल
महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या ज्या चिखलगव्हाण मध्ये नोंदवली गेली होती त्या करपे कुटुंबाची बच्चू कडू भेट घेणार
जाहीर सभेला ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव, आमदार रोहित पाटील उपस्थित राहणार.
राज्यभरातील हजारो शेतकरी आज अंबोडामध्ये दाखल होणार; बच्चू कडूंच्या पदयात्रेने केला 138 किलोमीटरचा टप्पा पूर्ण...
पापळ ते चिलगव्हाण एकूण 138 किलोमीटर पदयात्रा...
भाजपच्या आमदारांनी जिल्हा उपनिबंधकांना शिवीगाळ करत कपडे काढून मारण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीये. नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांनी शिवीगाळ केलेली ही ऑडिओ क्लिप आहे. नरसी सेवा सहकारी सोसायटी बाबतच्या विषयावर बोलताना हा प्रकार घडलाय. मुखेड चे भाजपचे आमदार तुषार राठोड यांनी नांदेडचे जिल्हा उपनिबंधक अशोक भिल्लारे यांना फोन केला होता. मला विचारल्याशिवाय कोणत्याही नियुक्त्या करायच्या नाहीत असे आमदार राठोड यांनी भिल्लारे यांना सांगितले. त्यानंतर आमदार राठोड यांनी आपला फोन आमदार राजेश पवार यांना दिला. राजेश पवार यांनी नरसी सहकारी सोसायटीच्या विषयावरून जिल्हा उपनिबंधक भिल्लारे यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. तुम्ही शासन आणि आमदारांच्या विरोधात जाऊन लाच घेऊन चुकीचे निर्णय घेत आहात असे आमदार पवार या क्लिपमध्ये म्हणत आहेत. लाचेचे पैसे काय करणार असे म्हणताना पवार यांनी शिवीगाळ केल्याचे ऑडिओ क्लिपमध्ये आहे. शेवटी कपडे काढून मारण्याची धमकीही ऑडिओ क्लिपमध्ये आहे. ही ऑडिओ क्लिप सध्या नांदेडमध्ये व्हायरल होत आहे.
एकनाथ शिंदे आज मुंबईतील पदादिकारी यांना करणार मार्गदर्शन
शिवाजी पार्कच्या सावरकर स्मारक येथे होणार पदाधिकारयांसोबत बैठक
दोन ठाकरे एकत्र आल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांचा पदाधिकार्यांसोबच बैठक
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या या बैठकिला महत्व
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाई फेक आणि हल्ला प्रकरण
सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे यांना आज सोलापूर पोलीस अधिक्षकसमोर हजर केले जाणार
प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेक, गाडीची तोडफोड आणि हाताने मारहाण केल्याप्रकरणी कालच काटेसह 7 जणांवर अक्कलकोट पोलीस ठाण्यात दाखल आहे गुन्हा
मात्र या गुन्ह्यात आरोपीवर लावण्यात आलेले सर्व कलम जामीनपात्र असल्याने न्यायालयत हजर न करता प्रतिबंधत्मक कारवाईसाठी पोलीस अधिक्षकसमोर हजर केले जाणार
प्रवीण गायकवाड यांना गंभीर जखम झालेली असल्यास आणि त्यांनी तसे वैद्यकीय कागदपत्रे दिल्यास दाखल गुन्ह्यात कलम वाढवून आरोपीवर पुढील कारवाई केली जाईल, सूत्रांची माहिती
अन्यथा वैयक्तिक बॉण्डवर ताब्यात असलेल्या आरोपीची पोलिसांच्या ताब्यातून सुटका होण्याची शक्यता
दरम्यान आरोपी प्रवीण काटे आणि भवानेश्वर शिरगिरे हे दोघे अद्याप ही सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या ताब्यात
सकल मराठा समाजाची आज पुण्यात बैठक
प्रविण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ या बैठकीचे आयोजन
हल्ल्याच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी आज मराठा समाजाचे बांधव एकवटणार
पुण्यातील शिवाजीनगर येथे दुपारी ११.३० वाजता बैठक
भंडारा जिल्ह्यात सध्या भात लागवडीचा हंगाम जोमात सुरू आहे. भात लागवडीपूर्वी शेतात ट्रॅक्टरनं चिखल केल्या जाते. त्यानंतर चिखलानं भरलेलेचं ट्रॅक्टर मुख्य मार्गानं नेत असल्यानं ट्रॅक्टरला लागून असलेलं संपूर्ण चिखल रस्त्यावर पसरल्या जाते. अशाच चिखलाच्या रस्त्यावरून जाणाऱ्या सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी मदन चौरागडे यांच्या वाहनाचा अपघात घडला. वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात तीन पलटी खात उतरली. ही घटना भंडाऱ्याच्या रोहा ते मुंढरी मार्गावर घडली. यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनातील दोघे किरकोळ जखमी झालेत आणि वाहनाचं मोठं नुकसान झालं आहे. सध्या भात लागवडीचा हंगाम असल्यानं शेतात चिखल करणाऱ्या ट्रॅक्टर चालकानं रस्त्यावर येण्यापूर्वी चिखल साफ करावं आणि वाहनधारकांनीही सावधतेनं वाहन चालवावं, असं आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा धक्का
माजी नगराध्यक्ष मंदार केणी यांच्यासह काही माजी नगरसेवक भाजपमध्ये करणार प्रवेश
मालवणमधील उद्धव ठाकरे गटाचे काही माजी नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
विधानपरिषदेत आज महत्वाचे काय?
१) पंडिता रमाबाई मुक्ती मिशन तालुका दौंड या संस्थेमध्ये गरीब असह्य मुली महिला यांच्या करिता सेवेच्या नावाखाली ख्रिच्छन धर्मामध्ये धर्मांतर केली जात असल्याची बाब समोर आली आहे- याप्रकरणी आमदार उमा खापरे यांनी लक्षवेधले आहे. तसेच या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे
२) राज्यातील गोवंशीय प्राण्यांच्या कत्तलीस, विक्रीस, वाहतुकीस बंदी असून देखील अनधिकृत पणे वाहतूक होत असल्याची बाब उघडकीस अली आहे. नुकतीच लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ५७ हजार किलो गोमांस घेऊन जाणारे दोन कंटेनर जप्त करण्यात आले होते.. तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये दररोज २० ते २५ टन गोमांस विक्री तेलंगणा येथे होत असल्याची बाब समोर आली आहे. सातत्याने उघडकीस येणाऱ्या या घटना पाहता अशा गुन्हे करणाऱ्या लोकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी तसेच गो तस्करी रोखण्यासाठी स्वतंत्र कडक कायदा हिवाळी अधिवेशनात करावा अशी मागणी आमदार श्रीकांत भारती यांनी केली आहे ..
३) मुंबईतील लोकसंख्येच्या तुलनेत शौचालयांची संख्या कमी आहे.पुरुषांसाठी असलेल्या एका सामुदायिक शौचालयाचा वापर ८६ पुरुष करत आहे तर स्त्रियांसाठी असलेल्या एका शौचालय हे ८१ महिला वापरत आहेत. मुंबईतील ह्या सार्वजनिक महत्वाच्या बाबी कडे आमदार सुनील शिंदे आणि प्रसाद लाड यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे.
४ राज्यातील ३६ जिल्ह्यां पैकी एकाही जिल्हा नियोजन समितीला मागील तीन महिन्यांपासून निधी मिळाला नाही. याकडे नियम ९३ अन्वये आमदार अरुण लाड लक्ष वेधतील
५) मुंबईतील कबुतर खाणे बंद केल्यानंतर कबुतर निवासी इमारती मध्ये आश्रय घेण्याची शक्यता असल्याने त्यांना विजनवासात सोडण्याबाबत ठोस उपाययोजना हाती घेण्यात बाबत नियम ९३ अन्वये आमदार सुनील शिंदे निवेदन करतील..
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाई फेक आणि हल्याचा मराठा क्रांती मोर्चाकडून निषेध
‘प्रवीण गायकवाड हे कुटुंबासहित असताना अशा पद्धतीने भ्याड हल्ला करणे हे अत्यंत निषेधार्ह’
‘संविधानाने प्रत्येकाला आंदोलन मोर्चा करण्याचा अधिकार पण अशा पद्धतीने हल्ला हा भ्याड कृत्य’
‘मराठा क्रांती मोर्चा म्हणून आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो’
मराठा क्रांती मोर्चाचे ज्येष्ठ समन्वयक दिलीप भाऊ कोल्हे यांनी व्यक्त केली भूमिका
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाई फेक आणि हल्याचा मराठा क्रांती मोर्चाकडून निषेध
‘प्रवीण गायकवाड हे कुटुंबासहित असताना अशा पद्धतीने भ्याड हल्ला करणे हे अत्यंत निषेधार्ह’
‘संविधानाने प्रत्येकाला आंदोलन मोर्चा करण्याचा अधिकार पण अशा पद्धतीने हल्ला हा भ्याड कृत्य’
‘मराठा क्रांती मोर्चा म्हणून आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो’
मराठा क्रांती मोर्चाचे ज्येष्ठ समन्वयक दिलीप भाऊ कोल्हे यांनी व्यक्त केली भूमिका
tic : दिलीप भाऊ कोल्हे, ज्येष्ठ समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा
नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 3 दिवसीय राज्यस्तरीय शिबीर आज पासून नाशिकच्या इगतपुरीमध्ये होणार आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राज्यातील प्रमुख पदाधिकारी शिबिरासाठी उपस्थिती राहणार आहेत, राज्यातील सर्व प्रदेश सरचिटणीस,उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष यांना उपस्थित राहण्याच्या सूचनाकरण्यात आल्यात*ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या मराठीच्या मुद्यावर पार पडलेल्या विजयी मेळावा नंतर मनसेचे पहिले शिबिर नाशिकमध्ये होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकच्या पार्श्वभूमीवर शिबीर संपन्न होत असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग मनसे नाशिकमधून फुंकणार, मनसे कार्यलया बाहेर या आधी दोन्ही ठाकरे बंधूचे एकत्रित छायाचित्रे असणारे होर्डिंग लागले होते त्यामुळे ठाकरे बंधूच्या युती बाबतीत काही चर्चा होणार का, याकडे मनसे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपनेते सुनील बागूल यांच्या जामीन अर्जवर आज दुपारी होणार सुनावणी
या आधी दोन वेळा सूनवणी पुढे ढकलण्यात आलीं आहे
सुनील बागूल याच्यावर मारहाण आणि धमकावणे याप्रकरणी आहे गुन्हा दाखल
गुन्हा दाखल असल्यामुळे सुनील बागूल आणि ठाकरेंच्या शिबसेना चे माजी महानगर प्रमुख मामा राजवाडे यांचा भाजप प्रबेश लांबला आहे
जामीन नसल्याने बागूल आणि राजवाडे ठाकरेंच्या पक्षात ही नाही आणि भाजप मध्ये ही नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे
सुनील बागूल यांनी अटक पूर्व जामिनासाठी केला आहे अर्ज
बागूल यांच्या जामीन अर्जवारील सुनावणी नंतर मामा राजवाडे आणि इतरांच्या जामीनाचा अर्ज दाखल होणार
त्यामुळे आजच्या सूनवणीकडे लक्ष
बुलढाणा: लोणार तालुक्यातील वेणी गावात काल सायंकाळी गावाजवळील जागेत झेंड्यावरून दोन गटात तणाव निर्माण झाला होता . वेणी गावाजवळ लावण्यात आलेल्या निळा झेंडा काढून अज्ञात व्यक्तीने भगवा झेंडा लावला होता यावरून दोन गत आमनेसामने येऊन तणाव निर्माण झाला होता. लोणार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून गावातील दोन्ही गटातील नागरिकांची समजूत काढत या ठिकाणावरून दोन्ही झेंडे काढून टाकले आहेत.सध्या वेणी गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
बीड: कोळसा भट्टीवर मजुरीसाठी नेलेल्या मजुरांच्या मुलांचे आयुष्य काळोखात लोटले जात होते. शिक्षण, बालपण आणि स्वातंत्र्य या तिन्ही हक्कांपासून ते वंचित होते. बीडच्या अंभोरा पोलिस ठाणे हद्दीतील सेवालाल लमाण तांड्यावर राहणाऱ्या 9 ‘शेठजी’ नी केवळ कामासाठी नव्हे, तर त्यांच्या मुलांकडूनही जबरदस्तीने गुरे चारणे, शेण काढणे, भांडी धुणे, हातपाय दाबणे अशी वेठबिगार कामे करून घेतली.
ही लहान मुले शाळेच्या वयात गुलामगिरीत अडकली होती. या अमानुष प्रकाराचा पर्दाफाश जिल्हाधिकाऱ्यांच्या टास्क फोर्सने केला होता. या प्रकरणी 9 आरोपींवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. या सर्वांना अटक करत पोलिसांनी न्यायालयात हजर केलं आणि न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ही केवळ गुन्ह्याची बाब नाही, तर समाजाच्या संवेदनशून्यतेचा आरसा आहे.
आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीवर अत्याचार; कीर्तनकार महिला व कुटुंबीयांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा
-सखल मराठा समाजाकडून आळंदी पोलीस ठाण्यात पत्र देत कडक कारवाईची मागणी
-अहिल्यानगरमधून अपहरण; वारंवार बलात्कार, लग्नासाठी जबरदस्ती, अॅसिड टाकण्याची धमकी, पीडितेच्या धक्कादायक तक्रारीने खळबळ
-आळंदी येथील केळगाव रस्त्यावर असलेल्या एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीला डांबून तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
-या प्रकरणात एका कीर्तनकार महिला सहभागी असल्याचे समोर आले असून, पीडितेने पाच जणांविरुद्ध बलात्कार, अपहरण, धमकी आणि जबरदस्तीने लग्न लावण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
-२ जून २०२५ रोजी ती घरी एकटी असताना तिच्या ओळखीच्या एका महिलेने तिला शेताकडे जाण्याचे कारण सांगून घराबाहेर नेले. त्याचवेळी वाटेत काळ्या रंगाच्या इर्टिगा गाडीतून आलेल्या आण्णासाहेब आंधळे, प्रविण आंधळे आणि एका अनोळखी चालकाने तिचे जबरदस्तीने अपहरण केले. तिने आरडाओरड केली असता अॅसिड टाकण्याची धमकी देण्यात आली.
-नंतर तिला आळंदी येथील खासगी मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत नेण्यात आले.
-तिथे आण्णासाहेब आंधळे, प्रविण आंधळे, कीर्तनकार सुनिता आंधळे आणि अभिमन्यु आंधळे यांनी तिला खोलीत डांबून ठेवले. फिर्यादीनुसार, या ठिकाणी आण्णासाहेब आंधळे यांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केला.
-या प्रकरणात पोलिसांनी आण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रविण प्रल्हाद आंधळे, अनोळखी वाहनचालक, सुनिता अभिमन्यु आंधळे आणि अभिमन्यु भगवान आंधळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर अपहरण, बलात्कार, धमकी देणे, जबरदस्ती आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्यातील खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता
जून जुलै मध्ये पावसाची मोठी तुट
80% पेरण्या केलेली पीक वाळू लागली तर 20% पेरण्या केंव्हा करायच्या शेतकऱ्यांच्या समोर प्रश्न
प्रकल्पातील पाणी साठ्यातही वाढ नाही
परभणी जिल्ह्यावर यंदा वरून राजा रुसलाय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.पावसाळा सुरू होवुन दीड महिना झाला तरी पाहिजे तसा पाऊस परभणीत झाला नाही जिल्ह्यात 80% पेरण्या पूर्ण झाल्यात अजूनही 20% पेरण्या व्हायच्या आहेत कारण पाऊस तसा झालेला नाही.
जुन महिन्यात १०५ मिमी तर जुलै महिन्यात केवळ ३५ मिमी एवढा पाऊस झालाय.सरासरीच्या अनुषंगाने विचार केला तर महिन्यात ५०% पावसाची तूट आहे म्हणूनच ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्यांची पिक वाळू लागली आहेत ओलावा नसल्याने मान टाकायला सुरुवात झालीय दुसरीकडे प्रकल्पातील पाणी साठ्यातही वाढ झालेली नाही येलदरी- ५१% एवढे तर लोअर दुधना ३४% एवढे पाणी आहे.अजूनही जिल्ह्यातील छोटे मोठे प्रकल्प जोत्याखालीच आहेत.एकूणच पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात आला आहे.
चंद्रपूर : ट्रकने म्हशींना दिलेल्या धडकेनंतर ट्रक चालकाला अमानुष मारहाण... अमानुष मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ट्रकचालकाला रुग्णालयात करण्यात आले दाखल, ब्रह्मपुरी तालुक्यातील देलनवाडी येथील घटना, ब्रह्मपुरी-नागपूर मार्गावर काल दुपारी एका ट्रकने म्हशींना दिली धडक, यामध्ये म्हशी झाल्या गंभीर जखमी, त्यामुळे संतापलेल्या म्हशींच्या मालकाने काही लोकांसोबत मिळून ट्रक चालक दीपक दोडके याला केली अमानुष मारहाण
रायगड: मुरुड-अलिबाग रस्त्यावर बारशिव गावच्या परिसरात काल संध्याकाळी एक भीषण अपघात घडला. मोटरसायकल आणि मुरुड कडून अलीबागच्या दिशेने जाणारी एस क्रॉस कार यांच्यात हा अपघात झाला.भरधाव वेगात असलेल्या या कारने अलिबाग कडून मुरूडच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल.या अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पळून गेल्याची बाब समोर आली आहे.त्यामुळे रायगड मध्ये हिट अँड रण ची पुनरावृत्ती झाल्याची घटना समोर आली आहे.या अपघातात फरार झालेल्या कार चालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी स्थानिक मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुरुड पोलिस ठाण्यात धाव घेत याची तक्रार केली आहे.यानंतर मुरूड पोलिस घटनास्थळावरून पळून जाणाऱ्या कार चालकाचा शोध घेत आहेत.
रायगड: मुरुड-अलिबाग रस्त्यावर बारशिव गावच्या परिसरात काल संध्याकाळी एक भीषण अपघात घडला. मोटरसायकल आणि मुरुड कडून अलीबागच्या दिशेने जाणारी एस क्रॉस कार यांच्यात हा अपघात झाला.भरधाव वेगात असलेल्या या कारने अलिबाग कडून मुरूडच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल.या अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पळून गेल्याची बाब समोर आली आहे.त्यामुळे रायगड मध्ये हिट अँड रण ची पुनरावृत्ती झाल्याची घटना समोर आली आहे.या अपघातात फरार झालेल्या कार चालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी स्थानिक मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुरुड पोलिस ठाण्यात धाव घेत याची तक्रार केली आहे.यानंतर मुरूड पोलिस घटनास्थळावरून पळून जाणाऱ्या कार चालकाचा शोध घेत आहेत.
धाराशिव: बाजारातील दरापेक्षा अधिकचा दर देण्याच आमिष दाखवून शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करीत तब्बल 62 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार धाराशिव तालुक्यातील बावी येथून समोर आला आहे. आरोपी प्रशांत विलास जाधव आणि प्रमोद माने या दोघांनी बावी गावातील शेतकऱ्यांना सोयाबीनला जास्त दर देण्याचे आमिष दाखवून सोयाबीनची खरेदी केली होती. ज्यादा दर मिळतोय या आशेने शेतकरी रवींद्र उंडे यांच्यासह 22 शेतकऱ्यांनी 2023 मध्ये आपले सोयाबीन आरोपींना विकले होते. दोन वर्षे उलटूनही सोयाबीनचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली केली असून दोन्ही आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत. तर शेतकरी आमचे पैसे मिळावेत यासाठी लवकर मार्ग काढावा अशी मागणी करीत आहेत.
महिनाभरात समृद्धी महामार्गावरून उपराजधानी ते राजधानी ११ लाख वाहनांचा प्रवास.
टोल च्या माध्यमातून MSRDC ला 90 कोटिंच उत्पन्न.
समृद्धी वरून आतापर्यंत 2 कोटी 24 लाख वाहनांचा प्रवास.
युती सरकारचा महत्वकांक्षी असलेला हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग सेवेत दाखल झाल्यानंतर आतापर्यंत या महामार्गावरून 2 कोटी 24 लाख वाहनांनी प्रवास केला आहे. उपराजधानी नागपूर ते राजधानी मुंबई असा 701 किलोमीटरचा हा द्रुतगती एक्सेस कंट्रोल महामार्ग 65 झाला. एकंदरीत सातशे एक किलोमीटरचा महामार्ग सुरू झाल्यानंतर म्हणजे गेल्या एक महिन्यात या महामार्गावरून अकरा लाख वाहने धावलीत व त्यातून एम एस आर डी सी ला ९० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळालं.. एकंदरीत दररोज समृद्धी महामार्गावर ३६ हजार वाहने धावत असल्याची माहिती एम एस आर डी सी च्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
-माजी नगरसेवकाच्या मुलाला एमडी तस्करी करताना अटक
- माजी नगरसेवक अजय बुगेवार याचा मुलगा संकेत बुगेवार याला एमडी तस्करी करताना गणेशपेठ पोलिसांनी अटक केली आहे.
- पोलिसांना त्याच्याकडून 16.07 ग्राम एमडी पावडर आढळली असून जवळपास 1.67 लाख रुपयाच्या एमडी पावडर सह 18.17 लाख रुपयाच्या मुद्देमाल जप्त केला आहे..
- संकेत हा माजी नगरसेवकांचा मुलगा असून तो बॉडी बिल्डर आहे.आणि जिम ट्रेनर देखील आहे..
-पोलिसांनी संकेतला अटक केली तेव्हा तो एमडी या अमली पदार्थाची डिलिव्हरी देण्यासाठी जात असल्याचा आरोप आहे...
- पोलिस त्याची चौकशी करून काही कनेक्शन बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे..
भंडारा : साकोलीकडं जाणाऱ्या महसूल कर्माचाऱ्याच्या दुचाकीला भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनानं जबर धडक दिली. यात दुचाकीवरील विलास चचाने (४०) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना भंडारा बायपास महामार्गावरील अझिमाबाद इथं रात्री घडली. मृत विलास चचाने हे साकोली इथं उपविभागीय कार्यालयात अव्वल कारकून या पदावर कार्यरत होते. मृतक चचाने हे त्यांच्या मामाचा अंत्यसंस्कार आटोपून साकोलीकडं परत जात असताना हा अपघात घडला. कारधा पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहराच्या लगतच मध्यप्रदेश राज्याची सीमा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मध्यप्रदेश मधील शेतकरी विना परवाना रासायनिक खते घेऊन जात असतांना कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली. या कारवाईत 3 मालवाहक जप्त करण्यात आले असून गाडी चालकांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शेतकरी कृषी केंद्रात रासायनिक खते खरेदीसाठी गर्दी करून आहेत परंतु काही कृषी केंद्र लालसेपोटी दुसऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना विनापरवाना खत विक्री करीत असल्याचे आमगाव शहरात आढळून आले... शेतकरी रासायनिक खते पर राज्यात घेऊन जात असताना कृषी विभागाला माहिती मिळताच कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करून 3 वाहन जप्ती केले आहेत. 45 बोरी रासायनिक खत एकूण किंमत 45000 हजार रुपये किमतीची रासायनिक खत जप्त करण्यात आला आहे. या गाडी चालकांवर व कृषी दुकानदारांवर रासायनिक खत नियंत्रण आदेश 1985 (4) (ब ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहराच्या लगतच मध्यप्रदेश राज्याची सीमा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मध्यप्रदेश मधील शेतकरी विना परवाना रासायनिक खते घेऊन जात असतांना कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली. या कारवाईत 3 मालवाहक जप्त करण्यात आले असून गाडी चालकांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शेतकरी कृषी केंद्रात रासायनिक खते खरेदीसाठी गर्दी करून आहेत परंतु काही कृषी केंद्र लालसेपोटी दुसऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना विनापरवाना खत विक्री करीत असल्याचे आमगाव शहरात आढळून आले... शेतकरी रासायनिक खते पर राज्यात घेऊन जात असताना कृषी विभागाला माहिती मिळताच कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करून 3 वाहन जप्ती केले आहेत. 45 बोरी रासायनिक खत एकूण किंमत 45000 हजार रुपये किमतीची रासायनिक खत जप्त करण्यात आला आहे. या गाडी चालकांवर व कृषी दुकानदारांवर रासायनिक खत नियंत्रण आदेश 1985 (4) (ब ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा एल्गार.. २९ ऑगस्टला अंतरवाली सराटी सोडल्यास मागे फिरणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा
आपल्यावरील हल्ला सरकार पुरस्कृत असल्याचा प्रवीण गायकवाडांचा आरोप..शाईफेकीनंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची गायकवाडांशी फोनवरुन चर्चा..तर भाजपने पेरलेल्या विषाला उकळी फुटली, संजय राऊतांचा हल्लाबोल
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवर अक्कलकोटमध्ये शाईफेक...संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असल्याचा आरोप..सात जणांवर गुन्हा तर घटनेच्या निषेधार्थ पंढरपुरात प्रवीण गायकवाडांचा दुग्धाभिषेक
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking Updates: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांच्यावर काल (13 जुलै) अक्कलकोटमध्ये शाईफेक करण्यात आली. संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असल्याचा आरोपानंतर प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर घटनेच्या निषेधार्थ पंढरपुरात प्रवीण गायकवाडांवर दुग्धाभिषेक केला आहे. सदर घटनेचे राज्यभरात पडसाद पडण्याची शक्यता आहे. त्यातच आज पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा आहे. राज्यभरात विविध ठिकाणी पाऊस देखील कोसळत आहे. राज्यातील या सर्व घडामोडींसह देश-विदेशातील विविध अपडेट्स, पाहा एका क्लिकवर...