- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- निवडणूक
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी, वाचा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी, वाचा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News LIVE Updates: शिवसेना ठाकरे गट नीलम गोऱ्हेंच्या विधानानंतर आक्रमक झाल्याने सध्या शिंदे विरुद्ध ठाकरे असा वाद रंगला आहे. यासह महाराष्ट्र आणि देश-विदेशातील महत्वाच्या अपडेट्स
मस्साजोग ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाला वारकरी संप्रदायाने पाठिंबा दिला आहे. वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी भागचंद महाराज झांजे यांनी आंदोलन स्थळी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवित अन्नत्याग आंदोलनात सहभाग घेतला आहे.
घटना घडवून 77 दिवस झाले आहेत. या कुटुंबावर दुःख ओढवले आहे
त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत महाराष्ट्रातील पहिली घटना आहे या घटनेमुळे एका कुटुंबाला न्याय मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करावे लागत आहे
ही घटना निंदनीय आहे न्याय मिळत नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरू राहणार आहे
वारकरी संप्रदाय देशमुख परिवाराच्या पाठीशी उभा आहे
महंत नामदेव शास्त्री यांनी प्रसार माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया वादग्रस्त ठरली होती
वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. महंतांनी ज्यांच्यावर अन्याय झाला त्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे राहिले पाहिजे होते.
महंत नामदेव शास्त्री महाराजांनी देशमुख कुटुंबाच्या मागे उभा राहिला पाहिजे
प्रत्येकाने या कुटुंबाच्या मागे उभे राहणे गरजेचे आहे.
गोंदिया : कोळसाभरून गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा जाणाऱ्या एका भरधाव ट्रकनं दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार दांपत्य गंभीर जखमी झालेत. तर, भीषण अपघातानंतर दुचाकीनं अचानक पेट घेतला. यात दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. ही घटना भंडाऱ्याच्या तुमसर - तिरोडा मार्गावरील देव्हाळा गावाजवळ घडली. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. जखमी दांपत्यांना तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ठाकरेंच्या शिवसेना नेते -उपनेत्यांची आज शिवसेना भवन येथे दुपारी तीन वाजता बैठक
पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी आणि डॅमेज कंट्रोल साठी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उपनेते दोन मार्च पासून राज्यभर दौरा करणार
एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यापासून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते दौऱ्यांना सुरुवात करणार
दोन मार्चला ठाकरेंचे शिवसेनेचे सर्व महत्त्वाचे नेते ठाणे दौऱ्यावर, तर उद्धव ठाकरे 9 मार्चला मुलुंडमध्ये ईशान्य मुंबईतील कार्यकर्त्यांचा शिबिर घेणार
राज्यभरातील पक्ष संघटनेचा आढावा त्यासोबतच नेत्यांच्या दौऱ्यांची नियोजन आजच्या या आठवडा बैठकीत नेते उपनेते करणार
आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीच्या दृष्टिकोनातून राज्यभरातील पदाधिकाऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी आणि पक्षातील पुढील रणनीती ठरवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न केले जाताय
9 मार्चला ईशान्य मुंबईतील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिबिर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी आयोजित केला आहे आणि या शिबिराला उद्धव ठाकरे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत
दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे पहिला फळीतील नेते राज्यातील विविध ठिकाणी जाऊन दौरे करणार आहेत त्याची सुरुवात दोन मार्च पासून ठाण्यातून होणार आहे जो एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो
जिथे शिवसेनेची ताकद आणि संघटना मजबूत करण्याची गरज आहे त्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते दौरे करणार आहे त्याचे नियोजन आजच्या बैठकीमध्ये केला जाणार असल्याची माहिती आहे
वर्धा
- कर्नाटकच्या बिदर येथील प्रवस्याच्या ट्रॅव्हल्सला वर्ध्यात अपघात
- वर्ध्यात प्रयागराज वरून येतांना ट्रॅव्हल्सचा अपघात
- प्रयागराज वरून येताना झाला ट्रॅव्हल्सचा अपघात
- अपघातात 14 जण गंभीर जखमी
- वर्ध्याच्या नागठाणा येथे तुळजापूर - नागपूर मार्गावर घडली घटना
- वर्ध्याच्या सावंगी मेघे रुग्णालयात उपचारासाठी दाखल
- अपघातात 4 जण गंभीर जखमी, रुग्णलयात उपचार सुरू
- सगळे जखमी कर्नाटकच्या बिदर येथील रहवासी
- 5 पुरुष आणि 10 महिला ट्रॅव्हल्स मधून प्रवास करीत असल्याची माहिती
- नीलम गोऱ्हे यांच्या विधानाबाबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर.
- नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर अशा प्रकारचं वक्तव्य करण्याची गरज नव्हती असं पक्षातील अनेक नेत्यांचं म्हणणं आहे.
- गरज नसताना आणि अवेळी केलेल्या वक्तव्यामुळे पक्षाला डॅमेज झाल्याची पक्षातील अनेक नेत्यांची भावना.
- नीलम गोऱ्हे यांनी स्वतः त्यावर समोर येऊन बोलावं अशी नेत्याची भूमिका
इंद्रजीत सावंत यांना मी ओळखत नाही, त्यांना कधीच फोनवर संपर्क ही साधलेला नाही, त्यामुळे इंद्रजीत सावंत यांना देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा स्पष्टीकरण प्रशांत कोरटकर यांनी दिला आहे... फेसबुक पोस्ट च्या माध्यमातून जी कॉल रेकॉर्डिंग इंद्रजीत सावंत यांनी पोस्ट केली आहे, त्या कॉल रेकॉर्डिंग मधील आवाजही माझा नाही असा दावाही प्रशांत कोरटकर यांनी केला आहे...
इंद्रजीत सावंत यांनी फेसबुक पोस्ट करून माझा नाव वापरण्यापूर्वी किमान माझ्याशी संपर्क साधायला हवा होता... किंबहुना त्यांना आलेला कॉल मीच केला आहे की नाही याची शहानिशा करायला हवी होती.. त्यांनी असं काहीही न करता फेसबुक पोस्ट करून माझी बदनामी तर केलीच आहे, सोबतच मला सकाळपासून अनेक धमकीचे कॉल येत आहेत.. त्यामुळे मी इंद्रजीत सावंत यांच्या विरोधात पोलिसांकडे आणि सायबर सेलमध्ये तक्रार करेल असंही कोरटकर म्हणाले... छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज आमचे आराध्य आहेत, त्यांच्याबद्दल चुकीचे बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. मी इतिहासाचा विद्यार्थी असलो तरी इतिहास विषयाचा तज्ञ नसल्यामुळे इंद्रजीत सावंत सारख्या इतिहास तज्ञाला फोन करून वाद घालण्याचा प्रश्नही उद्भवत नसल्याचे कोरटकर म्हणाले...
एबीपी माझा ने प्रशांत कोरडकर यांना इंग्रजीत सावंत यांची फेसबुक पोस्ट दाखवत त्यातील कॉल रेकॉर्डिंग ऐकवली ती ऐकल्यानंतर प्रशांत कोरटकर यांनी हा आवाज माझा नाही असा दावा पुन्हा एकदा केला...
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाशिकच्या सत्र न्यायालयात जाणार
11 वाजेपर्यंत उपस्थित राहण्याची शक्यता
1 लाख रुपयांचा जामीन कोकाटे ना झालाय मंजूर त्या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोकाटे हजर राहणार
शिक्षेला आव्हान दिलेल्या अपिलावर आज सलग दुसऱ्या दिवशी सत्र न्यायालयात सुनावणी होणार
कोकाटे यांना दिलासा मिळणार का याकडे लक्ष
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक असताना कोकाटे नाशिकमधे असल्यानं मंत्रिमंडळ बैठकीला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ची दांडी
राज्य सरकारकडून एसटीच्या जाहिरातींच्या जागेवर ताबा घेतला आहे
नियम डावलत राज्य सरकार हे सर्व करतं आहे
एसटीच्या संचालक मंडळाची देखील परवानगी घेतली गेली नाही आहे
एकीकडे म्हणायचं की एसटी शासनाची नाही आणि दुसरीकडे अशा प्रकारे जाहिरातींची जागेंवर ताबा घ्यायचा
प्री-बिडला एसटी महामंडळाने देखील विरोध केला आहे
मुंबई, ठाणे ह्या बसस्थानकावरील जागा घेतल्या आहेत
आम्ही वेळ आली तर संघर्ष करु, मात्र आधीच खड्ड्यात असलेल्या एसटीला आणखी तोट्यात जाऊ देणार नाही
राज्य सरकारनं यासंदर्भात फेरविचार करायला हवा
मुंबईसह मुंबईच्या आजु बाजूच्या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे… मुंबईत काल सांताक्रुझ ३८.४, दक्षिण मुंबई कोलाबा३६.८ तर ठाणे ३७.४ तापमानाचा पारा गेल्याचे पाह्यला मिळाले आहे.
पालघर, मुंबई,रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्णतेची लाट असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे…
1736 मध्ये स्थापन झालेलं पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात उद्या होत असलेल्या शिवरात्री ची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. भाविकांना उन्हाची झळ बसू नये म्हणून मंदिर परिसरात मोठा मंडप टाकण्यात आला आहे तसेच पहाटेपासून सुरू होणाऱ्या पूजेसाठीची तयारी आणि मंदिरात रांगोळी काढण्याचे काम सुद्धा सुरू आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात आज महिलांकडून सामूहिक शिवस्त्रोत्राचे पठण केलं जात आहे. सकाळी विधीवद पूजा संपन्न झाल्यानंतर पहाटे ४ वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे.
Akola Flash :
भयावह!, अकोल्यात एका मालवाहू वाहनासह ट्रॅक्टरमधील शेतमजुरांचा जीवघेणा प्रवास करतानाचा VIDEO समोर आलाय.. ठिकठिकाणी रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या चिंतेचा विषय बनला असतानाच आता अकोल्यात प्रमुख रस्त्यावर शेतमजुरांचा हा जीवघेणा प्रवास सुरुये. असुरक्षित वाहनांतून शेकडो शेतमजूरांचा दररोज हा जीवघेणा प्रवास सुरूये.. अकोल्यातल्या अकोट तालुक्यातल्या पणज आणि रुईखेड मार्गावर दररोज शेतमजुर असा हा धोकादायक प्रवास करताना सर्रास दिसून येतोय.
विशेष म्हणजे ट्रॅक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात शेतातील साहित्य भरलेलं असतानाच त्यावर क्षमतेपेक्षा अधिक शेतमजूर कोंबून नेत असल्याचे video मधून स्पष्टपणे दिसत आहे.. तर मालवाहून वाहनात देखील बसायला जागाही नसल्याचे चित्र बघावयास मिळतेय. मात्र, तरीही शेतमजूर वाहनात कोंबून नेल्या जात आहे.. तर काही तरुण वाहनाच्या लोखंडी अँगलवर बसून प्रवास करतायेत... आपण पाहू शकता आज ही वाहने अपघातांना आमंत्रण देणारी ठरते आहेत. परंतु या वाहतुकीकडे स्थानिक वाहतूक पोलीसांचं अक्षरशा दुर्लक्ष होत आहे..
पंढरपूर: अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली असून वाळू माफियांना मोठा दणका दिला आहे . महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाने भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा व वाहतूकीसाठी वापरण्यात येणाऱ्या १८ लाकडी होड्या जेसीबी व कटरच्या साह्याने पूर्णपणे नष्ट करण्यात आल्या आहेत.
पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार सचिन लंगुटे यांनी विविध पथकांची नेमणूक केली आहे. दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी पंढरपूर शहरा नजीकच्या चंद्रभागा नदी पात्रामध्ये पंढरपूर - इसबावी दरम्यान असणाऱ्या ओढ्यामधील अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ८ लाकडी होड्या जेसीबी च्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या. तसेच शिरढोण - इसबावी दरम्यान असणाऱ्या ओढ्यामधील अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या १० लाकडी होड्या कट्टर च्या साह्याने कट करून पूर्णपणे नष्ट करण्यात आल्या.
या कारवाईमध्ये पंढरपूर महसूल आणि शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.
नाशिक ब्रेकिंग...
- नाशिकमध्ये तेरा वर्षीय अल्पवयीन मुलावर दोघां अल्पवयीनकडून लैंगिक अत्याचार...
- नाशिकच्या शालिमार परिसरातील घडली धक्कादायक घटना...
- नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात दोघां अल्पवयीन विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल...
- लैंगिक अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलावर वैद्यकीय उपचार करून प्रकृती स्थिर असल्याची माहिती...
- पीडित मुलाच्या आईने पोलिसात तक्रार दिल्यानंतर दोन दिवसांपूर्वीची घडलेली घटना उघडकीस...
अँकर:
नाशिक शहरातील शालिमार परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. तेरा वर्षीय अल्पवयीन मुलावर दोघांकडून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर भद्रकाली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.लैंगिक अत्याचार करणारे देखील पंधरा ते सतरा वर्षीय अल्पवयीन असल्याच पोलिसांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी दुकानात आईने सांगितलेले वस्तू सायकलवर घेऊन जात असताना दोघांनी तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाला मोकळ्या जागेत नेत त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अत्याचार झालेल्या मुलावर वैद्यकीय उपचार करून त्याची प्रकृती स्थिर असल्यास देखील पोलिसांनी सांगितले. अत्याचार करणाऱ्या दोघांची ओळख पटली असून लवकरच संशयीतांना ताब्यात घेणार असल्याचा भद्रकाली पोलिसांनी सांगितले.
पुणे: बिबट्या आल्याची माहिती आता क्षणार्धात वनविभाग आणि लोकवस्तीतील नागरिकांना मिळणार आहे, कारण वनविभागाने बिबट्याच्या शोधासाठी उत्तर पुणे जिल्ह्यात प्रथमच AI तंत्रज्ञानाचा वापर केलाय,गेली काही वर्षांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून बिबट्याचे मनुष्य तसेच पाळीव प्राण्यांवरील हल्ले मृत्यू लक्षात घेता,बिबट्या आल्याची माहिती क्षणार्धात मिळावी यासाठी वनविभागाने सिम्युसॉफ्ट टेक्नॉलॉजी कंपनीच्या AI तंत्रज्ञान वापर केलाय, हे तंत्रज्ञान इंटरनेट विरहित असून या कॅमेऱ्याच्या ४० मिटर परिक्षेत्रातून बिबट्या गेल्यास 120 डेसिबलचा हा सायरन आवाज करतो आणि याची माहिती तातडीने लोकवस्ती तसेच वन विभागाला मिळते महत्वाचे म्हणजे ही प्रणाली कॅमेरा फक्त बिबट्यासाठीच काम करते इतर कुठलाही प्राणी किंवा मनुष्य याच्या समोरून गेला तरी ते कार्य करत नाही सायरन आवाज करत नाही.
Breaking news
- महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मधे होणाऱ्या प्राजक्ता माळी यांच्या कार्यक्रमाला विरोध
-
- माजी विश्वस्त ललिता शिंदे यांचे ग्रामीण पोलिसांना पत्र
महाशिवरात्री निमित्ताने प्राजक्ता माळी यांचा शिव स्तुती नृत्याविष्कार चा कार्यक्रम देवस्थान ट्रस्ट ने केलाय आयोजित
- यापूर्वी सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही..
- चुकीचा पायंडा पाडू नये अशी ललिता शिंदे यांची मागणी
-
- मंदिरातील धार्मिक वातावरण बिघडू नये अशी आमची इच्छा
- मंदिर विश्र्वस्तांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
- महाशिवरात्रीला संध्याकाळी मंदिराच्या प्रांगणात होणार प्राजक्ता माळी यांचा 'शिवस्तुती नृत्याविष्कार '
सातारा:संजय राऊत हे आकाशातून उतरलेले एक विमान तुम्ही दिल्लीत काय दिवे लावता हे सगळ्यांना माहीत आहे: खा. धैर्यशील माने यांचा राऊतांना टोला
खासदार धैर्यशील माने यांनी साताऱ्यात राऊताना टोला लगावलाय… संजय राऊत हे आकाशातनं उतरलेले विमान आहे ते रोज काहीतरी आकाशवाणी करत असतात दिल्लीमध्ये ते काय दिवे लावतात सगळ्यांना माहित आहे निलम गो-हे महाराष्ट्राच्या संविधानिक सर्वोच्च पदावर आहेत त्यांच्यावर आरोप करताना संजय राऊत यांनी काय बोलायचं हे त्याना कळलं पाहिजे संजय राऊत जेवढे बोलतील तेवढीच चार माणस आमच्याकडे वाढतात असं सुद्धा धैर्यशील माने म्हणाले.
ब्रेकींग
उल्हासनगर गोळीबार प्रकरणात वैभव गायकवाडला क्लिनचिट नाही
ठाणे क्राईम ब्रांच चे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांची फोनद्वारे एबीपी माझा ला माहिती
वैभव गायकवाड एक वर्षापासून फरार
वैभव अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही
वैभव गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल आहे त्याच्या विरोधात दोषारोपत्र दाखल करण्यात आले आहे तो फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत
फरार आरोपी नागेश बडेराव ,कुणाल पाटील ,वैभव गायकवाड यांच्या पैकी कुणाल पाटील नागेश बडेराव यांना पोलिसांनी अटक केली आहे यांच्या विरोधात सबळ पुरावा गोळा करून काल उल्हासनगर न्यायालयात पुरवणी आरोपपत्र ठाणे क्राइम ब्रँचने दाखल केले आहे
मात्र वैभव अजूनही फरार आहे त्याचा शोध क्राईम गुन्हे शाखा घेत आहे
उपचारादरम्यान हृदयविकारानं मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज
Bhandara : प्रसुतीकळा आल्यानं नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तिचा गर्भातील बाळासह मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भंडाऱ्याच्या तुमसरात घडली आहे. सुनिता दुर्गेश सोयाम (२४) असं मृतक गर्भवती महिलेचे नाव आहे. ती तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावरील आष्टी या गावातील आहे. नाकाडोंगरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला प्रथम दाखल करण्यात आलं होतं. मात्र, प्रसूतीला वेळ असल्याचं सांगत डॉक्टरांनी तिला घरी परत पाठविल्यानंतर तिची प्रकृती खाकवली. त्यामुळं कुटुंबीयांनी तिला तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं असताना तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गर्भवती महिलेचा हृदयविकारानं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. महिनाभरापूर्वी भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील विरली या गावातील मेघा बनारसे या महिलेचा प्रसूतीनंतर कुटुंबनियोजनची शस्त्रक्रिया चुकीची केल्यानं तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी संतप्त ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत रास्तारोको केलं होतं. या प्रकरणी दोन डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
- कृषिमंत्री माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरणी आजसलग दुसऱ्या दिवशी होणार सुनावणी
कोकाटे आज न्यायालयात हजर राहण्याची शक्यता, कोकाटे आज हजर राहणार का याकडे लक्ष
- यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने दिलेली 2 वर्षाच्या शिक्षेला अपील कालावधी संपेपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयाने दिली आहे स्थगिती
- आमदारकी अपात्र होऊ नये यासाठी कोकाटे यांनी सादर केला आहे अर्ज
अपत्रतेच्या मुद्यावर आज काय निर्णय होतो स्थगिती मिळणार का याकडे लक्ष
- याच याचिकेवर आज जिल्हा सत्र न्यायालयात होणार आहे सुनावणी, सरकारी पक्ष आज बाजू मांडणार
1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर कोकाटे याना झालाय जामीन मंजूर, जामिनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोकाटे न्यायालयात आज हजर रहाणार का याकडे लक्ष
रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
Raigad- नेरळ विकास प्राधिकरण अंतर्गत असणाऱ्या नेरळ - ममदापूर मुख्य रस्त्याची अक्षरशः खड्डेमय स्थिती झाली आहे या रस्त्यावर सध्या धुळीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांसह प्रवाशी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागतोय. वाहनचालकांना खड्डयांचा तर दुचाकी व पायपीट करणाऱ्या नागरिकांना धुळीचा मोठया प्रमाणात तसामना करावा लागत आहे. प्राधिकरणाकडून लवकरात लवकर या रस्त्यांची कांमे करण्यात यावी. अन्यथा ग्रामस्थांकडून आंदोलन केले जाईल असा इशारा ममदापूर ग्रामस्थांनी दिला आहे.
सातारा: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांचे वडील भगवान रामचंद्र गोरे यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते आज पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली आज चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर माण तालुक्यातील बोराटवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Mumbai: वडिलांच्या तिजोरीवर मुलानेच टाकला दरोडा...
डाॅ दा भ मार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आॅपेरा हाऊस, पंचरत्न बिल्डिंगमधील घटना
पंचरत्न बिल्डिंग, आॅपेरा हाऊस येथे तक्रारदार विपुल जोगाणी यांचे कार्यालय असून त्यांचा हिरे व्यापारीचा व्यवसाय आहे
व्यवसायातील प्रगती आणि कार्यालयातील तिजोरीत असलेली कोट्यावधी रुपयांची मालमत्ता पाहून मुलगा निर्मम याने घरच्याच तिजोरीवर हात मारण्याचा कट रचला
त्यावेळी निर्ममने वडिलांच्या नकळत तिजोरीच्या चावीचा छाप साबणावर मारून एक डुब्लिकेट चावी बनवली
२० तारखेच्या रात्री त्याच बनावट चावीने वडिलांच्या तिजोरीतून ३ कोटी ५ लाखाचा मुद्देमाल चोरला
या प्रकरणी विपुल यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला असता. तपासात चोर दुसरा तिसरा कुणी नसून निर्मम असल्याचे समोर आले
पोटच्या मुलानेच तिजोरीवर दरोडा टाकलयाने व्यापारीही थक्क झाला
या प्रकरणी डाॅ दा भ मार्ग पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून मुलगा निर्मम याला अटक केली आहे
जागतिक बाजार समितीच्या धर्तीवर राज्याची पणन व्यवस्था स्पर्धात्मक करणे आवश्यक असून शेतकऱ्यांना केंद्र मानून राज्याच्या बाजार समित्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही पणन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी केले.
तसेच परिषदेत मांडलेल्या सकारात्मक सूचना च्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेणार आहेत.
त्याचप्रमाणे बाजार समित्यांना अर्थसंकल्पात हक्काचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने आयोजित कृषी उत्पन्न बाजार समित्यांची राज्यस्तरीय पणन परिषदेच्यावेळी उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
महापालिका निवडणुकीसंदर्भात आज, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे, निवडणूक घेण्याचा मार्ग आज मोकळा होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
न्यायालयाने निवडणुकीसाठी कायमर्यादा घालून दिल्यास निवडणूक आयोगाला त्यानुसार कार्यवाही करावी लागेल.
मुंबई महापालिकेची प्रभागरचना हा महत्त्वाचा मुद्दा आहे यावर कोर्ट काय म्हणणार हे ही पाहव लागेल
सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी सुरू आहे, त्यामुळे आज होणारी सुनावणी लक्षेवधी आहे.
पुणे
लाभार्थ्यांच्या खात्यात १७ कोटींची रक्कम जमा
दहावी बारावीच्या ९ हजार ७९४ गुणवंत विद्यार्थ्यांना पुणे महापालिकेचे अर्थसाह्य
दर वर्षी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत आतापर्यंत ९ हजार ७९४ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात १७ कोटी ४ लाख ३० हजार रुपये जमा करण्यात आले आहेत
या योजनेसाठी महापालिकेकडे यंदाच्या वर्षी १३ हजार ८५४ अर्ज प्राप्त झाले होते
त्यांची छाननी करून १० हजार ८३१ लाभार्थी पात्र ठरले आहेत
कोल्हापूर breking
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन
प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजीत सावंतांना शिवीगाळ
घरात घूसून मारण्याची दिली धमकी, समाज माध्यमात कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत हे ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा इसमाचा आरोप
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्याकडून कॉल रेकॉर्ड फेसबुक वर पोस्ट
पुण्यात महापालिका शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी ‘शिक्षण परिषद’
महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण घेतले जाणार
त्यानंतर जर गुणवत्ता घसरली तर त्यास शिक्षकांना जबाबदार धरले जाणार
शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात ‘असर’चा अहवाल जानेवारी महिन्यात जाहीर झाला आहे.
त्यामध्ये पुणे शहर, जिल्ह्यातील गुणवत्तेबाबत गंभीर गोष्टी समोर आल्या आहेत
त्यानुसार इयत्ता ६वी ते ८वीच्या ४० टक्के विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना भागाकार करता येत नाही, मुळ अक्षरे ओळखता येत नाहीत, मुलांना एक ते ९९ पर्यंतचे आकडे ओळखता येत नाहीत
सरकारी शाळांमधील प्रवेश संख्या घटली आहे, मुलांचा स्मार्टफोनचा वापर वाढला आहे असे निरीक्षणे नोंदविली गेली आहेत
शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी काय करावे हे त्यांनी प्रशिक्षणातून सांगितले जाईल
पुण्यात महापालिका शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी ‘शिक्षण परिषद’
महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण घेतले जाणार
त्यानंतर जर गुणवत्ता घसरली तर त्यास शिक्षकांना जबाबदार धरले जाणार
शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात ‘असर’चा अहवाल जानेवारी महिन्यात जाहीर झाला आहे.
त्यामध्ये पुणे शहर, जिल्ह्यातील गुणवत्तेबाबत गंभीर गोष्टी समोर आल्या आहेत
त्यानुसार इयत्ता ६वी ते ८वीच्या ४० टक्के विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना भागाकार करता येत नाही, मुळ अक्षरे ओळखता येत नाहीत, मुलांना एक ते ९९ पर्यंतचे आकडे ओळखता येत नाहीत
सरकारी शाळांमधील प्रवेश संख्या घटली आहे, मुलांचा स्मार्टफोनचा वापर वाढला आहे असे निरीक्षणे नोंदविली गेली आहेत
शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी काय करावे हे त्यांनी प्रशिक्षणातून सांगितले जाईल
बीड जिल्ह्यातील भूसंपादन मावेजा प्रकरणात थेट जिल्हाधिकारी आणि लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिवाणी कैद करण्याचे आदेश बीडच्या दिवाणी न्यायालयाने दिले आहेत
त्याबाबतचे वॉरंट न्यायालयाने काढल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे
राजेश पोकळे यांची जमीन लघु पाटबंधारे विभाग स्थानिक स्तर बीड यांच्या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती
त्याचा मावेजा देण्याचा आदेश 2018 मध्ये देण्यात आले होते
मात्र त्याची पूर्तता अद्यापही झाली नसल्याने 13 लाख 19 हजाराच्या मावेजासाठी शासनाच्या वतीने बीडचे जिल्हाधिकारी आणि लघु पाटबंधारे विभाग स्थानिक स्तरचे कार्यकारी अभियंता यांना कैद करून त्यांच्याकडून मावेजाची रक्कम भरणा करून घ्यावी असे आदेश दिले गेले आहेत
या वॉरंटची अंमलबजावणी 21 मार्च पूर्वी करायची आहे
भूसंपादनाच्या मावेजासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन जप्त करण्याची घटना ताजी असतानाच आता न्यायालयाच्या या आदेशाने खळबळ उडाली आहे
साडेचार हजार कोटींच्या विकास निधीतून भंडाऱ्याचा बॅकलॉग भरून निघेल
शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांची माहिती
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रामनवमीनिमित्त भंडाऱ्यात आभार सभा होणारं आहे. मुख्यमंत्री असताना शिंदेंनी दिलेल्या साडेचार हजार कोटी रुपयांतून जागतिक दर्जाचं जलपर्यटन केंद्र आणि विविध विकास कामांवर तो खर्च करण्यात येणार आहे. या निधीतून भंडारा जिल्ह्याचा बॅकलॉग भरून जिल्ह्याला विकासाच्या दृष्टीनं पुढं नेता येणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील मनोहर चंद्रिकापुरे आणि सहसराम कोरेटी या दोन माजी आमदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं शिवसेना वाढीला मदत होणार असल्याची प्रतिक्रिया भंडाऱ्याचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिलीय.
महाशिवरात्रीला बेस्टच्या जादा गाड्या
महाशिवरात्रीच्या निमित्ताने मुंबईच्या काही भागात पर्यटनाला येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीकरिता बेस्ट उपक्रमाच्यावतीने काही अतिरिक्त बसगाड्या चालवण्यात येतील.
कान्हेरी गुंफा येथील पुरातन लेण्यांना भेट देणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बसमार्ग क्रमांक १८८ या बसमार्गावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते कान्हेरी गुंफा दरम्यान सकाळी १०.३० वाजेपासून ते सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत एकूण ६ जादा बसगाड्या चालवण्यात येणार आहेत.
बोरिवली रेल्वे स्थानक (पूर्व) ते कान्हेरी गुंफा दरम्यान नियमित बस सेवा देखील कार्यरत राहील
प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी विशेषत: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेशद्वार, एलोरा चौकी (बोरिवली स्थानक पूर्व) तसेच कान्हेरी गुंफा येथे बसनिरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे
या व्यतिरिक्त बाबुलनाथ येथील शिवमंदिरास भेट देणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत यादरम्यान बसमार्ग क्रमांक ५७, ६७ आणि १०३ या बस मार्गावर एकूण ८ जादा बसगाड्या चालवण्यात येणार असल्योच बेस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची "अखिल भारतीय प्रतिनिधी सभा" 21 ते 23 मार्च दरम्यान बंगळूरु मध्ये होणार आहे... यंदा संघाचा शताब्दी वर्ष असल्याने या प्रतिनिधी सभेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.. या प्रतिनिधी सभेत संघ परिवारा कडून शताब्दी वर्षात हाती घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांवर मंथन होणार आहे...
संघाची प्रतिनिधी सभा दरवर्षी होत असते.. ही संघाच्या निर्णय प्रक्रियेतील सर्वात मोठी बैठक असून संघ परिवारातील विविध संघटनांचे देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित राहतात...
संघ परिवारातील विविध संघटनांचे प्रतिनिधी त्यांच्या संघटनांचे वार्षिक कार्य अहवाल या बैठकीत मांडतात.. त्यानंतर पुढील वर्षात केल्या जाणाऱ्या कामांच्या कृती आराखड्यावरही या बैठकीत चर्चा केली जाते...
2025 संघाच्या स्थापनेचा शताब्दी वर्ष असल्याने या बैठकीत संघाने पुढील कालावधीसाठी निश्चित केलेल्या पंच परिवर्तनाच्या विषयांवर प्रदीर्घ मंथन होण्याची शक्यता आहे...
नागपूर -
- भारत विरुद्ध पाकिस्तान सामना जिंकल्यानंतर रात्री लक्ष्मीभुवन चौकात जल्लोष साजरा करत असताना गर्दीवर फटाके फेकल्या प्रकरणी नागपूर पोलिसांकडून पाच तरुणांवर कारवाई
- सामना संपल्यावर रात्री अकरा वाजता लक्ष्मी भुवन चौकात हजारो लोकांची गर्दी होती
- आरोपींनी गर्दीत लोकांवर पेटते फटाके फेकले
- पेटत्या फटाक्यांमुळे अपघात होण्याची शक्यता होती, प्रसंगी हा खेळ जिवावर उठण्याची शक्यता होती
- ही बाब लक्षात घेऊन अंबाझरी पोलीस स्टेशन मध्ये पाच तरूणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली
- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामुळे प्रेमी युगुलाचे पुनर्मिलन, दोघांनाही सुरक्षित जागी ठेवण्याचे हायकोर्टाचे आदेश
- या प्रेमी युगुलाने लग्न केले असून प्रेयसीच्या वडिलांनी तिला बळजबरीने स्वतःच्या घरात डांबून ठेवले होते
- त्यामुळे प्रियकराने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती
- या प्रेमीयुगोलाने स्वमरजीने 21 डिसेंबर 2023 रोजी लपून लग्न केले परंतु त्याची माहिती प्रजेच्या वडिलांना लागल्यावर त्यांनी प्रेयसीला घरात डांबून ठेवले
- कोर्टाने नोटीस बजावल्यानंतर पोलिसांनी प्रेयसी व तिच्या वडिलाला कोर्टात हजर केले
- प्रेयसीची सुरक्षा व गोपनीयता कायम ठेवण्यासाठी न्यायमूर्तींनी तिच्यासोबत चेंबरमध्ये संवाद साधला
- त्यावेळी प्रेयसीने स्वमरजीने लग्न केल्याचे सांगून प्रियकरा सोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली, त्यामुळे न्यायालयाने या प्रेमीयुगुलाचे पुनर्मिलन घडवून आणले तसेच जीवाला धोका असेपर्यंत दोघांनाही सुरक्षित घरात ठेवण्याचा आदेश राज्य सरकारला दिला
- प्रकरणातील प्रेयसी २५ वर्षे वयाची असून वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवीधर आहे तर प्रियकर व्यावसायिक आहे
न्यू इंडिया को आॅप बॅक गैरव्यवहार प्रकरणार बॅकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता याने खरेदी केलेल्या मालमत्तांची माहिती आर्थिक गुन्हेशाखेकडून घेतली जाणार
यासाठी पोलिसांनी पुण्यातील नोंदणी कार्यालय व मुंंबईतील प्राप्तिकर विभाग यांच्याशी पोलिसांनी पत्रव्यवहार केला आहे
या शिवाय रिझर्व्ह बॅकेने मेहतचा नोंदवलेला कबूलीजबाबाची व्हिडिओ प्रतही पोलिसांना दिली आहे
मेहता देत असलेली माहिती आणि वस्तूस्थिती यात अनेकदा तफावत आढळत असल्याने मेहताची लाय डिटेक्टर टेस्टची मागणी आर्थिक गुन्हे शाखेकडून केली जणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली
तर या प्रकरणातील आरोपी अरूण भाईलायाला एका ट्रस्टमध्ये गुंतवणयासाठीही मेहताने १५ ते १८ कोटी दिले होते
ट्रस्टमध्ये पैसे गुंतवल्यास ब्लाॅकचे वाईट होतात असा समज मेहताचा होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे
पुण्यात केलेल्या नाकाबंदीत दोन तासात १५१८ वाहनचालकांवर धडक कारवाई
एकाच दिवशी १३ लाखांचा दंड वसूल
१५१८ वाहनचालकांकडून १३ लाख ६५ हजार रुपयांचा दंड वसूल
दुपारी चार वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहराच्या विविध भागात नाकाबंदी करण्यात आली होती.
नाकाबंदीदरम्यान शहरातील ७८ महत्त्वाच्या ठिकाणी चार हजार १८७ वाहनचालकांची तपासणी करण्यात आली
विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, ट्रिपल सीट, सीट बेल्ट परिधान न केलेल्या १५१८ वाहनचालकांवर कारवाई
या नाकाबंदी मोहिमेत पोलिस सह आयुक्त, चार अतिरिक्त पोलिस आयुक्त, पाच पोलिस उपायुक्त, दहा सहाय्यक पोलिस आयुक्त आणि ३९ पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ निरीक्षक आणि वाहतूक शाखेसह ९७ पोलिस अधिकारी तसेच १८७२ पोलिस अंमलदार सहभागी होते.
पुढील काही दिवस ही नाकाबंदी असणार असल्याची शक्यता आहे
हळद काढणीला वेग , हळदीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव
अँकर - नांदेड जिल्हयात हळद काढणीला वेग आला . सद्या सर्वत्र हळद काढणी सूरू आहे. मात्र हळदीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला . मागील काळात वातावरणातील सातत्याने होणारे बदल आणि बेमोसमी पावसामुळे हळदीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला . त्यामूळे उत्पन्नात घट होणार आहे . नगदी पीक असल्याने जिल्हात मोठया प्रमाणात हळदीची लागवड केली जाते..
नाशिकच्या चणकापूर धरणातून आठशे क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग गिरणा नदी पात्रात सोडण्यात आला आहे.. या आवर्तनाचा नाशिक जिल्ह्यातील कळवण, देवळा, सटाणा व मालेगाव या तालुक्यातील रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरबरा सह इतर पिकांना मोठा दिलासा मिळणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटनार आहे.शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे.
रायगड जिल्ह्यात आगामी दिवसात येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आजपासुन रायगड जिल्हा पोलिस विभागाकडून जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.25 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 पर्यंत हे आदेश असणार आहेत.
पाथर्डी तालुक्यातील मढी येथील ग्रामसभेत मुस्लीम समाजाच्या व्यापाऱ्यांना कानिफनाथांच्या यात्रेत दुकाने लावण्यास बंदी करण्याचा ठराव करण्यात आला... ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंवैधानिक असल्याचा आरोप करीत मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती.
नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली मनमाडमध्ये सुरू असलेल्या आमदार सुहास कांदे चषक मानाच्या ३५ व्या किशोर / किशोरी गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे दुसऱ्या मुलीच्या गटात यजमान नाशिक शहर,परभणी, पिंपरी चिंचवड व सांगली या संघाने उपांत्य फेरी गाठली तर नाशिक ग्रामीण संघाचे बाद पद्धतीच्या सामन्यात आव्हान संपुष्टात आले. आता उपांत्य फेरीत नाशिक शहर विरुद्ध परभणी तर पिंपरी चिंचवड विरुद्ध सांगली अशी उपांत्य फेरीची सामने होतील.आज मुलांच्या सामन्याला सुरवात झाली आहे.
उन्हाच्या तीव्रतेने वन क्षेत्रातील बहुतांश जलसाठे संपुष्टात येऊ लागले आहेत..या टंचाईची झळ वन्य प्राण्यांना बसू नये म्हणून वन विभाग ५ हजार लिटर पाणी विकत घेत आहे..वन क्षेत्रात तयार केलेल्या १४ पाणवठ्यांमध्ये पाणी टाकून विविध प्रजातींच्या ९२० वन्य प्राण्यांची तहान भागविली जात आहे..शहर परिसराचा पारा वाढायला सुरुवात झाल्याने पुढील काही महिने उन्हाचा तडाखा कायम रहाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे वन विभागाने जलस्त्राेतांचा अंदाज घेत अनेक ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. या भागात वन्य प्राण्यांचा वावर असल्याने दाेन आठवड्यात एकदा पाणवठा पाण्याने भरला जात आहे.
अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीने विक्रमी वेळेत कर्नाळा किल्ला सर केला आहे.सांगली बत्तीस शिराळाच्या जिजा सागर पाटील या चिमुरडीने अवघ्या एक तास 54 मिनिटांमध्ये कर्नाळा किल्ला सर केला आहे. जिजा पाटील ही मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या सागर पाटील यांची मुलगी आहे. दरवर्षी ही चिमुरडी आपल्या कुटुंबीयांसोबत गडकिल्ल्यांवर जाऊन वाढदिवस साजरा करते यावर्षी देखील तिने आपल्या वाढदिवसा निमित्ताने पनवेल येथील कर्नाळा किल्ला सर करून एक नवा विक्रम स्थापित केला आहे. कर्नाळा किल्ला सर करत असताना इतर ट्रेकर्सने या सोशल माध्यमांमध्ये टाकून चांगलाच व्हायरल झाला आहे.
शिवसेना शिंदे गटाकडून कोल्हापुरात ऑपरेशन टायगर?
ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार आणि सध्या स्वाभिमानीत असलेले सुजित मिणचेकर शिंदे गटात प्रवेश करणार- सूत्र
27 तारखेला मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पक्षप्रवेश
मिणचेकर हे शिवसेनेचे दोन टर्म आमदार म्हणून निवडून आले होते
शिवसेना शिंदे गटात जोरदार इन्कमिंग होणार असल्याचा दावा
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News LIVE Updates: संतोष देशमुख हत्याप्रकरणी मस्साजोगमध्ये धनंजय देशमुखांची ग्रामस्थांसोबत बैठक झाली. विविध मागण्या पूर्ण न झाल्याने मसाजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनावर ठाम आहे. पोलीस प्रशासनाला कोणताही त्रास होणार नाही, बैठकीतून ग्रामस्थांचा एकमताने ठराव मांडण्यात आला. त्यामुळे मस्साजोगमध्ये आजपासून अन्नत्याग आंदोलन होणार आहे. तर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या विधानावरुन महाराष्ट्रातलं राजकारण तापलं आहे. शिवसेना ठाकरे गट नीलम गोऱ्हेंच्या विधानानंतर आक्रमक झाल्याने सध्या शिंदे विरुद्ध ठाकरे असा वाद रंगला आहे. यासह महाराष्ट्र आणि देश-विदेशातील महत्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर...