महाड (रायगड) : रात्रीच्या काळ्यामिट्ट अंधारात सावित्री नदीच्या पोटात गडप झालेल्यांचा शोध आज सलग तिसऱ्या दिवशी सुरु आहे. मात्र रात्रीपासूनच्या धुँवाधार पावसाने शोधकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. कालपर्यंत 14  मृतदेह हाती लागले आहे. यात 11 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे.   मात्र एकूण 42 जण बेपत्ता असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे बेपत्ता लोकांचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे. त्याचसोबत नदीत बुडालेल्या 2 एसटी बस आणि तवेरा गाडीचेही अवशेष अजून मिळालेले नाहीत. लोहचुंबकाच्या मदतीनं लोखंडी वस्तू शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.   महाड दुर्घटनेतील मृतांची नावं  
महाड दुर्घटनेतील दुर्दैवी बळीकुठे सापडला मृतदेह?किती अंतरावर?
श्रीकांत कांबळेआंजर्ले130 किमी
शेवंती मिरगलहरिहरेश्वर80 किमी
रंजना वाजेकेंबुर्ली80 किमी
पांडुरंग घागकेंबुर्ली80 किमी
आवेद चौगुलेदादलीपूल3 किमी
प्रशांत मानेम्हसळा40 किमी
स्नेहा बैकरविसावा कॉर्नर2.5 किमी
प्रभाकर शिर्केकेंबुर्ली8 किमी
रमेश कदमवराठी10 किमी
मंगेश काटकरआंबेत म्हाप्रळ25 किमी
सुनील बैकरआंबेत म्हाप्रळ25 किमी
अनिश बलेकरआंबेत म्हाप्रळ25 किमी
जयेश बनेआंबेत म्हाप्रळ25 किमी
बाळकृष्ण उरककेंबुर्ली8 किमी
  एबीपी माझा वेब टीम