वर्षानुवर्षे सुरु असलेला अभिषेक, मूर्तीची झालेली झीज आणि त्यावर झालेल्या रासायनिक प्रक्रियांमुळे सध्याची मूर्ती कमकुवत झाल्याचा काही जणांचा दावा आहे. त्यामुळेच सध्या असलेल्या प्राचीन मूर्तीसारखीच एक मूर्ती कोल्हापुरात घडवली जात आहे.
अर्थात देवस्थान समितीचा जो मतप्रवाह आहे, तसा सगळ्यांचाच नाही. अनेकांचा देवीची मूर्ती बदलण्यावर आक्षेप आहे.अर्थात हा निर्णय मोठा असल्याने एकांगी होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.
पुरातत्व विभागाकडून सध्याच्या मूर्तीच्या स्थितीची पाहणी करुन देवस्थान समिती याबाबत निर्णय घेणार आहे. तर धर्मसभा बोलावून मूर्ती बदलण्यात येणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र अंबाबाईची मूर्ती खरंच बदलली जाणार? की आधीचीच मूर्ती कायम राहणार? याची भक्तांमध्ये उत्सुकता आहे.