मुंबई :  शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणात आता केतकी चितळेच्या अडचणी अधिकच वाढताना दिसत आहेत. केतकी चितळेने मोबाईलमधील SMS डीलीट केले असल्याची माहिती समोर आलीय. तर  पवारांसंबंधित फेसबुक पोस्ट केतकीला कुणीतरी पाठवली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. 2020 सालची पोस्ट अचानक कशी सापडली असा सवालही पोलिसांनी उपस्थित केला.


केतकी व्हॉट्सअॅपचा वापर करत नसून फक्त फेसबुक आणि SMS च्या माध्यमातून सक्रिय असल्याचं पोलिसात तपासात स्पष्ट झालंय. दरम्यान केतकी चितळेचा मोबाईल आता फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवला जाणार आहे. शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढल्यात. ठाणे न्यायालयाने केतकीला 14  दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय. कोर्टाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर  मुंबईतील गोरेगाव पोलीस केतकीचा ताबा घेतील. देहू रोड पोलीसही केतकीचा ताबा घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. 


केतकी चितळेविरोधात राज्याच्या विविध भागात 15 हून अधिक गुन्हे दाखल झालेत. त्यामुळे या गुन्ह्यांप्रकरणी तिला राज्याचा दौरा करावा लागण्याची शक्यता आहे. दरम्यान ठाणे कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर केतकीने जामिनासाठी अर्ज केलाय.


केतकीवर आतापर्यंत कुठे गुन्हे दाखल? 


अंबाजोगाई बरोबरच कळवा पोलिस ठाण्यात देखील केतकीवर गुन्हा दाखल करण्यात आला.  कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव, नाशिक, पवई, पुणे, आमरावती आणि पिंपरी चिंडवड येथे देखील केतकी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


 संबंधित बातम्या :


Ketaki Chitale Case : अभिनेत्री केतकी चितळेला न्यायालयीन कोठडी